शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये द्या; कोल्हापुरात राजू शेट्टींची धडक, कारखानदारांना 'धडकी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 16:25 IST

पवार यांच्या पोस्टरवरून झटापट

कोल्हापूर : गेल्या वर्षात साखरेच्या दरात प्रतिक्विंटल पाचशे रुपयांची वाढ झाल्याने साखर कारखान्यांकडे एफआरपी देऊन पैसे शिल्लक आहेत. त्यातील प्रतिटन चारशे रुपयांची मागणी करतोय, पण राज्यातील एकही कारखानदार याबाबत बोलण्यास तयार नाही. पैसे देणार नसाल तर तुमच्या नरड्यावर (गळ्यावर) पाय देऊन कसे वसूल करायचे हे माहिती आहे. दसऱ्यापर्यंत साखर कारखानदारांनी चारशे रुपये द्यावेत, अन्यथा मुहूर्तावर पेटवलेल्या बॉयलरमध्ये संचालकांना फेकून देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन चारशे रुपये द्या, वजनकाटे डिजिटल करा, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यामध्ये कोल्हापूर व सागंली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ताराराणी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली, शाहू मार्केट यार्ड येथे झालेल्या सभेत राजू शेट्टी यांनी साखर कारखानदार व राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढले. शेट्टी म्हणाले, रंगराजन समितीच्या सूत्रानुसार शेतकऱ्यांना हिशोब दिला पाहिजे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून कारखान्यांचा हिशोब करण्यास सरकारला वेळच नाही. त्यामुळे, आता शेतकरी सांगतील तोच हिशोब, किती पोलिस आणायचे ते आणा, असे दोन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठणकावून सांगितले आहे. जर, सोमेश्वर व मालेगाव साखर कारखाने ११.७० टक्के उताऱ्याला ३४११ रुपये देत असतील आमच्या १२.५० उताऱ्याला किती मिळाले पाहिजेत? केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या धोरणांमुळे हे शक्य झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगत असतील तर त्यांनी इतर कारखानदारांनाही ते पैसे देण्यास सांगावे.प्रादेशिक साखर उपसंचालक गोपाळ मावळे यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापूर विभागातील बहुतांशी कारखान्यांनी डिजिटल काटे बसवले आहेत, चार राहिले असून, त्यांनाही लवकर बसवण्याच्या सूचना केल्या जातील, अशी ग्वाही गोपाळ मावळे यांनी दिली. ‘स्वाभिमानी’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्याणवर, महेश खराडे, वैभव कांबळे, संदीप राजाेबा, अजित पोवार, जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर, जनार्दन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

मग, साखरेचा हिशोब जागतिक बाजारपेठेनुसार का नाही?जागतिक बाजारपेठेत रासायनिक खतांच्या किमती वाढत असल्याने आणखी दर वाढतील असे कंपन्या सांगत आहेत. खतांचा दर जागतिक बाजारपेठेनुसार अवलंबून असेल तर साखरेला हा नियम का नाही, असा सवाल शेट्टी यांनी केला.

२ ऑक्टोबरपासून साखर वाहतूक बंदकारखानदारांनी २ ऑक्टोबरपर्यंत चारशे रुपयांबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा कारखान्यातून साखरेचा एक कणही बाहेर सोडणार नाही. साखर वाहतूक करणाऱ्यांनी त्याच्या भानगडीत पडू नये, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

तरणाबांड मुलगा द्या, पुढचे मी बघतोप्रत्येक कुटुंबातील २२-२३ वर्षांचा तरणाबांड एक मुलगा द्या, मग चारशे काय सहाशे रुपये कसे घ्यायचे ते मी बघतो. बापाला तोट्यात घालणाऱ्यांना मातीत कसे गाडायचे हे त्याला शिकवतो, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

आंदोलनाची पुढची दिशासाखर आयुक्तांना भेटून चारशे रुपयांची मागणी करणारमोटारसायकल रॅलीद्वारे प्रत्येक कारखान्यांना निवेदन२ ऑक्टोबरला कारखान्यांवर ढोल-ताशा घेऊन कारखानदारांना जागे करात्यानंतर कारखान्यातून होणारी साखर वाहतूक बंद

पवार यांच्या पोस्टरवरून झटापट‘स्वाभिमानी’च्या मोर्चात ‘दादा हे असंच ना..’ या आशयाचे पोस्टर झळकावले. हे पाहून पोलिसांनी ते काढून घेतले. या वेळी शेतकरी व पाेलिसांत थोडी झटापटी झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी