शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

साखर निर्यातीस ३ महिन्यांची मुदतवाढ अधिसूचना जारी : नव्या हंगामातही निर्यात सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:43 IST

साखर निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होत नसल्याने ते पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देणारी अधिसूचना केंद्र सरकारने गुरुवारी जारी केली. यानुसार साखर कारखान्यांना त्यांचा निर्यात कोटा ३१ डिसेंबरपर्यंत

चंद्रकांत कित्तुरे।कोल्हापूर : साखर निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होत नसल्याने ते पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देणारी अधिसूचना केंद्र सरकारने गुरुवारी जारी केली. यानुसार साखर कारखान्यांना त्यांचा निर्यात कोटा ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावा लागणार आहे.

देशात २५० लाख टन साखरेची गरज असताना ३२० लाख टन उत्पादन जादा झाल्याने साखरेचे दर गडगडले. ते वाढावेत यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्या. मे महिन्यात २० लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्याच्या निर्णयाचाही त्यामध्ये समावेश आहे. या निर्णयानुसार देशातील ५२८ कारखान्यांना साखरेचा निर्यात कोटा ठरवून देण्यात आला होता.

३० सप्टेंबरपर्यंत ही साखर निर्यात करावयाची होती. मात्र, जागतिक बाजारातही साखरेचे दर घसरलेले असल्याने आतापर्यंत अवघे चार लाख ८० हजार टन साखर निर्यात झाली आहे.निर्धारित लक्ष्य पूर्ण होत नसल्याने केंद्र शासनाने साखर निर्यातीला गुरुवारी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. तसेच गाळप केलेल्या प्रतिटन साखरेपैकी ७.१४ किलो साखर निर्यात करण्याचे लक्ष्य दिले आहे. ही साखर २०१७-१८च्या हंगामातील तसेच नव्या २०१८-१९च्या हंगामात उत्पादित झालेली असली तरी चालणार आहे. याचाच अर्थ पुढील हंगामातही साखर निर्यात चालू राहणार आहे.जागतिक बाजारात साखरेचा दर नीचांकावरअमेरिकेत २० आॅगस्टला वायदे बाजारातील साखरेचे भाव ९.९८ सेंट इतके घसरले. २१ रोजी ते ९.९९ सेंट इतके होते. १० सेंटच्या खाली साखर आल्याने तो चालू दशकातला नीचांकी दर ठरला आहे. आॅगस्ट २०१५ मध्ये हा दर १०.१३ सेंटपर्यंत खाली आला होता. आॅक्टोबर २०१६ मध्ये हाच दर २३.९० सेंटवर जाऊन पोहोचला होता. १० ते ११ सेंटच्या दरम्यान दर असल्यास भारतीय चलनात तो १४५० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल असा पडतो. यामुळे साखर उद्योगाची चिंता आणखी वाढली आहे. 

कारखान्यांचे सहकार्य गरजेचेदेशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी निर्यात हाच मार्ग आहे. त्यासाठी कारखान्यांचे सहकार्य गरजेचे आहे. जागतिक बाजारात दर नाही म्हणून केंद्राकडे दर फरक मागणारे कारखानदार एकीकडे ५० लाख टन कच्च्या साखरेची निर्यात करण्याची मागणी करीत आहेत. स्वत: मात्र ठरलेला कोटा पूर्ण करण्यास मागेपुढे पाहत आहेत. देशातील साखर कमी झाली तरच दर वाढणार आहेत. त्यामुळे कारखान्यांनी निर्यात कोटा पूर्ण करायला हवा, असे या उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेMONEYपैसा