शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

Lok Sabha Election 2019 : देश चालविण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते  : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 8:48 PM

देश चालविण्यासाठी ५६ पक्ष लागत नाहीत. त्यांच्यावर भरवश्यावर देश चालत नाहीत. ५६ इंचाची छाती लागते. शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाठीशी राहणारे आमचे पक्ष आहे. भाजप, सेना आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून जनतेच्या पाठबळावर बलशाली सरकार सत्तेमध्ये येणार आहे. आता केवळ लीड मोजणे बाकी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.

ठळक मुद्देदेश चालविण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते  : देवेंद्र फडणवीस आता केवळ लीड मोजणे बाकी

कोल्हापूर : देश चालविण्यासाठी ५६ पक्ष लागत नाहीत. त्यांच्यावर भरवश्यावर देश चालत नाहीत. ५६ इंचाची छाती लागते. शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाठीशी राहणारे आमचे पक्ष आहे. भाजप, सेना आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून जनतेच्या पाठबळावर बलशाली सरकार सत्तेमध्ये येणार आहे. आता केवळ लीड मोजणे बाकी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.येथील तपोवन मैदानावर भाजप-शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रारंभ सभेमध्ये ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईत अरबी महासागर आणि कोल्हापुरात जनतेचा महासागर. आम्ही एकत्रपणे पुढे जात आहोत. भाजप-सेनेची युती सत्तेसाठी नाही. विचारांची युती आहे. आमचा हिंदुत्ववाद संकुचित नाही. जाती, भाषेच्या पलीकडील हिंदुत्ववाद आहे. केवळ नावामध्ये राष्ट्रवादी असून चालत नाही. मनात राष्ट्रवाद असावा लागतो.

 

राष्ट्रभक्ती घेऊन आम्ही मैदानात आलो आहोत. विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत. त्यांच्या कॅप्टनने माढ्यातून माघार घेतली आहे. त्यांची तिकीटे उमेदवार परत करीत आहेत. प्रचंड मतांनी युतीचे सरकार पुन्हा सत्तेत येईल. गरीब ही काँग्रेसवाल्यांच्या नेत्याच्या चेल्या-चापट्यांची. तुमच्या १५ वर्षांचे आकडे घेऊन या, आम्ही साडेचार वर्षात केलेल्या कामाचे आकडे त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. देशातील शेतकरी, गरीबांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना राबवून बळ दिले.

कोल्हापूरच्या भूमीने परिवर्तन घडविलेकोल्हापूर हे शक्तीपीठ आहे. आई अंबेचे शक्तीपीठ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन कोल्हापूर आहे. विकास, परिवर्तनाच्या कृतीचा प्रारंभ या नगरीतून व्हावा, याउद्देशाने युतीने प्रचाराचा प्रारंभ येथून केला. कोल्हापूरच्या भूमीने देशात परिवर्तन घडविले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा घरी बसाआमचे कपडे उतरविणारा अजून जन्माला आला नाही. बारामतीच्या पोपटाच्या अंगावर एकही कपडा शिल्लक नाही. सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा दुपारी घरी बसा. मोदी हे सूर्यासारखे आहेत. हे लक्षात घ्यावे, अशी टीका राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

तुमची भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनीजर, आमची इव्हेंट कंपनी म्हणत असला, तर तुमची भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली. पश्चिम महाराष्ट्रातील सामना १० विरुद्ध शून्य असा फरकाने युती जिंकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस