शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

तीस कोटीचा प्रकल्प ४५७ कोटींवर-आंबेओहळ प्रकल्प : फक्त कागदावर १५ टक्के काम शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:38 IST

सन १९९८ मध्ये मंजूर झालेला आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प २० वर्षे होऊनही या प्रकल्पाचे पुनर्वसनाचे काम रखडले आहे.

ठळक मुद्दे वीस वर्षे होऊनही पुनर्वसनाचे काम रखडले निधी मंजूर झाल्यानंतर धरणग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत

रवींद्र येसादे ।उत्तूर : सन १९९८ मध्ये मंजूर झालेला आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प २० वर्षे होऊनही या प्रकल्पाचे पुनर्वसनाचे काम रखडले आहे. कागदावर १५ टक्के काम शिल्लक असले तरी प्रत्यक्षात मात्र काम भरपूर आहे. ३० कोटींचा प्रकल्प सुधारीत प्रशासकीय मान्यतेसह तो ४५७ कोटींवर पोहोचला आहे. आतातरी आंबेओहळ लाभधारक व विस्थापितांचे ग्रहण सुटणार का? असा प्रश्न विस्थापितांना पडला आहे.

१.२४ द.ल.घ.फू. पाणीसाठा असणाऱ्या प्रकल्पात आजरा तालुक्यातील २१२३ व गडहिंग्लज तालुक्यातील ४२२० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार २२७ कोटी ५४ लाख रुपयांत स्वेच्छा पुर्नवसन, गावठाण वसाहतींचे प्रश्न, नागरी सुविधा, जमिनींचे वाटप आदी प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.कोल्हापूर पद्धतीचे बंधारे एकही वीस वर्षांत बांधला नाही. तो पूर्ण होणार आहे. निधी मंजूर झाल्यानंतर धरणग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सन २०१९ मध्ये पाणीसाठा होणार आहे. मात्र, प्रत्यक्षात निधीचे वाटप झाल्यानंतरच काम सुरू होणार आहे.बाबा, मुश्रीफ अन् दादा..!स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नांनी प्रकल्पाचे काम सुरू केले. बाबांनी पुनर्वसन व प्रकल्पाचे काम ५० टक्क्यांपर्यंत नेले. आमदार हसन मुश्रीफ यांनी काम पुढे नेले. आता प्रकल्प पूर्ण करण्याचे जबाबदारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्यावर असणार आहे. 

शासन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देत सुटले आहे. आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळून वर्ष उलटले तरी एका रुपयाचा निधी नाही. आंबेओहळ प्रकल्पाची अवस्था होऊ नये, प्रत्यक्षात पैसे येतील तेव्हाच खरे.- कॉ. संपत देसाई, राज्य संघटक श्रमिक मुक्ती दल

टॅग्स :DamधरणMONEYपैसाGovernmentसरकार