शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पोषण आहार घोटाळा प्रकरणी फौजदारी दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 15:41 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार योजनेतर्गंत काम करणाऱ्या स्वयंपाकी, मदतनीस मानधन अपहाराची (घोटाळ्याची) रक्कम ...

कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार योजनेतर्गंत काम करणाऱ्या स्वयंपाकी, मदतनीस मानधन अपहाराची (घोटाळ्याची) रक्कम आपल्या वेगवेगळ्या १३ बँक खात्यावर २८ लाख ८९ हजार ३४० रुपये वर्ग करून घेणाऱ्या आठ जणांविरोधात प्रशासन फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे.चौकशी समितीचे अध्यक्ष वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांना गुरुवारी अहवाल दिल्यानंतर घोटाळ्यातील दोषी आठ जणांविरोधात कारवाईकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर त्या आठ जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.शालेय पोषण आहाराचे लेखाधिकारी दीपक माने यांना १४ एप्रिल २०२४ रोजी इंद्रजित साठे यांच्यासह आठ जणांनी अपहरण केले. स्वयंपाकी, मदतनीस यांच्या मानधन निधीतील २३ लाख रकमेचा अपहार कबूल करण्यासाठी आणि त्यातील दहा लाखांच्या मागणीसाठी अपहरण झाल्याची पोलिसांत नोंद झाली. त्यानंतर पोषण आहार योजनेतील घोटाळा चव्हाट्यावर आला.त्याची चौकशीसाठी स्थापन झालेल्या समितीने २०२१-२०२२ ते वर्ष २०२३-२०२४ या तीन वर्षांच्या कालावधीत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत काम करीत असलेल्या स्वयंपाकी, मदतनीस यांच्या मानधनाची मागणी आणि प्रत्यक्ष पैसे दिलेल्यांची पडताळणी केली. पडताळणीत ८ व्यक्तींच्या १३ वेगवेगळ्या बँक खात्यावरून २८ लाख ८९ हजार ३४० इतकी रक्कम शासकीय योजनेतून परस्पर वर्ग केल्याचे आढळून आले.परिणामी, घोटाळ्यात ८ जणांचा थेट सहभाग असल्याचे पुढे आले आहे. अहवाल सादर होताक्षणी या आठ जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल झालेच पाहिजे, इतके हे गंभीर प्रकरण आहे; पण सीईओ कार्तिकेयन यांच्याकडे अहवाल सादर होऊन दुसरा दिवस उलटला तरी अजून फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, शुक्रवारी फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधीच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत.

कारवाईसाठी वरिष्ठांकडे अहवालघोटाळ्यात कंत्राटी कर्मचारी तेजस्विनी साठे यांना प्रकरण उघड झाल्यानंतर कार्यमुक्त केले आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा लेखाधिकारी माने यांनाही शालेय पोषण आहार लेखाधिकारी पदावरून कार्यमुक्त केले. माने वर्ग दोनचे अधिकारी आहेत. त्यांच्यावर कारवाईचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

दोघेही कार्यमुक्त, घोटाळ्यातील रक्कम वसूल कशी करणार ?शालेय पोषण आहारचे प्रमुख प्रशासकीय काम करणारे माने आणि साठे सध्या दोघेही कार्यमुक्त आहेत. यामुळे अपहाराची २८ लाखांवरील रक्कम वसूल करणे आव्हानात्मक आहे. यासाठी प्रशासन काय भूमिका घेणार यासंबंधीची उत्सुकता लागून राहिली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद