शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रतिचेरापुंजी असलेल्या किटवडे परिसरात ४ दिवसात ८१६ मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 12:03 IST

Rain Ajra Kolhapur- आजरा तालुक्यात गेल्या ४ दिवसात सरासरी ४३७ मि.मी.पाऊस झाला आहे. तर प्रती चेरापुंजी असलेल्या किटवडे येथील पर्जन्यमापक यंत्रात ८१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २० वर्षात इतका उच्चांकी पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्याच पावसाने तालुक्यातील एरंडोळ व धनगरवाडी धरणे भरली आहेत.तर आजरा गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेल्या चित्री प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा झाला आहे.

ठळक मुद्देप्रतिचेरापुंजी असलेल्या किटवडे परिसरात ४ दिवसात ८१६ मि.मी. पाऊस वीस वर्षातील उच्चांकी पाऊस.

सदाशिव मोरेआजरा -आजरा तालुक्यात गेल्या ४ दिवसात सरासरी ४३७ मि.मी.पाऊस झाला आहे. तर प्रती चेरापुंजी असलेल्या किटवडे येथील पर्जन्यमापक यंत्रात ८१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २० वर्षात इतका उच्चांकी पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्याच पावसाने तालुक्यातील एरंडोळ व धनगरवाडी धरणे भरली आहेत.तर आजरा गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेल्या चित्री प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा झाला आहे.कोल्हापूर व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला आजरा तालुक्यातील किटवडे हे गाव आहे.या परिसरात प्रतिवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी दररोज १५० ते २०० मि.मी. पाऊस पडतो.

चालू वर्षीही जून महिन्यात चार दिवस पडलेल्या उच्चांकी पावसाने धरणे भरली असून ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत.मुसळधार पडलेल्या पावसाने भात पेरणी व टोकणणी केलेल्या जमिनीत पाणी तुंबले आहे. तर आजरा परिसर व पश्चिम भागात भात रोप लागणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.किटवडे धनगरवाड्याच्या पठारावर प्रतिवर्षी कास पठाराप्रमाणे विविध प्रकारची फुलेही फुललेले असतात. या परिसरातील निसर्ग पर्यटकांना साद घालत असतो. पावसात ओलं चिंब भिजण्यासाठी पर्यटक प्रतिवर्षी येत असतात. मात्र कोरोनामुळे दोन वर्षात निसर्गाचा आस्वाद घेण्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. दररोज पडणाऱ्या मुसळधार पावसाने या परिसरात भात व उसाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते.

प्रतिवर्षी अतिवृष्टीचा पाऊस व ऊसावर पडणारा तांबेरा रोग यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. अतिपावसाने हेक्‍टरी उसाचे उत्पादन कमी होते तर भाताचे उत्पादन चांगले येते मात्र त्याला दर मिळत नाही अशी विचित्र अवस्था आहे.

निसर्ग सौंदर्याने नटलेला व सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेले किटवडे, घाटकरवाडी, सुळेरान व आंबाडे हा परिसर पाहण्यासाठी प्रतिवर्षी पर्यटकांची हाउसफुल्ल गर्दी असते. आजरा - आंबोली मार्गावर घाटकरवाडी फाट्यापासून तीन कि.मी. अंतरावर किटवडे हे गाव असून अतिवृष्टी व फुलणाऱ्या फुलांमुळे काही तरुणांना रोजगारही मिळाला आहे.किटवडे परिसरात गेल्या चार वर्षात १६ ते १९ जून दरम्यान पडलेला पाऊस

  • २०१८ - १२० मि.मी.
  • २०१९ - ८० मि.मी.
  • २०२० - २१० मि. मी.
  • २०२१ - ८१६ मि. मी.

आजरा तालुक्यात गेल्या चार वर्षात 16 ते 19 जून दरम्यान पडलेला सरासरी पाऊस

  • २०१८ - १२ मि. मी.
  • २०१९ - ६ मि. मी.
  • २०२० - १९० मि. मी.
  • २०२१ - ४३७ मि. मी.

किटवडे परिसरातील जूनअखेरचा चार वर्षातील पाऊस

  • २०१८ - ९१२ मि. मी.
  • २०१९ - ४९१ मि. मी.
  • २०२० - १४०६ मि. मी.
  • २०२१ - १९४६ मि. मी. ( २० जून २०२१ अखेर ).
टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर