शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

Kolhapur: अधिवेशन संपण्यापूर्वी सुळकुड योजनेसंदर्भात बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 14:10 IST

आमदार राहुल आवाडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली 

इचलकरंजी : शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारी सुळकुड योजना कार्यान्वित करण्यासाठी विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण होण्याअगोदर बैठक लावून तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये मंगळवारी दिले. इचलकरंजी विधानसभेचे आमदार राहुल आवाडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. त्या लक्षवेधीवर सभागृहामध्ये चर्चा झाली. त्यावेळी फडणवीस आणि नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी उत्तरे दिली. इचलकरंजी शहराला कृष्णा व पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा होतो. कृष्णा नदीतून येणाऱ्या पाण्यासाठी १८.६०० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र या जलवाहिनीस वारंवार गळती लागते. सन २०२२-२३ मध्ये सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत साडेपाच किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलण्याचे काम इलेकॉन एनर्जी या कंपनीला दिले आहे. मात्र दोन वर्षे झाले तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही त्यांच्यावर कारवाई करावी व त्या कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे अशी मागणी आवडे यांनी केली. त्यावर मंत्री सामंत यांनी उत्तर देताना म्हणाले, १.९ किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. संबंधित यंत्रणेला लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले जातील. तसेच सुळकुड पाणी योजने संदर्भात बैठक लावून अंमलबजावणी करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. यावर समाधान न झालेले आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात बैठक घ्यावी अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले, त्यांनी नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिवेशन संपण्याअगोदर बैठक घेऊन असे आश्वासन दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीWaterपाणीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा