शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

तुळशी नदीवरील बंधाऱ्याचे बरगे काढण्याच्या कामाला वेग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 13:29 IST

Irrigation Rain Dam Kolhapur : गेल्या चार दिवसापासून धामोड परिसरामध्ये पावसाची रिपरिप सुरू झाल्याने नदी-नाले प्रवाहित होण्यास सुरूवात झाली आहे. सततच्या पावसाने शेती सिंचनासाठी सुरू असणारे विद्यूत पंप ही शेतकऱ्यांनी बंद करून ठेवल्याने आता पाणी ऊपसा बंद झाला आहे . त्यामुळे तुळशी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी अडवण्यासाठी घातलेले बरगे काढण्याची लगबग सुरू आहे.

ठळक मुद्देतुळशी नदीवरील बंधाऱ्याचे बरगे काढण्याच्या कामाला वेग!

श्रीकांत ऱ्हायकरधामोड : गेल्या चार दिवसापासून धामोड परिसरामध्ये पावसाची रिपरिप सुरू झाल्याने नदी-नाले प्रवाहित होण्यास सुरूवात झाली आहे. सततच्या पावसाने शेती सिंचनासाठी सुरू असणारे विद्यूत पंप ही शेतकऱ्यांनी बंद करून ठेवल्याने आता पाणी ऊपसा बंद झाला आहे . त्यामुळे तुळशी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी अडवण्यासाठी घातलेले बरगे काढण्याची लगबग सुरू आहे.तुळशी धरणापासून ते आरे -बीड पर्यंतच्या तुळशी नदीकाठावरील शेतकऱ्यांना तुळशी धरणातील पाण्याचा शेती सिंचनाबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होतो . साधारणतः नोव्हेंबरपासून तुळशी धरणातील पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात होते. या पाण्यावरती साधारणतः ४९२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते .२३ गावांना या पाण्याचा उपयोग करून शेती पिकवता येते. धरण परिसरात वर्षभरामध्ये सरासरी १७७८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होत असते. पण तरीही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या काठावरील शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनतो.यावरती ठोस उपाय म्हणून या नदीपात्र वरती तुळशी धरणापासून ते आरे बीड पर्यंत नऊ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले. व या बंधाऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बरगे बसवून पाणी अडविण्यात येते. परिणामी तुळशी नदी काठावरील सर्व शेती हिरवीगार होते. आत्ता पावसाळ्याचे दिवस जवळ आले असून नदी-नाले हळूहळू प्रवाहित होऊ लागले आहेत. त्यातच गेल्या चार दिवसापासून धामोड परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाल्याने पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्यांना बसवलेले बरगे काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे . 

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पkolhapurकोल्हापूरRainपाऊस