शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

गाळपाला जाण्यापूर्वीच ऊस होणार स्वच्छ; उतारा, कारखान्यांची कार्यक्षमता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 16:17 IST

कसाही तोडलेला ऊस चालणार

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : गाळपासाठी येणारा ऊस कारखान्यात येण्यापूर्वीच स्वच्छ करण्याचे नवे तंत्र शोधण्यात आले आहे. ब्राझीलमधील हे नवे तंत्र भारतातही येऊ घातले आहे. ज्यामुळे साखरेचा उतारा वाढण्याबरोबरच महागड्या यंत्रसामग्रीची झीज कमी होऊन कारखान्यांची कार्यक्षमता सुधारणार आहे. भारताची उत्पादनक्षमता वाढण्यासही या तंत्राचा हातभार लागणार आहे.शेतातून तोड होऊन गाळपासाठी जो ऊस येतो त्यासोबत धसकट, कचरा, माती, वाळू, दगडाचे खडे, उसाची मुळे, पाचट हेदेखील येतात. ते गाळपापूर्वी वेगळे करण्याची सोय नसल्याने ऊस तसाच गाळपाला जातो. यामुळे कारखान्यातील महागड्या यंत्रसामग्रीचे नुकसान होते, गाळप क्षमतेवर तसेच साखर उताऱ्यावरही प्रतिकूल परिणाम होतो. याबद्दल महाराष्ट्रातील कारखाने मोळीबांधणी वजावट म्हणून प्रति टन ५ टक्के वजन कमी धरतात. याचा फटका शेतकऱ्यांनाही बसतो.ब्राझीलमध्ये ही धसकटे तसेच नको असलेले इतर पदार्थ कारखान्यात ऊस गाळपाला जाण्यापूर्वीच स्वच्छ करण्याचे तंत्र चार-पाच वर्षांपूर्वी विकसित करण्यात आले आहे. परिणामी, ब्राझीलचा सरासरी साखर उतारा १४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

भारतीय साखर उद्योगाला या तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी येत्या १२ ऑगस्ट रोजी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या तंत्राचे यावेळी सादरीकरणही केले जाणार आहे. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह साखर उद्योगातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कसाही तोडलेला ऊस चालणारमजुराने, यंत्राने अशा कोणत्याही प्रकारे तोडलेला ऊस या तंत्रज्ञानाने स्वच्छ करता येतो, भारतातील साखर कारखान्यांना कार्यक्षमता सुधारण्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकेल, असे राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने