शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड ट्रक, डंपर 'यमदूत', कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात ३८३ जण मृत

By उद्धव गोडसे | Updated: December 11, 2025 12:08 IST

६१० जण जखमी : अपघातांमुळे अनेक कुटुंबे झाली उद्ध्वस्त

उद्धव गोडसेकोल्हापूर : ऊस, खडी, वाळू, बॉक्साईटची ओव्हरलोडिंग वाहतूक, वाहनांच्या नियमित दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष आणि चालकांच्या बेफिकीरीमुळे जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढत आहे. अशा अनेक अपघातांमध्ये रोज वाहनचालकांसह निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यात ५१८ अपघातांची नोंद झाली. त्यात ३८३ जणांनी जीव गमावाला, तर ६१० जण जखमी झाले. जीवघेण्या अपघातांमुळे जिल्ह्यातील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे.जिल्ह्यात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. औद्योगिकीकरण, पर्यटन, व्यापाराचे केंद्र यामुळे आसपासच्या जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. पुणे-बंगळुरू, रत्नागिरी-नागपूर यासह कोकणात जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यांची स्थिती सुधारत असतानाही अपघातांची संख्या वाढत असल्याने याच्या मुळाशी जाऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.

वाहनधारकांची ही बेफिकीरी..अनेकदा अपघातानंतर पहिला दोष रस्त्यांना दिला जातो. ब्लॅक स्पॉटची दुुरुस्ती केली जात नाही, अशी ओरड केली जाते. मात्र, वाहतूक नियमांचे पालन करण्यापासून ते वाहनांची देखभाल दुरुस्ती करणे, इन्शूरन्स काढणे, स्वत:च्या बचावासाठी हेल्मेट वापरण्याचे मूलभूत नियम पाळले जात नाहीत. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकींग, सर्रास तिब्बल सीट बसवून प्रवास, मोबाईलवर बोलत किंवा कानात कॉड घालून वाहन चालविल्यामुळे गाडी चालवण्यातील गांभीर्य कमी होणे आदी कारणांमुळे वाहनचालकांची वाढती बेफिकीरीच जीवघेण्या अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

वाहतूक नियमांकडे दुर्लक्षबहुतांश अवजड वाहनांवरील चालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. वाहनांची देखभाल दुरुस्ती वेळेत केली जात नाही. ब्रेक, हेडलाईट, इन्शुरन्स, फिटनेस सर्टिफिकेट याकडे दुर्लक्ष होते. शहरात प्रवेश नसलेल्या मार्गांवरून वाहतूक केली जाते. जागा मिळेल तिथे वाहने उभी केली जातात. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते.

ओव्हरलोडिंगची गंभीर समस्याजिल्ह्यात ऊस, वाळू, खडी आणि बॉक्साईटची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय धान्य, साखर, गूळ आणि उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक होते. ऊस आणि बॉक्साईटच्या ओव्हरलोडिंग वाहतुकीमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. त्यामुळे ओव्हरलोडिंग वाहनांवर कारवाईची मागणी होत आहे.

अपघात - ५१८मृत्यू - ३८३जखमी - ६१०

ऊस वाहतुकीच्या वाहनांसाठी रिफ्लेक्टर बंधनकारक केले आहेत. ओव्हरलोडिंगबद्दल कारवाईची व्याप्ती वाढवली जाईल. सुरक्षित वाहतुकीसाठी वाहनधारकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. - संजीव भोर - प्रादेशिक परिवहन अधिकारी 

अनेकदा अपघातांसाठी वाहनधारक आणि वाहनांमधील बिघाड कारणीभूत असतात. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. यासाठी वाहनधारकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. - नंदकुमार मोरे - वाहतूक पोलिस निरीक्षक

ओव्हरलोड वाहनांवरील कारवाया

  • २०२४-२५
  • केसेस - १७८३
  • दंड - चार कोटी ६७ लाख आठ हजार
  • एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर
  • केसेस - १०९५
  • दंड - दोन कोटी ९७ लाख सहा हजार
English
हिंदी सारांश
Web Title : Overloaded Trucks Claim 383 Lives in Kolhapur This Year

Web Summary : Kolhapur faces rising accidents due to overloaded vehicles and driver negligence. In 11 months, 383 died in 518 accidents. Experts cite disregard for rules, poor maintenance, and reckless driving as key factors. Overloading of sugarcane, sand, and bauxite contributes to the problem, demanding stricter enforcement.