शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

अपात्रतेतील वसूल व्याजाचे ६३ कोटी सेवा संस्थांच्या खात्यावर वर्ग केले, कोल्हापूर जिल्हा बँक राज्यात पहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 13:31 IST

जिल्हा बँकेचा बूस्टर डोस : दहा लाखांपर्यंतच्या अपात्र शेतकऱ्यांना मिळणार पीककर्ज

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटींचे विकास संस्थांकडून वसूल केलेले ६३ कोटी व्याज गुरुवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सेवा संस्थांच्या खात्यावर वर्ग केले. अपात्र कर्जमाफीमुळे अनिष्ट दुराव्यात गेलेल्या संस्थांना बँकेने आर्थिक वर्षाअखेर बूस्टर डोस दिला. त्याचबरोबर दहा लाखांपर्यंतच्या अपात्र शेतकऱ्यांना पीककर्जही देण्याचा निर्णय घेतला आहे.           केंद्र सरकारने २००८ मध्ये ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. कोल्हापुरातील शेतकऱ्यांनाही २७९ कोटी माफी मिळाली होती; पण कर्जमाफीवर तक्रार झाल्यानंतर ‘नाबार्ड’ने तपासणी करून त्यातील ४४ हजार ६५९ खातेदारांचे ११२ कोटी ८९ लाख रुपये अपात्र ठरवले होते.उच्च न्यायालयाने कर्जमाफी पात्र ठरवली; पण ‘नाबार्ड’ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, यावर सुनावणी सुरू आहे; पण या ११२ कोटी अपात्र रक्कम सेवा संस्थांकडून रक्कम व व्याजासह वसूल केल्याने संस्था अडचणीत आल्या. बँकेने व्याजापोटी वसूल केलेले ६३ कोटी देण्याचा निर्णय मंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला होता. त्यानुसार ही रक्कम संस्थांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.

पहिली जिल्हा बँककोणत्याही कारणाने विकास संस्थांकडून पर्यायाने शेतकऱ्यांकडून वसूल केलेले व्याज परत करणारी ‘केडीसीसी’ बँक ही राज्यातील पहिली जिल्हा बँक ठरली आहे.

पंधरा दिवसांत माहिती संकलनसंचालक मंडळाच्या बैठकीत व्याज परताव्याचा निर्णय झाला आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सणांसह शासकीय सुटीदिवशीही शाखेत काम करून अवघ्या पंधरा दिवसांत माहिती संकलित केली. त्यामुळेच आर्थिक वर्षाच्या अगोदर संस्थांच्या खात्यावर पैसे वर्ग करता आले.

एकरकमी कर्जफेड योजना सुरू..!अपात्र ३० हजार २६२ खातेदार शेतकऱ्यांनी कर्जमाफीची रक्कम परत केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल झाल्यानंतर हे पैसे संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उर्वरित शेतकऱ्यांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरू केली आहे. त्यानुसार मुद्दलाइतपत व्याज भरपाई केल्यास त्यांच्या क्षेत्रावरील कर्जाचा बोजा कमी करून त्यांना नवीन कर्जपुरवठा करण्यात येईल.

संचालक मंडळाने सभासद पातळीवर शिल्लक थकबाकी ६३ कोटी बँक स्तरावर स्वतंत्र ठेवून त्यावरील व्याज आकारणी व वसुली स्थगितीचा निर्णय घेतला. या निर्णयाने विकास संस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर अपात्र कर्जमाफीची रक्कमही शेतकऱ्यांना मिळणार आहे. - हसन मुश्रीफ, (अध्यक्ष, जिल्हा बँक, कोल्हापूर)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकFarmerशेतकरीHasan Mushrifहसन मुश्रीफ