शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

‘एफआरपी’चे २५७ कोटी थकले - कोल्हापूर विभागातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:20 IST

कोल्हापूर विभागातील १८ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली असून, उर्वरित १० कारखान्यांकडे २५७ कोटी रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत. सर्वाधिक ९६ कोटी रुपये वारणा कारखान्याकडे एफआरपी थकीत

ठळक मुद्देजिल्ह्यातील चार कारखाने

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील १८ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली असून, उर्वरित १० कारखान्यांकडे २५७ कोटी रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत. सर्वाधिक ९६ कोटी रुपये वारणा कारखान्याकडे एफआरपी थकीत आहे.

साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम साखरेच्या दरामुळे अडचणीत सापडला होता. एकरकमी एफआरपीवर शेतकरी संघटनांशी तडजोड झाली; पण साखरेचे मूल्यांकन, बॅँकांची उचल आणि एफआरपी यांचा ताळमेळ बसत नसल्याने सर्वच कारखानदारांनी एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. प्रतिटन २३०० रुपये पहिली उचल दिली, तीही हंगाम सुरू झाल्यानंतर दीड-दोन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या हातात पडली. शेतकºयांचा ऊस जाऊन सहा महिने, तर हंगाम संपून तीन महिने होत आले तरी अद्याप काही कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे पैसे दिलेले नाहीत. मध्यंतरी शेतकरी संघटनांच्या दबावामुळे साखर आयुक्तांनी कारखान्यांवर महसुली कारवाई सुरू केली; पण ते आदेश तहसीलदारांच्या दप्तरातच राहिले.

कोल्हापूर विभागात ३८ साखर कारखान्यांनी हंगाम घेत दोन कोटी १६ लाख १५ हजार टनउसाचे गाळप केले. यांपैकी १८ कारखान्यांनी आतापर्यंत १०० टक्के एफआरपी दिली आहे; तर कोल्हापूर जिल्ह्यातील चार व सांगलीतील सहा कारखान्यांनी अजूनही शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत. त्यांच्याकडे २५७ कोटी ४९ लाख रुपये अडकले आहेत. नवीन हंगाम तोंडावर आला असताना मागील हंगामाचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, त्यात आता सणासुदीचा काळ असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कोल्हापुरातील ‘आजरा’, ‘नलवडे’, ‘गायकवाड’ व ‘वारणा,’ तर सांगलीतील ‘महाकाली’, ‘राजारामबापू युनिट- १’, ‘राजारामबापू युनिट- २, ‘सर्वाेदय’, ‘केन अ‍ॅग्रो’, ‘यशवंत’ या कारखान्यांकडे ‘एफआरपी’चे पैसे अडकले आहेत. सर्वाधिक ‘वारणा’ कारखान्याकडे तब्बल ९६ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे.

थकीत एफआरपी अशी : आजरा (१५.४६ कोटी), नलवडे (५.०७ कोटी), वारणा (९६.१५ कोटी), गायकवाड (५.३३ कोटी), महाकाली (१०.१२ कोटी), राजारामबापू युनिट १ (१५.४४ कोटी), राजारामबापू युनिट २ (५.२० कोटी), सर्वोदय (३.८१ कोटी), केन अ‍ॅग्रो (१०.६२ कोटी), यशवंत (७.३४ कोटी).

‘आरआरसी’ नोटिसांचा फार्सचसाखर आयुक्तांनी एफआरपी थकविणाºया कारखान्यांवर ‘आरआरसी’ (महसुली कारवाई) च्या नोटिसा बजावल्या.

विभागातील १३ कारखान्यांची साखर जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्याचे आदेश आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांना दिले होते.व्याजाचा मुद्दा न्यायालयातकायद्यानुसार उसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे; पण यंदा चौदा दिवसांत एकाही कारखान्याने पैसे दिलेले नाहीत. दोन महिन्यांनंतर २३०० रुपयांप्रमाणे बिले दिली.

विभागाची ६१३४ कोटी ८८ लाख रुपये देय एफआरपी होती. त्यातील रक्कम टप्प्याटप्प्यांनी दिली असली तरी त्यावरील व्याजाचा प्रश्न तसाच आहे. शेतकरी संघटना व्याजासाठी न्यायालयात गेली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसा