शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
2
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
3
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
5
Stock Market Today: शेअर बाजार उघडताच रेड झोनमध्ये; सेन्सेक्स निफ्टीवर फ्लॅट ट्रेडिंग-डिफेन्स शेअर्समध्ये मोठी खरेदी
6
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?
7
कार्तिक विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत पूजन, गणपती करेल कल्याण-मंगल; पाहा, महत्त्व-मान्यता
8
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
9
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
10
प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
11
KVP Investment Scheme: पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
12
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
13
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
14
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
15
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
16
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
17
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
18
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
19
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
20
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा

शिक्षक दिन विशेष: घनदाट जंगल, खडतर पायवाटेने चालत जात देताहेत दोनच मुलींना धडे; ५४ वर्षीय जीवन मिठारींनी आव्हान म्हणून स्वीकारली जबाबदारी

By संदीप आडनाईक | Updated: September 5, 2025 12:22 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अजूनही या छोट्याशा वाडीने विजेचा प्रकाश पाहिलेला नाही हे आणखीन एक आश्चर्य

संदीप आडनाईककोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील घनदाट जंगलात असलेल्या कावळटेक धनगरवाड्यावर अवघ्या दोन विद्यार्थिनींना शिकवण्याचे व्रत एक शिक्षक पार पाडत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अजूनही या छोट्याशा वाडीने विजेचा प्रकाश पाहिलेला नाही हे आणखीन एक आश्चर्य. उंचावर असल्याने वाहन पोहोचत नाही. खडतर निसरड्या पायवाटेने दोन-अडीच किलोमीटर चालत, कसरत करत गेली १२ वर्षे एक शिक्षक या शाळेतील केवळ दोनच विद्यार्थिनींना शिकवण्याचे काम अशा खडतर आणि दुर्गम जागेत करतो आहे.गगनबावडा हा कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेच्या टोकावर सह्याद्रीच्या धारेतून पुढे आलेला तालुका. कोल्हापूरपासून ५५ किलोमीटर अंतरावर असलेला हा तालुका येथे पडणाऱ्या तुफान पावसामुळे ओळखला जातो. ‘याच तालुक्यात धुंदवडे गावाजवळ कावळटेक ही धनगरवाडी. या वाडीत पूर्वी ६० ते ७० कुटुंबे राहात होती. परंतु जागतिकीकरणात ग्रामस्थांनी गाव सोडले त्याला ३५ वर्षे झाली. रोजगारासाठी ही कुटुंबे कोल्हापूरला स्थलांतरित झाली. 

वाचा-  शिक्षक शिक्षकदिनीच वेतनाविना, कोल्हापूर महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शिक्षकांमध्ये नाराजीसध्या या वाडीत केवळ तीन कुटुंबे राहतात. त्यातील दोन कुटुंबे अजूनही कोल्हापूरला राेजगारासाठी येऊन जाऊन आहेत परंतु एक कुटुंब इथेच स्थायिक आहे. याच कुटुंबातील तीनपैकी इयत्ता चौथीत असलेली कल्याणी दगडू बोडके आणि इयत्ता दुसरीत असलेली तिचीच बहीण स्वरा दगडू बोडके या दोघीच या शाळेत शिकतात. आणखी एक-दोन वर्षांनी या शाळेत येईल. पन्हाळा तालुक्यातील कळे येथील ५४ वर्षांचे जीवन वसंतराव मिठारी हे एकमेव शिक्षक या शाळेत शिकवण्यासाठी रोज येतात.

वाचा - देवळात, समाजमंदिरात भरतात अंगणवाडी; कोल्हापूर जिल्ह्यात १४४३ जागी इमारती नाहीत, तालुकानिहाय स्थिती..जाणून घ्याआव्हान म्हणून स्वीकारली जबाबदारीमिठारी यांनी गेली १२ वर्षे त्यांनी हे तप स्वीकारले आहे. कारण इथे शिकवण्यासाठी कोणी तयार नव्हते, परंतु कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी हे आव्हान स्वीकारले, आणि सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजे अजून चार वर्षे हा शिक्षणाचा वसा त्यांनी स्वीकारला आहे.वन्यप्राण्यांची भीतीवनविभागाच्या जागेतून या वाडीत जाण्यासाठी खडतर रस्ता आहे. याठिकाणी कोणत्याही हंगामात वाहन जात नाही. वाटेत गवे, कोळशिंगे आणि पाळीव गाई अशा वन्यप्राण्यांचाही मोठा त्रास आहे. त्यामुळे सकाळी लवकर येणे आणि सायंकाळी लवकर निघणे असा दिनक्रम मिठारी सरांना पाळावा लागतो.