शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

भरधाव कारची कंटेनरला पाठीमागून धडक; अयोध्येहून परतताना कोल्हापूर, सांगलीचे चौघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 16:07 IST

बांबवडे (जि. कोल्हापूर ):  अयोध्येहून परतताना झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर , सांगलीचे चौघे जागीच ठार झाले. मृतांमध्ये शाहुवाडी तालुक्यातील एकाचा समावेश आहेत. मध्यप्रदेश ...

बांबवडे (जि. कोल्हापूर):  अयोध्येहून परतताना झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर, सांगलीचे चौघे जागीच ठार झाले. मृतांमध्ये शाहुवाडी तालुक्यातील एकाचा समावेश आहेत. मध्यप्रदेश येथे काल, सोमवारी (दि.८) हा अपघात झाला.

अपघातात दिलदार तांबोळी (वय-६५, रा. शाहुवाडी, जि. कोल्हापूर), रमिला अत्तार (३०), अमिन अत्तार (३५, दोघे रा. तासगाव) व भगवान पवार (३२, रा. सोलापूर) या चौघांचा मृत्यू झाला. तर अनिल पाटील (रा. शाहुवाडी) हे गंभीर जखमी झाले. जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर सांगली व सोलापूर जिल्ह्यातील एकाच कंपनीत काम करणारे पाच जण मध्यप्रदेशात कामानिमित्त गेले होते. काम आटोपून अयोध्या दर्शन करून परत येत असताना सोमवार सकाळच्या दरम्यान पाचोर सारंगपूरच्या जवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला कारची जोरात धडक झाली. यात दिलदार तांबोळी, रमिला अत्तार, अमिन अत्तार व भगवान पवार या चौघांचा मृत्यू झाला. तर अनिल पाटील हे गंभीर जखमी झाले. जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमीवर पचोर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढले. अपघाताचे वृत्त समजतात तांबोळी व पाटील यांचे कुटुंबीय विमानाने घटनास्थळी रवाना झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAyodhyaअयोध्याAccidentअपघातDeathमृत्यू