शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिन विशेष: घनदाट जंगल, खडतर पायवाटेने चालत जात देताहेत दोनच मुलींना धडे; ५४ वर्षीय जीवन मिठारींनी आव्हान म्हणून स्वीकारली जबाबदारी

By संदीप आडनाईक | Updated: September 5, 2025 12:22 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अजूनही या छोट्याशा वाडीने विजेचा प्रकाश पाहिलेला नाही हे आणखीन एक आश्चर्य

संदीप आडनाईककोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील घनदाट जंगलात असलेल्या कावळटेक धनगरवाड्यावर अवघ्या दोन विद्यार्थिनींना शिकवण्याचे व्रत एक शिक्षक पार पाडत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अजूनही या छोट्याशा वाडीने विजेचा प्रकाश पाहिलेला नाही हे आणखीन एक आश्चर्य. उंचावर असल्याने वाहन पोहोचत नाही. खडतर निसरड्या पायवाटेने दोन-अडीच किलोमीटर चालत, कसरत करत गेली १२ वर्षे एक शिक्षक या शाळेतील केवळ दोनच विद्यार्थिनींना शिकवण्याचे काम अशा खडतर आणि दुर्गम जागेत करतो आहे.गगनबावडा हा कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेच्या टोकावर सह्याद्रीच्या धारेतून पुढे आलेला तालुका. कोल्हापूरपासून ५५ किलोमीटर अंतरावर असलेला हा तालुका येथे पडणाऱ्या तुफान पावसामुळे ओळखला जातो. ‘याच तालुक्यात धुंदवडे गावाजवळ कावळटेक ही धनगरवाडी. या वाडीत पूर्वी ६० ते ७० कुटुंबे राहात होती. परंतु जागतिकीकरणात ग्रामस्थांनी गाव सोडले त्याला ३५ वर्षे झाली. रोजगारासाठी ही कुटुंबे कोल्हापूरला स्थलांतरित झाली. 

वाचा-  शिक्षक शिक्षकदिनीच वेतनाविना, कोल्हापूर महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शिक्षकांमध्ये नाराजीसध्या या वाडीत केवळ तीन कुटुंबे राहतात. त्यातील दोन कुटुंबे अजूनही कोल्हापूरला राेजगारासाठी येऊन जाऊन आहेत परंतु एक कुटुंब इथेच स्थायिक आहे. याच कुटुंबातील तीनपैकी इयत्ता चौथीत असलेली कल्याणी दगडू बोडके आणि इयत्ता दुसरीत असलेली तिचीच बहीण स्वरा दगडू बोडके या दोघीच या शाळेत शिकतात. आणखी एक-दोन वर्षांनी या शाळेत येईल. पन्हाळा तालुक्यातील कळे येथील ५४ वर्षांचे जीवन वसंतराव मिठारी हे एकमेव शिक्षक या शाळेत शिकवण्यासाठी रोज येतात.

वाचा - देवळात, समाजमंदिरात भरतात अंगणवाडी; कोल्हापूर जिल्ह्यात १४४३ जागी इमारती नाहीत, तालुकानिहाय स्थिती..जाणून घ्याआव्हान म्हणून स्वीकारली जबाबदारीमिठारी यांनी गेली १२ वर्षे त्यांनी हे तप स्वीकारले आहे. कारण इथे शिकवण्यासाठी कोणी तयार नव्हते, परंतु कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी हे आव्हान स्वीकारले, आणि सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजे अजून चार वर्षे हा शिक्षणाचा वसा त्यांनी स्वीकारला आहे.वन्यप्राण्यांची भीतीवनविभागाच्या जागेतून या वाडीत जाण्यासाठी खडतर रस्ता आहे. याठिकाणी कोणत्याही हंगामात वाहन जात नाही. वाटेत गवे, कोळशिंगे आणि पाळीव गाई अशा वन्यप्राण्यांचाही मोठा त्रास आहे. त्यामुळे सकाळी लवकर येणे आणि सायंकाळी लवकर निघणे असा दिनक्रम मिठारी सरांना पाळावा लागतो.