शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील भूविकास बँकेचे ३३ हजार शेतकरी कर्जमुक्त होणार, कर्मचाऱ्यांचा वनवासही संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 11:36 IST

राज्यातील ३३ हजार शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार आहे. त्यांचे प्रचलित दराने १ हजार २ कोटी ७७ लाख रुपयांची कर्जे माफ होणार आहेत.

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्यातील भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या दोन दिवसात होणार असून, राज्यातील ३३ हजार शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार आहे. त्यांचे प्रचलित दराने १ हजार २ कोटी ७७ लाख रुपयांची कर्जे माफ होणार आहेत. कर्मचाऱ्यांचा वनवासही संपुष्टात येणार असून राज्य सरकारने सहकार विभागाकडून माहिती मागवली आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीसह पूरक व्यवसायासाठी दीर्घ मुदतीने कर्जपुरवठा करण्याचे काम राज्यातील भूविकास बँकांनी केले. पाणीपुरवठ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा झाल्याने ग्रामीण भागात पंचवीस-तीस वर्षांपूर्वी सिंचनाचे क्षेत्र वाढले त्यामध्ये भूविकास बँकांचे योगदान खूप मोठे आहे; मात्र दीर्घ मुदतीची कर्ज वसुली काहीसी मंदावली आणि शासनाच्या कचखाऊ धोरणामुळे बँका अडचणीत आल्या.वसुली ठप्प झाली आणि बँकांना अखेरची घरघर लागली. बँकांचे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले. वसुली थांबल्याने पगार होईनात, त्यातच राज्य सरकारने बँका अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला. अवसायक मंडळ कार्यरत झाल्याने वसुलीला वेग येईल, असे वाटत असतानाच सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षांनी कर्जमाफीचा धडाका लावल्याने ‘भूविकास’ची वसुली पूर्णपणे थांबली.महाविकास आघाडीने १८ ऑगस्ट २०२१ रोजी भूविकास बँकेच्या थकबाकीदारांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. सात-आठ महिने शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. सात/ बारावर भूविकासचे कर्ज दिसत असल्याने इतर कर्जे घेता येत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत.दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने थकबाकी, कर्मचाऱ्यांची देणी, मालमत्ता याची माहिती मागवली आहे. उद्या, शुक्रवारी कर्जमाफीची घोषणा होणार असून तशी तरतूद होणार असल्याचे समजते. त्यानुसार राज्यातील ३३ हजार ८९५ शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा होणार आहे.

साडेपाचशे कोटींच्या मालमत्ता

राज्यात भूविकास बँकांच्या त्या त्या शहरातील मोक्याची ठिकाणी मालमत्ता आहेत. त्याची बाजारभावानुसार ५५५ कोटी ६१ लाख रुपये मूल्यांकन होते. या मालमत्ता राज्य सरकार ताब्यात घेणार आहे.

३२ महिने पगाराविनाकोल्हापूर भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांना ३२ महिने पगार नाही. तर विदर्भ व कोकणातील भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांना तब्बल दहा वर्षे पगाराची प्रतीक्षा आहे.

कोल्हापुरातील ९४२ शेतकऱ्यांना फायदा

कोल्हापूर जिल्ह्यातील ९४२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे. त्यांचे प्रचलित दराने ४१.९३ कोटी तर ओटीएस नुसार ५.६१ कोटी माफी मिळणार आहे. तर २०८ कर्मचाऱ्यांना १२.२६ कोटी रुपये मिळणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी