शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

ओबीसीत समाविष्ट जातींच्या पुनर्विलोकनावर २६ला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 15:46 IST

'मागास वर्ग आयोगाच्या कायद्यानुसार मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी या यादीत समाविष्ट असलेल्या अन्य प्रगत जातींना यादीतून वगळावे'

कोल्हापूर : मागासवर्ग आयोग कायदा २००५ मधील कलम ९ व ११ नुसार ओबीसी यादीतील समाविष्ट ३४२ जातीचे पुनर्विलोकन करा, यातील प्रगत जातींना बाहेर काढा असे झाले तरच मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे. याबाबत आयोगाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी केली. यावर आयोगाचे सदस्य निवृत्त न्यायाधीश ॲड. चंद्रलाल मेश्राम व ॲड. बी. सी. सगर-किल्लारीकर यांनी २६ तारखेच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी लढा देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.मागास वर्ग आयोगाच्या कायद्यानुसार मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी या यादीत समाविष्ट असलेल्या अन्य प्रगत जातींना यादीतून वगळावे लागणार आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे निमंत्रक दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, वसंतराव मुळीक यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त विशाल लोंढे उपस्थित होते.आयोगाच्या सदस्यांनी यावेळी सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना २६ मे रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी निमंत्रित केले. आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व मंत्र्यांच्या संयुक्त बैठकीत मराठा समाजाने भावना मांडाव्यात. त्यावेळी कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी सुनीता पाटील, चारुशीला पाटील, चंद्रकांत पाटील, राजू लिंग्रस, संजय काटकर, अमरसिंह निंबाळकर, रुपेश पाटील उपस्थित होते.

आयोग राजकारण्यांच्या हातची बाहुली : ॲड. इंदुलकरयावेळी ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, इम्पिरिकल डेटा नसल्याचे कारण सांगून आजवर मराठा आरक्षण डावलले गेले. ते सर्वोच्च न्यायालयात टिकवायचे असेल तर मागासवर्ग आयोगाने कलम ९ व ११ ची कार्यवाही केली पाहिजे. पण हे आयोग म्हणजे राजकारण्यांच्या हातची बाहुली आहे. नेत्यांना आपल्या मतांचा गठ्ठा कमी करायचा नसल्याने ते हा निर्णय घेणार नाहीत. पण आता मराठा समाज कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लढा देईल.

अडचणींचा पाढा..यावेळी आयोगाच्या सदस्यांनीच आपल्यासमोरील अडचणींचा पाढा वाचला. आयोगाकडे पुरेसे कर्मचारी नाहीत, शासन आमचे ऐकत नाही, आमच्या ठरावांवर निर्णय घेत नाही, कायद्यांची अंमलबजावणी केली जात नाही. नागरिकांकडून आलेली पत्रे उघडण्यासाठीसुद्धा स्टाफ नाही, क्लर्क नाही अशा अडचणी सांगितल्या. त्यामुळे ज्यांच्याकडे दाद मागावी तेच अडचणीत असल्याचे बैठकीत दिसले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण