शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

राज्यातील ४२ हजार कैद्यांना मतदानाचा हक्क नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 05:23 IST

राज्यातील ४४ कारागृहांत न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगत असलेल्या सुमारे ४२ हजार कैद्यांना कोणत्याही निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येत नाही.

- एकनाथ पाटीलकोल्हापूर : राज्यातील ४४ कारागृहांत न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगत असलेल्या सुमारे ४२ हजार कैद्यांना कोणत्याही निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येत नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम १५१ नुसार त्यांच्या मतदानाचा हक्क गोठविण्यात आला आहे.राज्यात नऊ मध्यवर्ती आणि ३५ जिल्ह्यात उपकारागृह आहेत. त्यामध्ये कळंबा-कोल्हापूरसह येरवडा-पुणे, तळोजा-नवी मुंबई, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, ठाणे, नाशिक यांचा समावेश आहे. मध्यवर्ती कारागृहात दोन ते साडेतीन हजार, तर ३५ जिल्ह्यांतील उपकारागृहात प्रत्येकी २०० ते ४०० कैदी शिक्षा भोगत आहेत. दोन्ही प्रकारच्या कारागृहांतील सुमारे ४२ हजार कैद्यांना मतदानापासून दूर राहावे लागत आहेत. प्रत्येक कारागृहात राज्यातील विविध जिल्ह्यातील गुन्हेगार आहेत. मुंबईतील कैदी कोल्हापुरातील कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांना मतदानासाठी मुंबईला घेऊन जाणेही सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. कारागृहाची सुरक्षा यंत्रणाही अपुरी आहे. कैद्यांना मतदानाचा हक्क दिल्यास प्रत्येक जण अर्ज करून मागणी करेल. याचा संपूर्ण भार कारागृह प्रशासनावर पडेल, या सर्व घटनांचा विचार करून पूर्वीपासूनच कैद्यांचा मतदानाचा हक्क गोठविण्यात आला आहे.राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मोहीम राबविते. महाविद्यालय, शहरासह ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर मतदान जागृतीचा उपक्रमही राबविण्यात आला. यासाठी शासकीय प्रतिनिधी घराघरांपर्यंत पोहोचले. समाजातील विविध घटकांसोबत तृतीयपंथीयांनाही मतदान करता यावे, यासाठी प्रबोधन करून त्यांची नोंदणी करण्यात आली. कैदी मात्र, या मोहिमेचा भाग बनू शकत नाहीत. लोकसभा, विधानसभेतच नव्हे, तर ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषदेसह खासगी सहकारी संस्थांच्या निवडणुकीतही कैद्यांना मतदान करता येत नाही.>राज्यघटनेतील तरतुदीनुसारच कारागृहात शिक्षा भोगणाºया कैद्यांना मतदान करता येत नाही. माझ्या २७ वर्षांच्या सेवेत एकदाही कैद्याला मताचा अधिकार मिळालेले नाही.- दत्तात्रय गावडे, अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह

टॅग्स :jailतुरुंगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kolhapur-pcकोल्हापूर