शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Rain Update: मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली; कुठं, कोणत्या मार्गावर आले पाणी..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:10 IST

घाट मार्गात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

कोल्हापूर : जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांत धुवाधार पावसाने हजेरी लावली आहे. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने प्रतिसेकंद ११,५०० घनफूट व सर्वच धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी ३६.०० फुटांवरून वाहत आहे. तब्बल ८० बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. घाट मार्गात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.वेतवडे, मांडुकली, शेणवडे बंधारे पाण्याखाली, तीन घरे कोसळलीगगनबावडा : तालुक्यात अतिवृष्टी सुरू असल्याने कुंभी व सरस्वती नदीलापूर आला असून, वेतवडे, मांडुकली, शेणवडे व असळज येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर तिसंगी पैकी टेकवाडीचा थेट संपर्क तुटला आहे. यापूर्वीच कोदे, अणदूर व वेसरफ लघू प्रकल्प शंभर टक्के भरले असून, कुंभी प्रकल्प ९६ टक्के भरला आहे. कुंभी धरण परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. ''कुंभी'' प्रकल्पातून एकूण १६१० क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कुंभी व सरस्वती नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तीन घरे कोसळून नुकसानअतिवृष्टीने रविवारी दुपारी कोदे बुद्रुक येथील बाळाबाई सदाशिव संकपाळ यांच्या राहत्या घराची एक खोली कोसळली. सुदैवाने घरातील सर्व सदस्य शेतात गेल्याने जीवितहानी टळली. मात्र, घरगुती साहित्याचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मांडुकली येथील विष्णू बाबू कांबळे यांच्या घराचे छत कोसळले. सैतवडे येथील कृष्णात धोंडीराम हाप्पे यांच्या राहत्या घराचे छप्पर कोसळून नुकसान झाले.

पिरळ पूल पाण्याखाली ; जनजीवन विस्कळीतकसबा तारळे : राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरु असल्याने भोगावती नदीला यावर्षी तिसऱ्यांदा पूर आला असून नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. दरम्यान, राधानगरीकडे जाणाऱ्या पडळी पाठोपाठ पिरळ येथील पुलावर पाणी आल्याने राधानगरीकडे होणारी वाहतूक कसबा तारळे, खिंडी व्हरवडे मार्गे वळविण्यात आली आहे. परिणामी वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी काठावरील शेतीचे मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेले आहे. ओढे, नदी, नाले दुथडी भरून पाहू लागले आहेत. पावसाची संततधार अशीच सुरू राहिली तर पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसामुळे अनेक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. विद्युत पुरवठाही वारंवार खंडित होत आहे.दत्तवाड-एकसंबा, दत्तवाड-मलिकवाड बंधारे पाण्याखालीनृसिंहवाडी / दत्तवाड : सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात होणारा पाऊस व धरणातून होणारे विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाणी पातळी तब्बल नऊ फुटाणे वाढ झाली असून नदीचे पाणी येथील दत्त मंदिरापर्यंत पोहोचले आहे.दत्तवाड-एकसंबा व दत्तवाड-मलिकवाड हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यावर्षी पाचव्यांदा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसात कोकणात सुरू असलेल्या पावसामुळे काळम्मावाडी धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रात पाणी वाढले असून बंधारे पाण्याखाली गेल्याने दत्तवाड-मलिकवाड व दत्तवाड-एकसंबा हे मार्ग बंद झाले आहेत.गडहिंग्लज तालुक्यातील दोन बंधारे पाण्याखालीगडहिंग्लज : तालुक्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीवरील निलजी व ऐनापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्यास गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील भडगाव पूल पाण्याखाली जाऊन गडहिंग्लज-चंदगडचा थेट संपर्क तुटण्याची शक्यता आहे. आजरा व आंबोली परिसरात सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे हिरण्यकेशी पात्राबाहेर पडली असून, नदीकाठच्या गावांना व नागरिकांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.करवीर तालुक्यातील सात बंधारे पाण्याखालीकोपार्डे : करवीर तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम, शिंगणापूर, कोगे खडक, बहिरेश्वर-कोगे, सांगरूळ, आरे, वरणगे-चिखली हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने व राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडल्याने करवीर तालुक्यातील चारही नदीपात्रांतील पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.महापालिकेकडून दरवर्षी शिंगणापूर बंधाऱ्याचे बरगे काढण्यासाठी दुर्लक्ष केले जाते. या वर्षीही केवळ तीन-चार थराने बरगे काढल्याने पाणीपातळी वाढून नदीकाठच्या शेतात पाणी शिरून ऊस पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शिंगणापूर, चिखली, पाडळी बु।, नागदेववाडी, हणमंतवाडी गावांतील नदीकाठावरील शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.