शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

साखर निर्यातीस ३ महिन्यांची मुदतवाढ अधिसूचना जारी : नव्या हंगामातही निर्यात सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:43 IST

साखर निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होत नसल्याने ते पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देणारी अधिसूचना केंद्र सरकारने गुरुवारी जारी केली. यानुसार साखर कारखान्यांना त्यांचा निर्यात कोटा ३१ डिसेंबरपर्यंत

चंद्रकांत कित्तुरे।कोल्हापूर : साखर निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होत नसल्याने ते पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देणारी अधिसूचना केंद्र सरकारने गुरुवारी जारी केली. यानुसार साखर कारखान्यांना त्यांचा निर्यात कोटा ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावा लागणार आहे.

देशात २५० लाख टन साखरेची गरज असताना ३२० लाख टन उत्पादन जादा झाल्याने साखरेचे दर गडगडले. ते वाढावेत यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्या. मे महिन्यात २० लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्याच्या निर्णयाचाही त्यामध्ये समावेश आहे. या निर्णयानुसार देशातील ५२८ कारखान्यांना साखरेचा निर्यात कोटा ठरवून देण्यात आला होता.

३० सप्टेंबरपर्यंत ही साखर निर्यात करावयाची होती. मात्र, जागतिक बाजारातही साखरेचे दर घसरलेले असल्याने आतापर्यंत अवघे चार लाख ८० हजार टन साखर निर्यात झाली आहे.निर्धारित लक्ष्य पूर्ण होत नसल्याने केंद्र शासनाने साखर निर्यातीला गुरुवारी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. तसेच गाळप केलेल्या प्रतिटन साखरेपैकी ७.१४ किलो साखर निर्यात करण्याचे लक्ष्य दिले आहे. ही साखर २०१७-१८च्या हंगामातील तसेच नव्या २०१८-१९च्या हंगामात उत्पादित झालेली असली तरी चालणार आहे. याचाच अर्थ पुढील हंगामातही साखर निर्यात चालू राहणार आहे.जागतिक बाजारात साखरेचा दर नीचांकावरअमेरिकेत २० आॅगस्टला वायदे बाजारातील साखरेचे भाव ९.९८ सेंट इतके घसरले. २१ रोजी ते ९.९९ सेंट इतके होते. १० सेंटच्या खाली साखर आल्याने तो चालू दशकातला नीचांकी दर ठरला आहे. आॅगस्ट २०१५ मध्ये हा दर १०.१३ सेंटपर्यंत खाली आला होता. आॅक्टोबर २०१६ मध्ये हाच दर २३.९० सेंटवर जाऊन पोहोचला होता. १० ते ११ सेंटच्या दरम्यान दर असल्यास भारतीय चलनात तो १४५० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल असा पडतो. यामुळे साखर उद्योगाची चिंता आणखी वाढली आहे. 

कारखान्यांचे सहकार्य गरजेचेदेशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी निर्यात हाच मार्ग आहे. त्यासाठी कारखान्यांचे सहकार्य गरजेचे आहे. जागतिक बाजारात दर नाही म्हणून केंद्राकडे दर फरक मागणारे कारखानदार एकीकडे ५० लाख टन कच्च्या साखरेची निर्यात करण्याची मागणी करीत आहेत. स्वत: मात्र ठरलेला कोटा पूर्ण करण्यास मागेपुढे पाहत आहेत. देशातील साखर कमी झाली तरच दर वाढणार आहेत. त्यामुळे कारखान्यांनी निर्यात कोटा पूर्ण करायला हवा, असे या उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेMONEYपैसा