शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गेली अडीच वर्षे सुरु होते उपचार, जगलो तर उचगावची निवडणूक लढवीन म्हणणारा अभ्या गेला, गावासह रुग्णालयही हळहळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 18:30 IST

त्याचे नाव काही असले तरी सारा दवाखाना व इतर पेशंटही त्याला अभ्या म्हणूनच ओळखायचे..

कोल्हापूर : त्याचे नाव काही असले तरी सारा दवाखाना व इतर पेशंटही त्याला अभ्या म्हणूनच ओळखायचे... तो डायलेसिसला आला की रुग्णालयही ताजे टवटवीत व्हायचे. प्रचंड हसतमुख. जगलो वाचलो तर गावची निवडणूक लढवीन इथपर्यंतची जिद्द... परंतु त्याचा हा प्रवास नियतीने सोमवारी थांबवला.अभिषेक दत्तात्रय लोंढे (वय १८, रा. उचगाव) असे या तरुणाचे नाव. त्याच्यावर येथील डायमंड मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात गेली अडीच वर्षे किडनी रोगतज्ज्ञ डॉ. विलास नाईक यांनी मोफत उपचार केले. काही करून अभ्या जगला पाहिजे अशीच डॉ. नाईक यांचीही तळमळ होती.अभ्याचे लहानपणीच किडनीच्या आजारपणाचे निदान झालेले. आईचे छत्र लहानपणीच नाहीसे झालेले. वडील गवंडी काम करतात, परंतु व्यसनी, बहिणीचे लग्न झाले आहे. बिचारी आजी भाजी विकून नातवासाठी धडपड करायची. सुरुवातीला जेव्हा उपचारासाठी आला तेव्हा त्याच्यातील जिगर पाहून डॉ. नाईक यांनी त्याच्यावर हवे ते उपचार करायचे असे ठरवले. आठवड्यातून तीन वेळेला डायलिसिसची गरज पडायची. हॉस्पिटल प्रशासनाने त्याचे उपचार पूर्णपणे मोफत करण्याची जबाबदारी उचलली. गेली अडीच वर्षे त्याला मोफत डायलिसिस दिले जात होते.मृत्यूच्या छायेखाली असूनही सतत हसतमुख आणि महत्त्वाकांक्षी असा त्याचा स्वभाव. जगलो तर गावची इलेक्शन लढवीन इथपर्यंतची जिद्द. आदमापूरच्या बाळूमामाचा तर तो परमभक्त. अमावस्येला खिशात पैसे नसतील तर स्टाफकडून आणि इतर लोकांकडून पैसे गोळा करून तो आदमापूरला जाणार म्हणजे जाणार. बोलक्या स्वभावामुळे त्याने प्रचंड मित्रपरिवार गोळा केला होता. कित्येक वेळेला वडाप रिक्षावाले त्याला हॉस्पिटलपर्यंत मोफतच आणून सोडायचे.डायलिसिसच्या वेळेस त्याला नाश्ता, जेवण आणि त्याची औषधे पूर्णपणे मोफत मिळायची. प्रत्येक वेळेला स्टाफपैकी कोणीतरी त्याला त्याच्या रिक्षा स्टॉपपर्यंत किंवा त्याच्या घरापर्यंत सोडायचे. परंतु हे सारेच आता त्याच्या मृत्यूने थांबवले.

हळहळ लावून गेला...वेदना असूनही स्वतःच्या आजारपणाचे त्याने कधीही भांडवल केले नाही. रविवारी (दि.२६) पहाटे त्याला अचानक धाप लागण्याचा त्रास वाढला. रुग्णालयापर्यंत पोहोचेपर्यंत मृत्यूने त्याला वाटेतच गाठले. तो राहत असलेले उचगाव आणि रुग्णालयातील सारेच हळहळले. अभ्या तसा कुणाचाच नव्हता, परंतु सगळ्यांनाच आपलेसे करून गेला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू