शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

गाळपाला जाण्यापूर्वीच ऊस होणार स्वच्छ; उतारा, कारखान्यांची कार्यक्षमता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 16:17 IST

कसाही तोडलेला ऊस चालणार

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : गाळपासाठी येणारा ऊस कारखान्यात येण्यापूर्वीच स्वच्छ करण्याचे नवे तंत्र शोधण्यात आले आहे. ब्राझीलमधील हे नवे तंत्र भारतातही येऊ घातले आहे. ज्यामुळे साखरेचा उतारा वाढण्याबरोबरच महागड्या यंत्रसामग्रीची झीज कमी होऊन कारखान्यांची कार्यक्षमता सुधारणार आहे. भारताची उत्पादनक्षमता वाढण्यासही या तंत्राचा हातभार लागणार आहे.शेतातून तोड होऊन गाळपासाठी जो ऊस येतो त्यासोबत धसकट, कचरा, माती, वाळू, दगडाचे खडे, उसाची मुळे, पाचट हेदेखील येतात. ते गाळपापूर्वी वेगळे करण्याची सोय नसल्याने ऊस तसाच गाळपाला जातो. यामुळे कारखान्यातील महागड्या यंत्रसामग्रीचे नुकसान होते, गाळप क्षमतेवर तसेच साखर उताऱ्यावरही प्रतिकूल परिणाम होतो. याबद्दल महाराष्ट्रातील कारखाने मोळीबांधणी वजावट म्हणून प्रति टन ५ टक्के वजन कमी धरतात. याचा फटका शेतकऱ्यांनाही बसतो.ब्राझीलमध्ये ही धसकटे तसेच नको असलेले इतर पदार्थ कारखान्यात ऊस गाळपाला जाण्यापूर्वीच स्वच्छ करण्याचे तंत्र चार-पाच वर्षांपूर्वी विकसित करण्यात आले आहे. परिणामी, ब्राझीलचा सरासरी साखर उतारा १४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

भारतीय साखर उद्योगाला या तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी येत्या १२ ऑगस्ट रोजी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या तंत्राचे यावेळी सादरीकरणही केले जाणार आहे. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह साखर उद्योगातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कसाही तोडलेला ऊस चालणारमजुराने, यंत्राने अशा कोणत्याही प्रकारे तोडलेला ऊस या तंत्रज्ञानाने स्वच्छ करता येतो, भारतातील साखर कारखान्यांना कार्यक्षमता सुधारण्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकेल, असे राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने