शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात चार महिन्यांत ४३८ अपघात; १५३ जण ठार; जीवघेणा प्रवास थांबणार कधी? 

By उद्धव गोडसे | Updated: May 10, 2024 12:27 IST

बेदरकारपणे वाहन चालवणे जीवावर बेतत आहे

उद्धव गोडसेकोल्हापूर : काही प्रमाणात रस्ते सुधारले तरी वाहनधारक सुधारत नाहीत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवणे जीवावर बेतत आहे. दरवर्षी हजारो लोक आयुष्यभरासाठी जायबंदी होतात. लाखो रुपयांच्या वाहनांचा चक्काचूर होतो. तरीही वाहतूक नियमांचे पालन होत नाही आणि वेगाची नशा जात नाही. त्यामुळे वाढते रस्ते अपघात आणि त्यात होणारी जीवितहानी ही नवी समस्या निर्माण झाली आहे.जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत ४३८ अपघातांची नोंद झाली. यात १५३ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर २१८ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातांमुळे जीवितहानीसह वाहनांचेही मोठे नुकसान होतेच. मात्र, त्यासोबतच अपघातात दगावलेल्या व्यक्तींचे कुटुंब उद्ध्वस्त होते. वाढत्या अपघातांच्या आकडेवारीवरून ही समस्या गंभीर बनत असल्याचे स्पष्ट झाले आहे.देशात दरवर्षी कोणत्याही साथीच्या आजारात दगावणाऱ्या व्यक्तींपेक्षा अधिक किंवा जगभरात सुरू असलेल्या युद्धांमध्ये मरणाऱ्या व्यक्तींपेक्षा भारतात रस्ते अपघाती मृत्यूंची संख्या जास्त आहे. केवळ कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०२४ मध्ये ४३८ अपघातांची नोंद झाली. काही किरकोळ अपघातांच्या नोंदी पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्या परस्पर बाहेरच मिटवल्या जातात.२०२३ मध्ये जिल्ह्यात १२७३ अपघातांची नोंद झाली होती. त्यात ४५४ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा पहिल्या चार महिन्यांतच अपघातांची संख्या ४३८ वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या १५३ एवढी झाली. पुढे पावसाळा, पर्यटन हंगाम आणि ऊस तोडणी हंगामात अपघातांची संख्या वाढते. यामुळे अपघात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पुणे-बेंगळुरू महामार्गासह रत्नागिरी-नागपूर, गगनबावडा, आंबोली या मार्गांचे रुंदीकरण सुरू आहे. काही जिल्हा आणि राज्य मार्गांचेही रुंदीकरण सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची गती मंदावली असून, पर्यायी मार्गांनी वाहतूक वळवली आहे. मात्र, बेदरकार वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्वत:सह इतरांच्याही जिवाशी खेळ करत आहेत. विशेषत: पुणे-बेंगळुरू महामार्ग, कोल्हापूर ते आंबा घाट, शिरोली पुलाची ते सांगली या मार्गांवर अपघातांची मालिकाच सुरू असते. राधानगरी, गगनबावडा आणि गारगोटी मार्गांवरही अलीकडे अपघातांची संख्या वाढली आहे. वाढते अपघात आणि त्यातील मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे.

चार महिन्यांतील अपघात

  • एकूण अपघात - ४३८
  • अपघाती मृत्यू - १५३
  • गंभीर जखमी - २१८
  • किरकोळ जखमी - २८
  • बिगर दुखापत अपघात - २३

कुटुंबांची घडी विस्कटतेघरातील कर्ती व्यक्ती अपघातात दगावल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची घडी विस्कटते. मुलाबाळांच्या शिक्षणाची आबाळ होते. अपघातात जायबंदी झालेल्या व्यक्तीची संपूर्ण कुटुंबाला जबाबदारी घ्यावी लागते. यासाठी नातेवाईक अडकून पडतात. कुटुंबाचे आर्थिक नुकसान होते. यातून सावरण्यासाठी खूप वेळ जातो. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळणे हेच हिताचे ठरते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू