शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कोल्हापुरातील फॅशन डिझायनर मुलीने शेतकरी तरुणाशी बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 13:28 IST

शेतकरी मुलगा नकोला दिला फाटा 

शिरोळ (जि. कोल्हापूर) : सध्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नावरून मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शिक्षित तरुणी शेतकरी मुलगा करून घेण्यास नकार देतात, हे चित्र असताना शिरोळ तालुक्यातील जांभळी गावातील फॅशन डिझायनर असलेल्या गायत्री यादवने शेतकरी तरुणाशी विवाह करून इतर मुलींसमोर आदर्श घालून दिला आहे.‘शेतकरी मुलगा नको गं बाई’ हेच वाक्य मुलींच्या तोंडून ऐकायला मिळते. शेतकरी कुटुंबदेखील आपल्या मुलीला शेतकरी मुलाला द्यायला तयार नाहीत, हे आजचे चित्र आहे. मुलगा नोकरदारच हवा, मोठ्या कंपनीत नोकरी करणारा हवा, अशी मुलींबरोबर त्यांच्या कुटुंबियांची अपेक्षा आहे. तसेच शेतकऱ्याला आपल्या मुलाच्या लग्नासाठी पै-पाहुण्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी मुलांची लग्न ठरत नाहीत, हे वास्तव चित्र आहे. दरम्यान, जांभळी (ता. शिरोळ) येथील गायत्री यादव या सुशिक्षित युवतीने शेतकरी नवरा निवडला आहे. गावातीलच अनिल कदम या पदवीधर शेतकरी तरुणासोबत लग्नदेखील थाटामाटात पार पडले. गायत्री ही पदवीधर आहे. पदवीनंतर तिने फॅशन डिझायनरचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

शिरोळ येथील दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी शेतकरी नवरा करून घ्यावा, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी शेतकरी मुलाशी विवाह केला. माझे वडील नोकरदार आहेत. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून, देश हा शेतीवरच चालत आहे. त्यामुळे शेतकरी हा राजा असून, त्याची मी राणी झाले आहे. - गायत्री यादव, नवविवाहिता, जांभळी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नFarmerशेतकरी