शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

कोल्हापूर जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू, अडीच महिन्यातील आकडेवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:50 IST

कोल्हापूर जिल्ह्यात नदी, धरण, तलाव, विहीरीवर उत्साही तरुण वाहत्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचे धाडस करीत असतात; पोहण्याचा सराव नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. १ जानेवारी ते १९ मार्च या अडीच महिन्यांत जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू झालेची नोंद पोलीस दप्तरी आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यूअडीच महिन्यातील आकडेवारी 

कोल्हापूर : जिल्ह्यात नदी, धरण, तलाव, विहीरीवर उत्साही तरुण वाहत्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचे धाडस करीत असतात; पोहण्याचा सराव नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. १ जानेवारी ते १९ मार्च या अडीच महिन्यांत जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू झालेची नोंद पोलीस दप्तरी आहे.जिल्ह्यात नदी, तलाव, विहीरीमध्ये अंघोळीसाठी पोहायला गेलेल्या अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रंगपंचमी खेळून अंघोळीसाठी गेलेल्या काही तरुण परत घरी परतले नाहीत. पाण्याची खोली, पोहण्याचा सराव नसल्याने अडीच महिन्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू झाला.

सध्या मार्च-एप्रिल महिना सुरु आहे. उष्म्याचे प्रमाण वाढते आहे. परिक्षा संपल्यानंतर कॉलेज युवक, शाळेच्या मुलांचा नदी, तलाव, विहीरीकडे पोहण्याचा कल जास्त असतो. त्यामुळे एप्रिल-मे या दोन महिन्यात बुडून मृत्यू पावलेल्यांची संखा जास्त असते. त्यामुळे युवक, मुले, त्यांच्या पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

पोहायला येत असेल तरच मुलांना स्विमींग टँकमध्ये सोडावे, नदी, विहीर, तलावामध्ये गाळ साचलेला असतो. उत्साही तरुण, मुले वरुन उड्या मारतात. अशावेळी गाळात अडकण्याची भिती जास्त असते. पोहताना पाठशिवीणीचा खेळ, बॉलने पाण्यात खेळणे अशा गेमही जिवीतास धोका ठरतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देवून त्यांना तलाव, विहीरीवर अंघोळ करण्यास मनाई करणे गरजेचे आहे.

 

युवक आपल्या साहसाचा अतिरेक करीत आहेत. त्यांनी तो करू नये. नद्या, विहीरी, तलाव आदी ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडू लागल्या आहेत. प्रत्येकाने आपली मागे कोणीतरी काळजी करीत आहे, याचे भान ठेवावे.दिनकर कांबळे,जीवरक्षक

 

  1. अंगावर जड कपडे घालून पोहण्यास उतरु नये
  2. ज्या ठिकाणी पोहायला जाता त्या तलाव, नदी किंवा विहीरीच्या खोलीचा अंदाज घ्यावा.
  3. वयानुसार पोहण्याचा सराव किती आहे, तितकेच पोहणे गरजेचे आहे.
  4. पाण्यात कोणताही गेम खेळू नका.
  5. पोहण्याच्या ठिकाणी तरंगणारे कॅन, दोरी, बांबू ठेवावा, जेणेकरुन एखाद्याचा जीव वाचविता येईल.
  6. ४५ मिनीटाच्या वर पाण्यात थांबु नये.
  7. घरच्या लोकांना सांगुन पोहण्यास जावे.
  8. पोहायला येत असेल तरच पाण्याजवळ जावे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीAccidentअपघात