शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये द्या; कोल्हापुरात राजू शेट्टींची धडक, कारखानदारांना 'धडकी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 16:25 IST

पवार यांच्या पोस्टरवरून झटापट

कोल्हापूर : गेल्या वर्षात साखरेच्या दरात प्रतिक्विंटल पाचशे रुपयांची वाढ झाल्याने साखर कारखान्यांकडे एफआरपी देऊन पैसे शिल्लक आहेत. त्यातील प्रतिटन चारशे रुपयांची मागणी करतोय, पण राज्यातील एकही कारखानदार याबाबत बोलण्यास तयार नाही. पैसे देणार नसाल तर तुमच्या नरड्यावर (गळ्यावर) पाय देऊन कसे वसूल करायचे हे माहिती आहे. दसऱ्यापर्यंत साखर कारखानदारांनी चारशे रुपये द्यावेत, अन्यथा मुहूर्तावर पेटवलेल्या बॉयलरमध्ये संचालकांना फेकून देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन चारशे रुपये द्या, वजनकाटे डिजिटल करा, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यामध्ये कोल्हापूर व सागंली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ताराराणी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली, शाहू मार्केट यार्ड येथे झालेल्या सभेत राजू शेट्टी यांनी साखर कारखानदार व राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढले. शेट्टी म्हणाले, रंगराजन समितीच्या सूत्रानुसार शेतकऱ्यांना हिशोब दिला पाहिजे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून कारखान्यांचा हिशोब करण्यास सरकारला वेळच नाही. त्यामुळे, आता शेतकरी सांगतील तोच हिशोब, किती पोलिस आणायचे ते आणा, असे दोन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठणकावून सांगितले आहे. जर, सोमेश्वर व मालेगाव साखर कारखाने ११.७० टक्के उताऱ्याला ३४११ रुपये देत असतील आमच्या १२.५० उताऱ्याला किती मिळाले पाहिजेत? केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या धोरणांमुळे हे शक्य झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगत असतील तर त्यांनी इतर कारखानदारांनाही ते पैसे देण्यास सांगावे.प्रादेशिक साखर उपसंचालक गोपाळ मावळे यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापूर विभागातील बहुतांशी कारखान्यांनी डिजिटल काटे बसवले आहेत, चार राहिले असून, त्यांनाही लवकर बसवण्याच्या सूचना केल्या जातील, अशी ग्वाही गोपाळ मावळे यांनी दिली. ‘स्वाभिमानी’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्याणवर, महेश खराडे, वैभव कांबळे, संदीप राजाेबा, अजित पोवार, जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर, जनार्दन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

मग, साखरेचा हिशोब जागतिक बाजारपेठेनुसार का नाही?जागतिक बाजारपेठेत रासायनिक खतांच्या किमती वाढत असल्याने आणखी दर वाढतील असे कंपन्या सांगत आहेत. खतांचा दर जागतिक बाजारपेठेनुसार अवलंबून असेल तर साखरेला हा नियम का नाही, असा सवाल शेट्टी यांनी केला.

२ ऑक्टोबरपासून साखर वाहतूक बंदकारखानदारांनी २ ऑक्टोबरपर्यंत चारशे रुपयांबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा कारखान्यातून साखरेचा एक कणही बाहेर सोडणार नाही. साखर वाहतूक करणाऱ्यांनी त्याच्या भानगडीत पडू नये, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

तरणाबांड मुलगा द्या, पुढचे मी बघतोप्रत्येक कुटुंबातील २२-२३ वर्षांचा तरणाबांड एक मुलगा द्या, मग चारशे काय सहाशे रुपये कसे घ्यायचे ते मी बघतो. बापाला तोट्यात घालणाऱ्यांना मातीत कसे गाडायचे हे त्याला शिकवतो, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

आंदोलनाची पुढची दिशासाखर आयुक्तांना भेटून चारशे रुपयांची मागणी करणारमोटारसायकल रॅलीद्वारे प्रत्येक कारखान्यांना निवेदन२ ऑक्टोबरला कारखान्यांवर ढोल-ताशा घेऊन कारखानदारांना जागे करात्यानंतर कारखान्यातून होणारी साखर वाहतूक बंद

पवार यांच्या पोस्टरवरून झटापट‘स्वाभिमानी’च्या मोर्चात ‘दादा हे असंच ना..’ या आशयाचे पोस्टर झळकावले. हे पाहून पोलिसांनी ते काढून घेतले. या वेळी शेतकरी व पाेलिसांत थोडी झटापटी झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी