शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

‘एफआरपी’चे २५७ कोटी थकले - कोल्हापूर विभागातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:20 IST

कोल्हापूर विभागातील १८ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली असून, उर्वरित १० कारखान्यांकडे २५७ कोटी रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत. सर्वाधिक ९६ कोटी रुपये वारणा कारखान्याकडे एफआरपी थकीत

ठळक मुद्देजिल्ह्यातील चार कारखाने

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील १८ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली असून, उर्वरित १० कारखान्यांकडे २५७ कोटी रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत. सर्वाधिक ९६ कोटी रुपये वारणा कारखान्याकडे एफआरपी थकीत आहे.

साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम साखरेच्या दरामुळे अडचणीत सापडला होता. एकरकमी एफआरपीवर शेतकरी संघटनांशी तडजोड झाली; पण साखरेचे मूल्यांकन, बॅँकांची उचल आणि एफआरपी यांचा ताळमेळ बसत नसल्याने सर्वच कारखानदारांनी एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. प्रतिटन २३०० रुपये पहिली उचल दिली, तीही हंगाम सुरू झाल्यानंतर दीड-दोन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या हातात पडली. शेतकºयांचा ऊस जाऊन सहा महिने, तर हंगाम संपून तीन महिने होत आले तरी अद्याप काही कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे पैसे दिलेले नाहीत. मध्यंतरी शेतकरी संघटनांच्या दबावामुळे साखर आयुक्तांनी कारखान्यांवर महसुली कारवाई सुरू केली; पण ते आदेश तहसीलदारांच्या दप्तरातच राहिले.

कोल्हापूर विभागात ३८ साखर कारखान्यांनी हंगाम घेत दोन कोटी १६ लाख १५ हजार टनउसाचे गाळप केले. यांपैकी १८ कारखान्यांनी आतापर्यंत १०० टक्के एफआरपी दिली आहे; तर कोल्हापूर जिल्ह्यातील चार व सांगलीतील सहा कारखान्यांनी अजूनही शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत. त्यांच्याकडे २५७ कोटी ४९ लाख रुपये अडकले आहेत. नवीन हंगाम तोंडावर आला असताना मागील हंगामाचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, त्यात आता सणासुदीचा काळ असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कोल्हापुरातील ‘आजरा’, ‘नलवडे’, ‘गायकवाड’ व ‘वारणा,’ तर सांगलीतील ‘महाकाली’, ‘राजारामबापू युनिट- १’, ‘राजारामबापू युनिट- २, ‘सर्वाेदय’, ‘केन अ‍ॅग्रो’, ‘यशवंत’ या कारखान्यांकडे ‘एफआरपी’चे पैसे अडकले आहेत. सर्वाधिक ‘वारणा’ कारखान्याकडे तब्बल ९६ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे.

थकीत एफआरपी अशी : आजरा (१५.४६ कोटी), नलवडे (५.०७ कोटी), वारणा (९६.१५ कोटी), गायकवाड (५.३३ कोटी), महाकाली (१०.१२ कोटी), राजारामबापू युनिट १ (१५.४४ कोटी), राजारामबापू युनिट २ (५.२० कोटी), सर्वोदय (३.८१ कोटी), केन अ‍ॅग्रो (१०.६२ कोटी), यशवंत (७.३४ कोटी).

‘आरआरसी’ नोटिसांचा फार्सचसाखर आयुक्तांनी एफआरपी थकविणाºया कारखान्यांवर ‘आरआरसी’ (महसुली कारवाई) च्या नोटिसा बजावल्या.

विभागातील १३ कारखान्यांची साखर जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्याचे आदेश आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांना दिले होते.व्याजाचा मुद्दा न्यायालयातकायद्यानुसार उसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे; पण यंदा चौदा दिवसांत एकाही कारखान्याने पैसे दिलेले नाहीत. दोन महिन्यांनंतर २३०० रुपयांप्रमाणे बिले दिली.

विभागाची ६१३४ कोटी ८८ लाख रुपये देय एफआरपी होती. त्यातील रक्कम टप्प्याटप्प्यांनी दिली असली तरी त्यावरील व्याजाचा प्रश्न तसाच आहे. शेतकरी संघटना व्याजासाठी न्यायालयात गेली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसा