शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

गाळपाला जाण्यापूर्वीच ऊस होणार स्वच्छ; उतारा, कारखान्यांची कार्यक्षमता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 16:17 IST

कसाही तोडलेला ऊस चालणार

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : गाळपासाठी येणारा ऊस कारखान्यात येण्यापूर्वीच स्वच्छ करण्याचे नवे तंत्र शोधण्यात आले आहे. ब्राझीलमधील हे नवे तंत्र भारतातही येऊ घातले आहे. ज्यामुळे साखरेचा उतारा वाढण्याबरोबरच महागड्या यंत्रसामग्रीची झीज कमी होऊन कारखान्यांची कार्यक्षमता सुधारणार आहे. भारताची उत्पादनक्षमता वाढण्यासही या तंत्राचा हातभार लागणार आहे.शेतातून तोड होऊन गाळपासाठी जो ऊस येतो त्यासोबत धसकट, कचरा, माती, वाळू, दगडाचे खडे, उसाची मुळे, पाचट हेदेखील येतात. ते गाळपापूर्वी वेगळे करण्याची सोय नसल्याने ऊस तसाच गाळपाला जातो. यामुळे कारखान्यातील महागड्या यंत्रसामग्रीचे नुकसान होते, गाळप क्षमतेवर तसेच साखर उताऱ्यावरही प्रतिकूल परिणाम होतो. याबद्दल महाराष्ट्रातील कारखाने मोळीबांधणी वजावट म्हणून प्रति टन ५ टक्के वजन कमी धरतात. याचा फटका शेतकऱ्यांनाही बसतो.ब्राझीलमध्ये ही धसकटे तसेच नको असलेले इतर पदार्थ कारखान्यात ऊस गाळपाला जाण्यापूर्वीच स्वच्छ करण्याचे तंत्र चार-पाच वर्षांपूर्वी विकसित करण्यात आले आहे. परिणामी, ब्राझीलचा सरासरी साखर उतारा १४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

भारतीय साखर उद्योगाला या तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी येत्या १२ ऑगस्ट रोजी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या तंत्राचे यावेळी सादरीकरणही केले जाणार आहे. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह साखर उद्योगातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कसाही तोडलेला ऊस चालणारमजुराने, यंत्राने अशा कोणत्याही प्रकारे तोडलेला ऊस या तंत्रज्ञानाने स्वच्छ करता येतो, भारतातील साखर कारखान्यांना कार्यक्षमता सुधारण्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकेल, असे राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने