शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंब्याजवळ कार अपघातात पाच ठार, तीघे जखमी; गणपतीपुळ्याला देवदर्शनाला जाताना घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 17:14 IST

कोल्हापूर- कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.

कोल्हापूर- पुण्याहून गणपतीपूळ्याला देवदर्शनाला जात असताना आंब्याजवळील अपघाती वळणावर कार आदळून अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुलं, दोन पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता तळवडे वळणावर हा अपघात झाला. संतोष राऊत, अपर्णा संतोष राऊत, दिपक शेळकंदे, वरूणा शेळकंदे, प्रज्ञा (वय 5 वर्ष) ही पाच मृतांची नाव आहेत. तर चालक प्रशांत पाटणकर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता इतकी होती की अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. 

हडपसर (पूणे) येथील राऊत, शेळकंदे कुटुंब शुक्रवारी सकाळी गणपतीपुळ्याला दर्शनासाठी निघाले होते. दोन कुटुंब त्यांच्या मुलांसह सलग सुट्यांमुळे कोकणात देवदर्शनाला निघाले होते. मलकापूरनंतर आंब्याजवळ गाडी येत असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या आंब्याच्या झाडावर आदळली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन लहान मुलांचा मलकापूर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

 

 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर