शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

कोल्हापूर जिल्ह्यात ६१ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव; संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त - विशेष पोलिस महानिरीक्षक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 11:48 IST

कोल्हापूर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. परकीय नागरिकांसंदर्भात ...

कोल्हापूर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. परकीय नागरिकांसंदर्भात केंद्र सरकारकडून आलेल्या निर्देशानुसार तत्काळ अंमलबजावणी केली जात आहे, ही माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.महानिरीक्षक फुलारी म्हणाले, पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्याच्या वरिष्ठ कार्यालयाला सूचना केल्या आहेत. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्वच पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महानिरीक्षकांच्या बैठका झाल्या आहेत. गुप्तचर विभाग, सायबर, दहशतवादविरोधी पथकाकडून खबरदारी घेतली जात आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण जिल्ह्यात सामाजिक शांतता राखण्यासाठी पोलिस योग्य ती खबरदारी घेत आहेत. काही संशयित परकीय नागरिक आढळल्यास त्याची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला देण्याचे आवाहनही केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना सूचना केल्या आहेत.

प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात ६१ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य आहे. दीर्घ मुदतीच्या व्हिसाच्या आधारे यांचे अधिकृतरीत्या वास्तव्य आहे. यामध्ये तीन मुस्लिम महिला तर उर्वरित हिंदूंचा समावेश आहे. उर्वरित ५८ नागरिक धर्माने हिंदू आहेत. या सर्वांची माहिती पोलिसांनी घेतली आहे. त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत. दर आठवड्याला संबंधित पोलिस स्टेशनकडून आढावा घेतला जात आहे.

दरम्यान, मुंबईतील पारपत्र कार्यालयातून या सर्वांना त्यांच्या व्हिसाची मुदत नूतनीकरणाचे काम करून घ्यावे लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सार्क सवलतीच्या व्हिसाची सवलत काढण्याचे आदेश दिले. त्याबाबत कोल्हापूर प्रशासनाकडे अद्याप कोणतेही लेखी आदेश आलेले नाहीत. त्याबाबतचे आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे ही सांगण्यात आले.

निष्क्रिय डीबी पथके यापूर्वीच बरखास्तजिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या घरफोडी, गंभीर चोरीच्या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे. मग शहरातील पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथक काय करते, या प्रश्नावर अधीक्षक खाटमोडे म्हणाले, ठराविक पोलिस ठाण्यातच गुन्हे शोधपथके आहेत. वेळोवेळी त्यांच्या कामाचा आढावा घेतला जातो. दाखल झालेल्या गुन्ह्याचा शोध किती वेळात लावला आहे, त्यासाठी सक्षम पुरावे आणि गोपनीय माहिती पथकाकडून घेतली जाते. निष्क्रिय असलेली पथके यापूर्वीच वरिष्ठांनी बरखास्त केली आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानPoliceपोलिस