शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कोल्हापुरातील शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना लिहिलं रक्ताने पत्र, केली 'ही' मागणी; अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 13:21 IST

थकबाकीदार कर्जदारांचे कर्ज माफ झाले मात्र कर्जाची परतफेड करणारा शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे.

कुरुंदवाड :  प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचे अनुदान मिळावे, अशी मागणी शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतकरी विश्वास बालीघाटे यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. अनुदान न मिळाल्यास बेमुदत प्राणांतिक उपोषण करण्याचा इशाराही पत्रात लिहिले आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याच्या या पत्राची मुख्यमंत्री दखल घेणार की केराची टोपली दाखविणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.2019 च्या महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची तत्कालीन सरकारने कर्जमाफी केली होती. तर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. थकबाकीदार कर्जदारांचे कर्ज माफ झाले मात्र कर्जाची परतफेड करणारा शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जाहीर करण्यात आलेला 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी बालीघाटे यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून अनुदान मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याच्या मागणीची दखल मुख्यमंत्री घेतात की या पत्राला केराची टोपली दाखवली जाते याकडे येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीEknath Shindeएकनाथ शिंदे