शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

तुळशी नदीवरील बंधाऱ्याचे बरगे काढण्याच्या कामाला वेग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 13:29 IST

Irrigation Rain Dam Kolhapur : गेल्या चार दिवसापासून धामोड परिसरामध्ये पावसाची रिपरिप सुरू झाल्याने नदी-नाले प्रवाहित होण्यास सुरूवात झाली आहे. सततच्या पावसाने शेती सिंचनासाठी सुरू असणारे विद्यूत पंप ही शेतकऱ्यांनी बंद करून ठेवल्याने आता पाणी ऊपसा बंद झाला आहे . त्यामुळे तुळशी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी अडवण्यासाठी घातलेले बरगे काढण्याची लगबग सुरू आहे.

ठळक मुद्देतुळशी नदीवरील बंधाऱ्याचे बरगे काढण्याच्या कामाला वेग!

श्रीकांत ऱ्हायकरधामोड : गेल्या चार दिवसापासून धामोड परिसरामध्ये पावसाची रिपरिप सुरू झाल्याने नदी-नाले प्रवाहित होण्यास सुरूवात झाली आहे. सततच्या पावसाने शेती सिंचनासाठी सुरू असणारे विद्यूत पंप ही शेतकऱ्यांनी बंद करून ठेवल्याने आता पाणी ऊपसा बंद झाला आहे . त्यामुळे तुळशी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी अडवण्यासाठी घातलेले बरगे काढण्याची लगबग सुरू आहे.तुळशी धरणापासून ते आरे -बीड पर्यंतच्या तुळशी नदीकाठावरील शेतकऱ्यांना तुळशी धरणातील पाण्याचा शेती सिंचनाबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होतो . साधारणतः नोव्हेंबरपासून तुळशी धरणातील पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात होते. या पाण्यावरती साधारणतः ४९२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते .२३ गावांना या पाण्याचा उपयोग करून शेती पिकवता येते. धरण परिसरात वर्षभरामध्ये सरासरी १७७८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होत असते. पण तरीही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या काठावरील शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनतो.यावरती ठोस उपाय म्हणून या नदीपात्र वरती तुळशी धरणापासून ते आरे बीड पर्यंत नऊ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले. व या बंधाऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बरगे बसवून पाणी अडविण्यात येते. परिणामी तुळशी नदी काठावरील सर्व शेती हिरवीगार होते. आत्ता पावसाळ्याचे दिवस जवळ आले असून नदी-नाले हळूहळू प्रवाहित होऊ लागले आहेत. त्यातच गेल्या चार दिवसापासून धामोड परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाल्याने पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्यांना बसवलेले बरगे काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे . 

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पkolhapurकोल्हापूरRainपाऊस