शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोल्हापुरातील शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना लिहिलं रक्ताने पत्र, केली 'ही' मागणी; अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 13:21 IST

थकबाकीदार कर्जदारांचे कर्ज माफ झाले मात्र कर्जाची परतफेड करणारा शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे.

कुरुंदवाड :  प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचे अनुदान मिळावे, अशी मागणी शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतकरी विश्वास बालीघाटे यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. अनुदान न मिळाल्यास बेमुदत प्राणांतिक उपोषण करण्याचा इशाराही पत्रात लिहिले आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याच्या या पत्राची मुख्यमंत्री दखल घेणार की केराची टोपली दाखविणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.2019 च्या महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची तत्कालीन सरकारने कर्जमाफी केली होती. तर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. थकबाकीदार कर्जदारांचे कर्ज माफ झाले मात्र कर्जाची परतफेड करणारा शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जाहीर करण्यात आलेला 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी बालीघाटे यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून अनुदान मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याच्या मागणीची दखल मुख्यमंत्री घेतात की या पत्राला केराची टोपली दाखवली जाते याकडे येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीEknath Shindeएकनाथ शिंदे