शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

नागपूर-रत्नागिरी चौपदरीकरण महामार्गासाठी शियेतील ४० एकर भूसंपादनावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 17:53 IST

हा महामार्ग शियेतून जाणार आहे. यासाठीच्या भूसंपादन माेजणीचे काम गेल्याच महिन्यात झाले होते. याच्या समर्थन आणि विरोधात गावातच दोन गट पडले होते.

कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी या प्रस्तावित चाैपदरी महामार्गासाठी शिये (ता. करवीर) येथील भूसंपादनाबाबत बुधवारी भारत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात १५९ शेतकऱ्यांची ४० एकर जमीन सरकार ताब्यात घेत असल्याबाबतचे जाहीर केल्याने भूसंपादनावर शिक्कामोर्बत झाले आहे. सुनावणीमधील आक्षेप नामंजूर केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने हे राजपत्र प्रसिद्ध करून जमीन ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.

हा महामार्ग शियेतून जाणार आहे. यासाठीच्या भूसंपादन माेजणीचे काम गेल्याच महिन्यात झाले होते. याच्या समर्थन आणि विरोधात गावातच दोन गट पडले होते. यावरून आंदोलनही झाले होते. तरीदेखील महामार्ग प्राधीकरणाने मोजणी प्रक्रिया बंदोबस्त लावून पूर्ण करून घेतली आहे. यावर आलेल्या आक्षेपावरही प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीही झाली होती.

या सुनावणीत आलेले आक्षेप व हरकतीवर केंद्र सरकारला अहवाल सादर करण्यात आला होता. सर्व पडताळणी केल्यानंतर आक्षेप नामंजूर करीत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राजपत्रातच प्रसिद्ध झाल्यानंतर आता या शेतकऱ्यांचा या जमिनीवरील मालकी हक्क संपुष्टात आला आहे.

शिये या गावातील १५९ शेतकऱ्यांची १५.६७ हेक्टर अर्थात ४० एकर जमीन या महामार्गासाठी घेण्यात आली आहे. यात सर्वे नंबर ८४ ते ३०६ या गटातील या जमिनी असणार आहेत. आता यावर असणारे कर्ज व अन्य बोजा यापासून जमिनी मुक्त करण्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे.

बाधित शेतकऱ्यांनी पाच पट नुकसानभरपाईची मागणी केली आहे; पण अद्याप यासंदर्भात काहीही झालेले नाही. शासनाच्या नियमानुसार मात्र चारपट भरपाई मिळू शकते. दरम्यान, सुनावण्या अर्धवट असताना राजपत्र प्रसिद्ध करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ॲड. माणिक शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गnagpurनागपूरRatnagiriरत्नागिरी