शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

कोल्हापूर : गव्याच्या हल्ल्यात अवचितवाडीतील शेतकरी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:00 IST

केळोशी बु॥पैकी आवचितवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात बळवंत भिकाजी जाधव ( वय ५४ ) हे गंभीर जखमी झाले असुन पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर मध्ये दाखल केले आहे. या आठवडयातील परिसरातील ही दुसरी घटना असुन शेतकरी वर्गामध्ये कमालीची भिती पसरली आहे.

ठळक मुद्देगव्याच्या हल्ल्यात अवचितवाडीतील शेतकरी गंभीर जखमीपरिसरातील आठवडयातील दुसरी घटना ;वन विभागाची जुजबी कारवाई

श्रीकांत ऱ्हायकरधामोड/कोल्हापूर : केळोशी बु॥पैकी आवचितवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात बळवंत भिकाजी जाधव ( वय ५४ ) हे गंभीर जखमी झाले असुन पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर मध्ये दाखल केले आहे. या आठवडयातील परिसरातील ही दुसरी घटना असुन शेतकरी वर्गामध्ये कमालीची भिती पसरली आहे.

सद्या ऊसपिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू आहे . व ऊस पिकात दबा धरून बसलेले हे गवे अचानक हल्ला चढ़वत असल्याने गव्यांचा हल्ल्याचे वाढले आहे. यावरती वनविभागाने ठोस कारवाई करावी अशी मागणी होत असताना, केवळ जुजबी कारवाई करून वेळ मारून नेली जात असल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी बोलुन दाखवले.

बळवंत भिकाजी जाधव हे आपल्या ' सुतारकी ' नावाच्या शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी ,पाट तयार करण्यासाठी गेले होते . ते पाट खनत असताना पाठीमागुन आलेल्या गव्याने अचानक त्यांचावर हल्ला चढवला. जोराचा धडकेने ते जमिनीवर कोसळले.

कांही कळायच्या आत गव्याने पुन्हा त्यांचावर हल्ला चढवला त्यात त्यांचा डाव्या पायाला जोरदार धडक बसल्याने व शिंगे मांडीत घुसल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यात त्यांचा हात व डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे. ते कसेबसे ऊसातुन बाहेर आले व तेथेच कोसळले. शेजारीच प्राथमिक शाळेच्या क्रिडांगणावर खेळ खेळणाऱ्या तरुणांनी हा प्रकार बघुन आरडा - ओरड करून गावकऱ्यांना जमा केले .व जखमी जाधव यांना पढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर येथे हलवले.पण धक्कादायक बाब अशी की , गेली तिन ते चार दिवस हा गवा याच परिसरात वास्तव्यास असुन व ही बातमी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहीत होती. पण ग्रामस्थांना तशा कोणत्याच सुचना वन विभागाकडून मिळाल्या नव्हत्या व त्या गव्याला तेथुन हुसकावून लावण्या संदर्भातही कोणतीच कारवाई त्यांनी केलेली नाही.

त्याचा कोणताच पत्ता बळवंत जाधव यांना नसल्याने ते आज या शेताकडे गेले व त्या गव्याने त्यांना लक्ष केले. त्यात त्यांना गंभीर इजा झाली आहे. वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज परिसरात अशी दुसरी घटना घडली. केवळ या शेतकऱ्यांचे ' दैव बलवत्तर ' म्हणुनच 'जीवावर आलेले दुखापतीवरच निभावले '.सद्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने परिसरातील बहुतांशी पुरुष मंडळी ऊसतोडी करण्यासाठी बाहेरगावी जात असतात व घरातील महिला ऊसांना पाणी देणे, भांगलनीची कामे करण्यासाठी शेताकडे जातात. पण परिसात हा गवा गेली चार दिवस तळ ठोकून असल्याने महिला वर्गात कमालीची भिती पसरली आहे. हा गवा बहुधा बित्तरलेला असावा त्यामुळे तो हा परिसर सोडून जात नाही . त्याला वन विभागाने त्वरीत हुसकावून लावावे. अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे .

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर