शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

खासगी, जंगल क्षेत्रातील वणव्याचा झालायं वणवाच; जैवविविधता, काजू-आंब्याच्या बागा होरपळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 13:49 IST

काजू व आंब्याच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्ने उध्वस्त

सदाशिव मोरेआजरा : आजरा परिसरात होळीच्या पार्श्वभूमीवर खासगी जमिनीसह जंगल परिसरात लागलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता नष्ट झाली आहे. वणव्यात हजारो  स्थानिक प्रजातीच्या झाडांसह काजू व आंब्याच्या बागा होरपळल्या आहेत. वाढल्यामुळे काजू व आंब्याच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्ने जमीनदोस्त झाली आहेत.गेल्या आठ दिवसापासून आजरा तालुक्यात सुरू असलेला वणवा अद्याप संपलेला नाही. दररोज खाजगी जमिनीसह जंगल क्षेत्राला आग लागलेलीच आहे. दुपारच्या वेळात लागलेली आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांसह वन कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. मात्र उन्हाचा तडाका व जोरदार वाऱ्यामुळे क्षणात आग सर्वत्र पसरत आहे. आगीचे लोट ३० ते ३५  फूट उंचीवर जात आहेत. त्यामुळे आग विझवण्यातही अडचणी येत आहे.वणव्यामुळे सरपटणारे प्राणी, लहानपक्षी व त्यांची घरटी जळून जात आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेला व मुबलक जैवविविधता असलेल्या आजऱ्यातील जैवविविधता नष्ट होत आहे. वन विभागाच्यावतीने जंगलांना आग लागू नये म्हणून जाळ रेषा काढली आहे मात्र या जाळ रेषेच्या आतमध्येही जंगलांना आग लागली आहे. सोहळे, वझरे, मडिलगे, सुलगाव, चांदेवाडी, लाटगांव, चित्री धरण परिसरात जंगलांसह खासगी क्षेत्रात लागलेला वणवा आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. गेल्या आठ दिवसापासून होळीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सर्वत्रच वणवे लागल्यामुळे शेतकऱ्यांसह वन विभागाला या वणव्यांचा वणवा झाला आहे.

वणव्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नसर्वत्र वणवे लागल्यामुळे जनावरांचे गवत व पिंजर जळून खाक झाले आहे. वर्षभरासाठी लागणारे गवत व पिंजर साठवून ठेवलेले आहे. मात्र गवतालाच वणवे लागल्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

पिकांच्या उत्पन्नावर पाहिलेली स्वप्ने उध्वस्तकाजू व आंब्याच्या बागांना पोषक वातावरणामुळे चांगला मोहोर आला होता. मात्र वणव्यामुळे अनेक ठिकाणच्या काजू व आंब्याच्या बागा जळाल्या आहेत. त्यामुळे काजू व आंब्याच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्ने चालू वर्षी उध्वस्त झाली आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगलfireआग