शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

कोल्हापूर : गव्याच्या हल्ल्यात अवचितवाडीतील शेतकरी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:00 IST

केळोशी बु॥पैकी आवचितवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात बळवंत भिकाजी जाधव ( वय ५४ ) हे गंभीर जखमी झाले असुन पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर मध्ये दाखल केले आहे. या आठवडयातील परिसरातील ही दुसरी घटना असुन शेतकरी वर्गामध्ये कमालीची भिती पसरली आहे.

ठळक मुद्देगव्याच्या हल्ल्यात अवचितवाडीतील शेतकरी गंभीर जखमीपरिसरातील आठवडयातील दुसरी घटना ;वन विभागाची जुजबी कारवाई

श्रीकांत ऱ्हायकरधामोड/कोल्हापूर : केळोशी बु॥पैकी आवचितवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात बळवंत भिकाजी जाधव ( वय ५४ ) हे गंभीर जखमी झाले असुन पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर मध्ये दाखल केले आहे. या आठवडयातील परिसरातील ही दुसरी घटना असुन शेतकरी वर्गामध्ये कमालीची भिती पसरली आहे.

सद्या ऊसपिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू आहे . व ऊस पिकात दबा धरून बसलेले हे गवे अचानक हल्ला चढ़वत असल्याने गव्यांचा हल्ल्याचे वाढले आहे. यावरती वनविभागाने ठोस कारवाई करावी अशी मागणी होत असताना, केवळ जुजबी कारवाई करून वेळ मारून नेली जात असल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी बोलुन दाखवले.

बळवंत भिकाजी जाधव हे आपल्या ' सुतारकी ' नावाच्या शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी ,पाट तयार करण्यासाठी गेले होते . ते पाट खनत असताना पाठीमागुन आलेल्या गव्याने अचानक त्यांचावर हल्ला चढवला. जोराचा धडकेने ते जमिनीवर कोसळले.

कांही कळायच्या आत गव्याने पुन्हा त्यांचावर हल्ला चढवला त्यात त्यांचा डाव्या पायाला जोरदार धडक बसल्याने व शिंगे मांडीत घुसल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यात त्यांचा हात व डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे. ते कसेबसे ऊसातुन बाहेर आले व तेथेच कोसळले. शेजारीच प्राथमिक शाळेच्या क्रिडांगणावर खेळ खेळणाऱ्या तरुणांनी हा प्रकार बघुन आरडा - ओरड करून गावकऱ्यांना जमा केले .व जखमी जाधव यांना पढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर येथे हलवले.पण धक्कादायक बाब अशी की , गेली तिन ते चार दिवस हा गवा याच परिसरात वास्तव्यास असुन व ही बातमी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहीत होती. पण ग्रामस्थांना तशा कोणत्याच सुचना वन विभागाकडून मिळाल्या नव्हत्या व त्या गव्याला तेथुन हुसकावून लावण्या संदर्भातही कोणतीच कारवाई त्यांनी केलेली नाही.

त्याचा कोणताच पत्ता बळवंत जाधव यांना नसल्याने ते आज या शेताकडे गेले व त्या गव्याने त्यांना लक्ष केले. त्यात त्यांना गंभीर इजा झाली आहे. वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज परिसरात अशी दुसरी घटना घडली. केवळ या शेतकऱ्यांचे ' दैव बलवत्तर ' म्हणुनच 'जीवावर आलेले दुखापतीवरच निभावले '.सद्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने परिसरातील बहुतांशी पुरुष मंडळी ऊसतोडी करण्यासाठी बाहेरगावी जात असतात व घरातील महिला ऊसांना पाणी देणे, भांगलनीची कामे करण्यासाठी शेताकडे जातात. पण परिसात हा गवा गेली चार दिवस तळ ठोकून असल्याने महिला वर्गात कमालीची भिती पसरली आहे. हा गवा बहुधा बित्तरलेला असावा त्यामुळे तो हा परिसर सोडून जात नाही . त्याला वन विभागाने त्वरीत हुसकावून लावावे. अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे .

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर