शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
4
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
7
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
8
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
9
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
10
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
11
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
12
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
13
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
14
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
15
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
16
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
17
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
18
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
19
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
20
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?

कोल्हापुरात चार महिन्यांत ४३८ अपघात; १५३ जण ठार; जीवघेणा प्रवास थांबणार कधी? 

By उद्धव गोडसे | Updated: May 10, 2024 12:27 IST

बेदरकारपणे वाहन चालवणे जीवावर बेतत आहे

उद्धव गोडसेकोल्हापूर : काही प्रमाणात रस्ते सुधारले तरी वाहनधारक सुधारत नाहीत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवणे जीवावर बेतत आहे. दरवर्षी हजारो लोक आयुष्यभरासाठी जायबंदी होतात. लाखो रुपयांच्या वाहनांचा चक्काचूर होतो. तरीही वाहतूक नियमांचे पालन होत नाही आणि वेगाची नशा जात नाही. त्यामुळे वाढते रस्ते अपघात आणि त्यात होणारी जीवितहानी ही नवी समस्या निर्माण झाली आहे.जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत ४३८ अपघातांची नोंद झाली. यात १५३ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर २१८ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातांमुळे जीवितहानीसह वाहनांचेही मोठे नुकसान होतेच. मात्र, त्यासोबतच अपघातात दगावलेल्या व्यक्तींचे कुटुंब उद्ध्वस्त होते. वाढत्या अपघातांच्या आकडेवारीवरून ही समस्या गंभीर बनत असल्याचे स्पष्ट झाले आहे.देशात दरवर्षी कोणत्याही साथीच्या आजारात दगावणाऱ्या व्यक्तींपेक्षा अधिक किंवा जगभरात सुरू असलेल्या युद्धांमध्ये मरणाऱ्या व्यक्तींपेक्षा भारतात रस्ते अपघाती मृत्यूंची संख्या जास्त आहे. केवळ कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०२४ मध्ये ४३८ अपघातांची नोंद झाली. काही किरकोळ अपघातांच्या नोंदी पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्या परस्पर बाहेरच मिटवल्या जातात.२०२३ मध्ये जिल्ह्यात १२७३ अपघातांची नोंद झाली होती. त्यात ४५४ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा पहिल्या चार महिन्यांतच अपघातांची संख्या ४३८ वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या १५३ एवढी झाली. पुढे पावसाळा, पर्यटन हंगाम आणि ऊस तोडणी हंगामात अपघातांची संख्या वाढते. यामुळे अपघात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पुणे-बेंगळुरू महामार्गासह रत्नागिरी-नागपूर, गगनबावडा, आंबोली या मार्गांचे रुंदीकरण सुरू आहे. काही जिल्हा आणि राज्य मार्गांचेही रुंदीकरण सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची गती मंदावली असून, पर्यायी मार्गांनी वाहतूक वळवली आहे. मात्र, बेदरकार वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्वत:सह इतरांच्याही जिवाशी खेळ करत आहेत. विशेषत: पुणे-बेंगळुरू महामार्ग, कोल्हापूर ते आंबा घाट, शिरोली पुलाची ते सांगली या मार्गांवर अपघातांची मालिकाच सुरू असते. राधानगरी, गगनबावडा आणि गारगोटी मार्गांवरही अलीकडे अपघातांची संख्या वाढली आहे. वाढते अपघात आणि त्यातील मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे.

चार महिन्यांतील अपघात

  • एकूण अपघात - ४३८
  • अपघाती मृत्यू - १५३
  • गंभीर जखमी - २१८
  • किरकोळ जखमी - २८
  • बिगर दुखापत अपघात - २३

कुटुंबांची घडी विस्कटतेघरातील कर्ती व्यक्ती अपघातात दगावल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची घडी विस्कटते. मुलाबाळांच्या शिक्षणाची आबाळ होते. अपघातात जायबंदी झालेल्या व्यक्तीची संपूर्ण कुटुंबाला जबाबदारी घ्यावी लागते. यासाठी नातेवाईक अडकून पडतात. कुटुंबाचे आर्थिक नुकसान होते. यातून सावरण्यासाठी खूप वेळ जातो. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळणे हेच हिताचे ठरते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू