शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

राज्यात ६० लाख टन साखरेचे उत्पादन : उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:51 IST

चालू गळीत हंगामात २० जानेवारीअखेर राज्यात ५६८ लाख ५७ हजार टन उसाचे गाळप झाले असून, ६० लाख ८२ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी याचकाळात ते ५३ लाख १४ हजार टन इतके झाले होते. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.७० इतका, तर कोल्हापूर विभागाचा ११.८७ असून, उताºयात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे.

ठळक मुद्दे गतवर्षीपेक्षा सात लाख टन जादा

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : चालू गळीत हंगामात २० जानेवारीअखेर राज्यात ५६८ लाख ५७ हजार टन उसाचे गाळप झाले असून, ६० लाख ८२ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी याचकाळात ते ५३ लाख १४ हजार टन इतके झाले होते. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.७० इतका, तर कोल्हापूर विभागाचा ११.८७ असून, उताºयात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे.राज्यात सध्या सहकारी १०० आणि खासगी ९१, असे १९१ साखर कारखाने सुरू आहेत. राज्यातील ७ विभागांपैकी पुणे विभागातील ६२ कारखान्यांनी २३२ लाख ६२ हजार टन उसाचे गाळप करून २४ लाख ४६ हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा १०.५२ टक्के आहे. त्या खालोखाल कोल्हापूर विभागात ३७ कारखाने सुरू असून, त्यांनी १२६ लाख ७९ हजार टन उसाचे गाळप करून १५ लाख ५४० हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे.

राज्यात गेल्या हंगामात १०७.२३ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा त्यापेक्षाही जास्त होईल, असा सुरुवातीचा अंदाज होता; मात्र दुष्काळ आणि हुमणीमुळे उत्पादनात घट येऊन ९५ लाख टनांपर्यंत साखर उत्पादन होईल, असा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आला. इस्माने आपल्या दुसºया सुधारित अंदाजातही तोच कायम ठेवला आहे.‘एफआरपी’चे तुकडे !गाळप हंगाम सुरू होऊन तीन महिने होत आले तरी कोल्हापूर विभागात अद्याप एफआरपी एकरकमी द्यावयाची की, तिचे तुकडे करावयाचे हा वाद सुरू आहे. यामुळे काही कारखान्यांनी २३०० रुपये प्रतिटन शेतकºयांच्या खात्यावर जमा केले असले तरी एफआरपीचे तुकडे करण्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याने कारखान्यांनी ऊस बिले शेतकºयांच्या खात्यावर जमा करणे बंद केले आहे. दोन हप्त्यात एफआरपीनुसार होणारी बिले द्यायची कारखान्यांची तयारी आहे. मात्र, ‘स्वाभिमानी’ने ती एकरकमीच जमा करावीत, अशी भूमिका घेतली आहे. यासाठी २८ जानेवारीला पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी संघटनेने केली आहे. मात्र, परिस्थिती पाहता केंद्र सरकार तत्काळ मदत द्यायला तयार नाही. त्यामुळे एफआरपीचे तुकडे करूनच शेतकºयांच्या खात्यावर ऊस बिले जमा होतील, असे दिसते.विभागनिहाय ऊस गाळप आणि साखर उत्पादनविभाग कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन उतारा (%)कोल्हापूर ३७ १२६.७९ १५०.५४ ११.८७पुणे ६२ २३२.६२ २४४.६२ १०.५२अहमदनगर २८ ८४.९३ ८८.६६ १०.४४औरंगाबाद २४ ५०.८४ ४८.९६ ९.६३नांदेड ३४ ६८.८७ ७१.०९ १०.३२अमरावती २ २.०० २.०५ १०.२५नागपूर ४ २.५३ २.३५ ०९.२९एकूण १९१ ५६८.५७ ६०८.२७ १०.७०(ऊस गाळप लाख मे. टन तर साखर उत्पादन लाख क्विंटलमध्ये )

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर