शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

कोल्हापुरातील फॅशन डिझायनर मुलीने शेतकरी तरुणाशी बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 13:28 IST

शेतकरी मुलगा नकोला दिला फाटा 

शिरोळ (जि. कोल्हापूर) : सध्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नावरून मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शिक्षित तरुणी शेतकरी मुलगा करून घेण्यास नकार देतात, हे चित्र असताना शिरोळ तालुक्यातील जांभळी गावातील फॅशन डिझायनर असलेल्या गायत्री यादवने शेतकरी तरुणाशी विवाह करून इतर मुलींसमोर आदर्श घालून दिला आहे.‘शेतकरी मुलगा नको गं बाई’ हेच वाक्य मुलींच्या तोंडून ऐकायला मिळते. शेतकरी कुटुंबदेखील आपल्या मुलीला शेतकरी मुलाला द्यायला तयार नाहीत, हे आजचे चित्र आहे. मुलगा नोकरदारच हवा, मोठ्या कंपनीत नोकरी करणारा हवा, अशी मुलींबरोबर त्यांच्या कुटुंबियांची अपेक्षा आहे. तसेच शेतकऱ्याला आपल्या मुलाच्या लग्नासाठी पै-पाहुण्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी मुलांची लग्न ठरत नाहीत, हे वास्तव चित्र आहे. दरम्यान, जांभळी (ता. शिरोळ) येथील गायत्री यादव या सुशिक्षित युवतीने शेतकरी नवरा निवडला आहे. गावातीलच अनिल कदम या पदवीधर शेतकरी तरुणासोबत लग्नदेखील थाटामाटात पार पडले. गायत्री ही पदवीधर आहे. पदवीनंतर तिने फॅशन डिझायनरचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

शिरोळ येथील दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी शेतकरी नवरा करून घ्यावा, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी शेतकरी मुलाशी विवाह केला. माझे वडील नोकरदार आहेत. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून, देश हा शेतीवरच चालत आहे. त्यामुळे शेतकरी हा राजा असून, त्याची मी राणी झाले आहे. - गायत्री यादव, नवविवाहिता, जांभळी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नFarmerशेतकरी