शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

रब्बी हंगामात यंदा ३.६४ ‘टीएमसी’ पाण्याचा वापर, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणात सद्या किती पाणीसाठा.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:10 IST

पाटबंधारे विभागाने काटेकोरपणे केले पाण्याचे नियोजन 

कोल्हापूर : पाटबंधारे विभागाने यंदा धरणातील पाण्याचे नियोजन काटेकोरपणे केले आहे. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता रब्बीच्या हंगामात राधानगरी, दूधगंगा, तुळशी धरणांतून ३.६४ टीएमसी (३६४३ दशलक्ष घनफूट) पाणी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.३१ टीएमसी पाण्याचा साठा अतिरिक्त आहे. आगामी तीन महिन्यांत पाण्याची गरज पाहता धरणातील पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.पाऊस कमी झाल्याने गेल्या वर्षी पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे मार्चअखेर धरणातील पाणीसाठा खूपच कमी झाला होता. त्यापुढील दोन-अडीच महिने पाणी पुरवणे पाटबंधारे विभागापुढे आव्हान होते. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. पाऊस भरपूर झाला. त्यात परतीचा पाऊसही दणकून पडल्याने रब्बी हंगामाला अपेक्षित पाणी लागले नाही. रब्बी हंगामात ३.६४ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.धरणातही यंदा मुबलक पाणीसाठा आहे. राधानगरी, तुळशी, वारणा, कासारी, कडवी या धरणात गेल्या वर्षीपेक्षा ३.३१ टीएमसी पाणीसाठा अधिक शिल्लक आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा कोल्हापूरकरांना बसण्याची शक्यता कमी आहे.

रब्बीसाठी असे सोडले पाणी (दशलक्ष घनफूट)कालावधी   - राधानगरी, दूधगंगा, तुळशीतून सोडलेले पाणीनोव्हेंबर ते फेब्रुवारी  -  ९८११ ते १७ मार्च  - १५३७१८ मार्च ते ३ एप्रिल  - ११२५

धरणातील तुलनात्मक पाणीसाठी (टीएमसी)-

धरणसध्याचा साठा    गतवर्षी याच दिवसाचा साठा
राधानगरी ४.४७   ३.५३
तुळशी२.२० १.९०
वारणा  १३.५७   ११.५६
दूधगंगा  ८.७३  ९.०१
कासारी १.६०  १.५८
कडवी १.६२    १.५८
कुंभी१.६६     १.८०
पाटगाव२.१०   २.१६

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीDamधरण