शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पन्हाळगडावर आत्महत्येचा प्रयत्न करणारा शाळकरी मुलगा बेशुद्धावस्थेत, नेमके कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 17:45 IST

डोक्याला जबर मार लागल्याने तो बेशुद्धावस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत

पाचगाव (कोल्हापूर): मराठा कॉलनी पाचगाव येथे राहणाऱ्या आठवीत शिकणाऱ्या अभिषेक दिलीप करंजे याने काल, शुक्रवारी पन्हाळागडावरील अंधार बाव टेकडीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो बेशुद्धावस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे नेमकी माहिती मिळाली नाही.शुक्रवारी सकाळी अभिषेक एन.सी.सी साठी शाळेत जाऊन आला. त्यानंतर शाळेला जातो म्हणून दफ्तर घेवून गेला. परंतु तो एस.टी ने थेट पन्हाळगडावर पोहोचला. याठिकाणी त्याने अंधारबाव परिसरातील तटबंदीवरुन उडी मारली. सुदैवाने तो स्मशानभूमीच्या शेडवर पडल्याने त्याचा जीव वाचला. पण त्याला जबर दुखापत झाली असून तो बेशुद्धावस्थेत आहे.शाळेची वेळ झाल्यानंतरही अभिषेक घरी आला नाही म्हणून आईने शोधाशोध केली. परंतू त्याचा काही पत्ता लागला नाही. तोपर्यंत रात्री नऊच्या सुमारास पन्हाळा पोलिसांचा फोन आला आणि अभिषेक पन्हाळगड येथे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला सी.पी.आर येथे दाखल करून तेथून खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.मूळचे सांगलीचे असणारे दिलीप करंजे हे आपल्या कुटुंबासमवेत मराठा कॉलनी पाचगाव येथे गेल्या आठ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ते सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीस आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. अभिषेक हा आठवीच्या वर्गात शिकत असून अत्यंत मनमिळावू स्वभावाचा व अभ्यासात देखील हुशार आहे. त्याने चित्रपट व मालिकेमध्ये देखील काम केले असून त्याला अभिनयाची आवड आहे. परंतु त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? असा प्रश्न नातेवाईकांसह शेजाऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी