शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कोल्हापुरात चार महिन्यांत ४३८ अपघात; १५३ जण ठार; जीवघेणा प्रवास थांबणार कधी? 

By उद्धव गोडसे | Updated: May 10, 2024 12:27 IST

बेदरकारपणे वाहन चालवणे जीवावर बेतत आहे

उद्धव गोडसेकोल्हापूर : काही प्रमाणात रस्ते सुधारले तरी वाहनधारक सुधारत नाहीत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवणे जीवावर बेतत आहे. दरवर्षी हजारो लोक आयुष्यभरासाठी जायबंदी होतात. लाखो रुपयांच्या वाहनांचा चक्काचूर होतो. तरीही वाहतूक नियमांचे पालन होत नाही आणि वेगाची नशा जात नाही. त्यामुळे वाढते रस्ते अपघात आणि त्यात होणारी जीवितहानी ही नवी समस्या निर्माण झाली आहे.जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत ४३८ अपघातांची नोंद झाली. यात १५३ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर २१८ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातांमुळे जीवितहानीसह वाहनांचेही मोठे नुकसान होतेच. मात्र, त्यासोबतच अपघातात दगावलेल्या व्यक्तींचे कुटुंब उद्ध्वस्त होते. वाढत्या अपघातांच्या आकडेवारीवरून ही समस्या गंभीर बनत असल्याचे स्पष्ट झाले आहे.देशात दरवर्षी कोणत्याही साथीच्या आजारात दगावणाऱ्या व्यक्तींपेक्षा अधिक किंवा जगभरात सुरू असलेल्या युद्धांमध्ये मरणाऱ्या व्यक्तींपेक्षा भारतात रस्ते अपघाती मृत्यूंची संख्या जास्त आहे. केवळ कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०२४ मध्ये ४३८ अपघातांची नोंद झाली. काही किरकोळ अपघातांच्या नोंदी पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्या परस्पर बाहेरच मिटवल्या जातात.२०२३ मध्ये जिल्ह्यात १२७३ अपघातांची नोंद झाली होती. त्यात ४५४ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा पहिल्या चार महिन्यांतच अपघातांची संख्या ४३८ वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या १५३ एवढी झाली. पुढे पावसाळा, पर्यटन हंगाम आणि ऊस तोडणी हंगामात अपघातांची संख्या वाढते. यामुळे अपघात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पुणे-बेंगळुरू महामार्गासह रत्नागिरी-नागपूर, गगनबावडा, आंबोली या मार्गांचे रुंदीकरण सुरू आहे. काही जिल्हा आणि राज्य मार्गांचेही रुंदीकरण सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची गती मंदावली असून, पर्यायी मार्गांनी वाहतूक वळवली आहे. मात्र, बेदरकार वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्वत:सह इतरांच्याही जिवाशी खेळ करत आहेत. विशेषत: पुणे-बेंगळुरू महामार्ग, कोल्हापूर ते आंबा घाट, शिरोली पुलाची ते सांगली या मार्गांवर अपघातांची मालिकाच सुरू असते. राधानगरी, गगनबावडा आणि गारगोटी मार्गांवरही अलीकडे अपघातांची संख्या वाढली आहे. वाढते अपघात आणि त्यातील मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे.

चार महिन्यांतील अपघात

  • एकूण अपघात - ४३८
  • अपघाती मृत्यू - १५३
  • गंभीर जखमी - २१८
  • किरकोळ जखमी - २८
  • बिगर दुखापत अपघात - २३

कुटुंबांची घडी विस्कटतेघरातील कर्ती व्यक्ती अपघातात दगावल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची घडी विस्कटते. मुलाबाळांच्या शिक्षणाची आबाळ होते. अपघातात जायबंदी झालेल्या व्यक्तीची संपूर्ण कुटुंबाला जबाबदारी घ्यावी लागते. यासाठी नातेवाईक अडकून पडतात. कुटुंबाचे आर्थिक नुकसान होते. यातून सावरण्यासाठी खूप वेळ जातो. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळणे हेच हिताचे ठरते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू