शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंब्याजवळ कार अपघातात पाच ठार, तीघे जखमी; गणपतीपुळ्याला देवदर्शनाला जाताना घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 17:14 IST

कोल्हापूर- कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.

कोल्हापूर- पुण्याहून गणपतीपूळ्याला देवदर्शनाला जात असताना आंब्याजवळील अपघाती वळणावर कार आदळून अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुलं, दोन पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता तळवडे वळणावर हा अपघात झाला. संतोष राऊत, अपर्णा संतोष राऊत, दिपक शेळकंदे, वरूणा शेळकंदे, प्रज्ञा (वय 5 वर्ष) ही पाच मृतांची नाव आहेत. तर चालक प्रशांत पाटणकर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता इतकी होती की अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. 

हडपसर (पूणे) येथील राऊत, शेळकंदे कुटुंब शुक्रवारी सकाळी गणपतीपुळ्याला दर्शनासाठी निघाले होते. दोन कुटुंब त्यांच्या मुलांसह सलग सुट्यांमुळे कोकणात देवदर्शनाला निघाले होते. मलकापूरनंतर आंब्याजवळ गाडी येत असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या आंब्याच्या झाडावर आदळली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन लहान मुलांचा मलकापूर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

 

 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर