शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

कोल्हापूर जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू, अडीच महिन्यातील आकडेवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:50 IST

कोल्हापूर जिल्ह्यात नदी, धरण, तलाव, विहीरीवर उत्साही तरुण वाहत्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचे धाडस करीत असतात; पोहण्याचा सराव नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. १ जानेवारी ते १९ मार्च या अडीच महिन्यांत जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू झालेची नोंद पोलीस दप्तरी आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यूअडीच महिन्यातील आकडेवारी 

कोल्हापूर : जिल्ह्यात नदी, धरण, तलाव, विहीरीवर उत्साही तरुण वाहत्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचे धाडस करीत असतात; पोहण्याचा सराव नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. १ जानेवारी ते १९ मार्च या अडीच महिन्यांत जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू झालेची नोंद पोलीस दप्तरी आहे.जिल्ह्यात नदी, तलाव, विहीरीमध्ये अंघोळीसाठी पोहायला गेलेल्या अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रंगपंचमी खेळून अंघोळीसाठी गेलेल्या काही तरुण परत घरी परतले नाहीत. पाण्याची खोली, पोहण्याचा सराव नसल्याने अडीच महिन्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू झाला.

सध्या मार्च-एप्रिल महिना सुरु आहे. उष्म्याचे प्रमाण वाढते आहे. परिक्षा संपल्यानंतर कॉलेज युवक, शाळेच्या मुलांचा नदी, तलाव, विहीरीकडे पोहण्याचा कल जास्त असतो. त्यामुळे एप्रिल-मे या दोन महिन्यात बुडून मृत्यू पावलेल्यांची संखा जास्त असते. त्यामुळे युवक, मुले, त्यांच्या पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

पोहायला येत असेल तरच मुलांना स्विमींग टँकमध्ये सोडावे, नदी, विहीर, तलावामध्ये गाळ साचलेला असतो. उत्साही तरुण, मुले वरुन उड्या मारतात. अशावेळी गाळात अडकण्याची भिती जास्त असते. पोहताना पाठशिवीणीचा खेळ, बॉलने पाण्यात खेळणे अशा गेमही जिवीतास धोका ठरतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देवून त्यांना तलाव, विहीरीवर अंघोळ करण्यास मनाई करणे गरजेचे आहे.

 

युवक आपल्या साहसाचा अतिरेक करीत आहेत. त्यांनी तो करू नये. नद्या, विहीरी, तलाव आदी ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडू लागल्या आहेत. प्रत्येकाने आपली मागे कोणीतरी काळजी करीत आहे, याचे भान ठेवावे.दिनकर कांबळे,जीवरक्षक

 

  1. अंगावर जड कपडे घालून पोहण्यास उतरु नये
  2. ज्या ठिकाणी पोहायला जाता त्या तलाव, नदी किंवा विहीरीच्या खोलीचा अंदाज घ्यावा.
  3. वयानुसार पोहण्याचा सराव किती आहे, तितकेच पोहणे गरजेचे आहे.
  4. पाण्यात कोणताही गेम खेळू नका.
  5. पोहण्याच्या ठिकाणी तरंगणारे कॅन, दोरी, बांबू ठेवावा, जेणेकरुन एखाद्याचा जीव वाचविता येईल.
  6. ४५ मिनीटाच्या वर पाण्यात थांबु नये.
  7. घरच्या लोकांना सांगुन पोहण्यास जावे.
  8. पोहायला येत असेल तरच पाण्याजवळ जावे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीAccidentअपघात