शहरं
Join us  
Trending Stories
1
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
2
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
3
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
4
Sri Lanka Bus Accident: पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?
6
Thane: बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
7
एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?
8
शनिवारी अनंत चतुर्दशी २०२५: साडेसाती, शनि महादशा सुरू आहे? ‘हे’ उपाय तारतील अन् भरभराट होईल
9
६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस
10
“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा
11
हा खरा गणेशोत्सव! परभणीत गणेश मंडळाकडून जोडप्याचे शुभमंगल, संसारोपयोगी साहित्य भेट!
12
लग्नाला सहा महिनेही झाले नव्हते, अचानक एक दिवस पत्नी बेपत्ता, व्हॉट्सअपवर पतीला फोटो आला...
13
Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...
14
Astro Tips: तुमची ग्रहस्थिती 'ही' असेल तर शेअर मार्केटमध्ये होतो लाभ, अन्यथा सुपडा साफ!
15
अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात
16
प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार; नातवाला दिली भेट, म्हणाले...
17
रणबीर कपूरशी संबंधित 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी; ब्लॉक डीलनंतर शेअरने गाठले अप्पर सर्किट
18
दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानात १६१ प्रवासी होते
19
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
20
No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?

शिक्षक दिन विशेष: घनदाट जंगल, खडतर पायवाटेने चालत जात देताहेत दोनच मुलींना धडे; ५४ वर्षीय जीवन मिठारींनी आव्हान म्हणून स्वीकारली जबाबदारी

By संदीप आडनाईक | Updated: September 5, 2025 12:22 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अजूनही या छोट्याशा वाडीने विजेचा प्रकाश पाहिलेला नाही हे आणखीन एक आश्चर्य

संदीप आडनाईककोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील घनदाट जंगलात असलेल्या कावळटेक धनगरवाड्यावर अवघ्या दोन विद्यार्थिनींना शिकवण्याचे व्रत एक शिक्षक पार पाडत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अजूनही या छोट्याशा वाडीने विजेचा प्रकाश पाहिलेला नाही हे आणखीन एक आश्चर्य. उंचावर असल्याने वाहन पोहोचत नाही. खडतर निसरड्या पायवाटेने दोन-अडीच किलोमीटर चालत, कसरत करत गेली १२ वर्षे एक शिक्षक या शाळेतील केवळ दोनच विद्यार्थिनींना शिकवण्याचे काम अशा खडतर आणि दुर्गम जागेत करतो आहे.गगनबावडा हा कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेच्या टोकावर सह्याद्रीच्या धारेतून पुढे आलेला तालुका. कोल्हापूरपासून ५५ किलोमीटर अंतरावर असलेला हा तालुका येथे पडणाऱ्या तुफान पावसामुळे ओळखला जातो. ‘याच तालुक्यात धुंदवडे गावाजवळ कावळटेक ही धनगरवाडी. या वाडीत पूर्वी ६० ते ७० कुटुंबे राहात होती. परंतु जागतिकीकरणात ग्रामस्थांनी गाव सोडले त्याला ३५ वर्षे झाली. रोजगारासाठी ही कुटुंबे कोल्हापूरला स्थलांतरित झाली. 

वाचा-  शिक्षक शिक्षकदिनीच वेतनाविना, कोल्हापूर महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शिक्षकांमध्ये नाराजीसध्या या वाडीत केवळ तीन कुटुंबे राहतात. त्यातील दोन कुटुंबे अजूनही कोल्हापूरला राेजगारासाठी येऊन जाऊन आहेत परंतु एक कुटुंब इथेच स्थायिक आहे. याच कुटुंबातील तीनपैकी इयत्ता चौथीत असलेली कल्याणी दगडू बोडके आणि इयत्ता दुसरीत असलेली तिचीच बहीण स्वरा दगडू बोडके या दोघीच या शाळेत शिकतात. आणखी एक-दोन वर्षांनी या शाळेत येईल. पन्हाळा तालुक्यातील कळे येथील ५४ वर्षांचे जीवन वसंतराव मिठारी हे एकमेव शिक्षक या शाळेत शिकवण्यासाठी रोज येतात.

वाचा - देवळात, समाजमंदिरात भरतात अंगणवाडी; कोल्हापूर जिल्ह्यात १४४३ जागी इमारती नाहीत, तालुकानिहाय स्थिती..जाणून घ्याआव्हान म्हणून स्वीकारली जबाबदारीमिठारी यांनी गेली १२ वर्षे त्यांनी हे तप स्वीकारले आहे. कारण इथे शिकवण्यासाठी कोणी तयार नव्हते, परंतु कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी हे आव्हान स्वीकारले, आणि सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजे अजून चार वर्षे हा शिक्षणाचा वसा त्यांनी स्वीकारला आहे.वन्यप्राण्यांची भीतीवनविभागाच्या जागेतून या वाडीत जाण्यासाठी खडतर रस्ता आहे. याठिकाणी कोणत्याही हंगामात वाहन जात नाही. वाटेत गवे, कोळशिंगे आणि पाळीव गाई अशा वन्यप्राण्यांचाही मोठा त्रास आहे. त्यामुळे सकाळी लवकर येणे आणि सायंकाळी लवकर निघणे असा दिनक्रम मिठारी सरांना पाळावा लागतो.