शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

सीबीएसई बारावीच्या ५५० विद्यार्थ्यांना मिळणार सरासरी गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 6:14 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (सीबीएसई) बारावी परीक्षेतील उर्वरित पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५५० विद्यार्थ्यांना आधीच्या तीन परीक्षांच्या आधारे गुण या बोर्डाच्या परीक्षेत गुण मिळणार आहेत. परीक्षा रद्दच्या निर्णयावरून पालक, विद्यार्थ्यांनी शुक्रवारी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात १० शाळा उर्वरित पेपर रद्दबाबत पालक, विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (सीबीएसई) बारावी परीक्षेतील उर्वरित पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५५० विद्यार्थ्यांना आधीच्या तीन परीक्षांच्या आधारे गुण या बोर्डाच्या परीक्षेत गुण मिळणार आहेत. परीक्षा रद्दच्या निर्णयावरून पालक, विद्यार्थ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.या बोर्डाकडून दि. २७ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. त्यानंतर लॉकडाऊनमुळे उर्वरित आणि ऐच्छिक विषयांचे पेपर स्थगित करण्यात आले. या पेपरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सीबीएसईने गुरुवारी (दि. २५) जाहीर केला. त्यावर लोकमतने कोल्हापूर जिल्ह्यातील पालक, विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रतिक्रिया, किती विद्यार्थ्यांना सरासरी गुण मिळणार, आदींचा आढावा घेतला.

जिल्ह्यातील एकूण १० शाळांमधील ५५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. त्यातील विज्ञान, वाणिज्य विद्याशाखेचे बहुतांश पेपर झाले आहेत. मराठी, हिंदी, भूगोल, इन्फर्मेटिक प्रॅक्टिस, बिझनेस स्टडीज, कॉम्प्युटर सायन्स, आदी पेपर रद्द करण्यात आले आहेत. या विषयांसाठी शाळांनी त्याच विषयाच्या आधी घेतलेल्या तीन परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना सरासरी गुण दिले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना त्यांची प्रगती नेमकी समजण्यासाठी आणि करिअरची दिशा ठरविण्याकरिता स्वत:च्या क्षमतेची माहिती होण्यासाठी परीक्षा होणे आवश्यक होते. शालेय शिक्षणाला ऑनलाईन शिक्षण हा पर्याय नाही.- ललित गांधी, अध्यक्ष, महावीर एज्युकेशन सोसायटी

वर्षभर मेहनत केलेल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उर्वरित पेपर रद्दचा निर्णय अयोग्य ठरणारा आहे. सध्या अन्य इयत्तांचे विद्यार्थी हे वर्गात येत नाहीत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखून अथवा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे शक्य होते.- सीमा फाटक, पालक

कोरोनाच्या सद्य:स्थितीचा विचार करता ह्यसीबीएसईह्णने बारावीचे उर्वरित पेपर रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे.- डॉ. सरदार जाधव,संचालक, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल, पेठवडगाव

 

 

बारावीचे बहुतांश महत्त्वाचे पेपर पूर्ण झाले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून बोर्डाने उर्वरित पेपर रद्द करण्याचा घेतलेला निर्णय मला योग्य वाटतो.- ऋषिकेश कुलकर्णी, विद्यार्थी

पेपर रद्द करून त्यांचे सरासरी गुण देण्याच्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. या पेपरची परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घ्यायला हवी होती.- राजेंद्र दायमा, अध्यक्ष, इंडीपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन

आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • बारावीच्या शाळा (सीनिअर सेकंडरी स्कूल) : १०
  • विद्यार्थिसंख्या : ५५०
  • दहावीच्या शाळा (सेकंडरी स्कूल) : २८
  • विद्यार्थिसंख्या : ३८००

 

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाkolhapurकोल्हापूर