शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

हेल्मेटअभावी २२१ दुचाकीचालकांनी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 16:41 IST

bike, accident, police, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत एकूण ४९२ अपघात घडले. त्यांमधील ४०० हून अधिक दुचाकी अपघातांत २२१ चालकांचा मृत्यू झाला. पैकी ९५ टक्के दुचाकी अपघातांत चालकाच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात १० महिन्यांत ४०० हून अधिक दुचाकी अपघात हेल्मेटविना ९५ टक्के वाहनचालकांचा मृत्यू

तानाजी पोवारकोल्हापूर : हेल्मेट असते तर...!!! पण हा विचार दुर्घटनेनंतरच मनात येतो. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते अन‌् अपघातात जीव गमावलेला असतो. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत एकूण ४९२ अपघात घडले. त्यांमधील ४०० हून अधिक दुचाकी अपघातांत २२१ चालकांचा मृत्यू झाला. पैकी ९५ टक्के दुचाकी अपघातांत चालकाच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.डोक्याला हेल्मेट न घालता बहुतांश दुचाकीस्वार प्रवास करतात. दुचाकीचालकांनी व मागे बसलेल्या व्यक्तीने डोक्याला हेल्मेट घालणे कायद्याने सक्तीचे आहेच; पण त्याची तितक्या तीव्रतेने अंमलबजावणी होत नाही. वाहनचालकांनाही त्याचे गांभीर्य वाटत नाही.कोल्हापूर जिल्ह्यात या आठवड्यात झालेल्या प्रत्येक दुर्घटनेत डोक्याला गंभीर दुखापत होऊन चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. कदाचित त्यांच्या डोक्याला हेल्मेट असते तर अपघातात ते जखमी झाले असते; पण त्यांच्यावर मृत्यूचे प्रसंग ओढवले नसते, असे दिसते.महामार्गांवर अपघातांची मोठी संख्यापुणे-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गासह कोल्हापुरातून कोकणला जोडणारे तीन राज्य महामार्ग आहेत. या मार्गांवरही दुचाकीचालकांची मोठी वर्दळ आहे. या मार्गांवर दुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे असले तरीही त्याकडे पोलीस अथवा वाहनचालकांकडून गांभीर्याने पाहिले जात नाही; त्यामुळे या मार्गांवरच मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वारांचे अपघात होतात.

हेल्मेट नसल्यामुळे वाहन दुर्घटनेत बहुतांश २५ ते ३५ वयोगटातील तरुणांचे बळी गेलेल्यांची संख्या मोठी आहे, हेल्मेट न वापरणे म्हणजे आत्महत्या करण्याचाच प्रकार आहे. अपघातात अपंगत्व आले तरी केवळ हेल्मेट वापरल्याने डोके व जीवही सुरक्षित राहतो.- डॉ. वीरेंद्रसिंह पोवार, न्यूरो सर्जन, कोल्हापूर

टॅग्स :AccidentअपघातbikeबाईकPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर