शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
9
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
10
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
11
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
12
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
13
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
14
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
15
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
16
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
18
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
19
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!

दररोज २१ एमएलडी सांडपाणी कोल्हापुरात विनाप्रक्रिया पंचगंगेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 6:00 AM

जलचरांना मोठा फटका : शहर व परिसरातील नागरिकांसोबत शेतीचेही आरोग्य बिघडले, देशातील १० प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश

नसीम सनदी।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : न्यायालयाने सातत्याने फटकारल्यानंतरही कोल्हापूर शहरातील २१ एमएलडी सांडपाणी दररोज विनाप्रक्रिया थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. त्याचा फटका माणसांसोबतच शेती आणि जलचरांना बसत आहे.देशातील १० प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश होतो. या प्रदूषणात कोल्हापूर शहराचा वाटा सर्वाधिक आहे. या प्रदूषणावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पन्नासवर नोटिसा काढल्या आहेत. तरीही दुर्लक्ष केल्याने अखेर उच्च न्यायालयानेच कान टोचले. तेव्हा कुठे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभा राहिला. शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी या तीन पम्पिंग स्टेशनमधून प्रतिदिन १३० एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. शहरातील १२ नाल्यांतून आलेल्या ९५ एमएलडी सांडपाण्यावर दुधाळी, बापटकॅम्प, लाईन बाजार येथील केंद्रांवर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पासाठी ७८ कोटींचा खर्च झाला आहे; पण अजूनही ते पूर्ण क्षमतेने चालवले जात नाही. त्यामुळे २१ एमएलडी पाणी थेट नदीत मिसळते. यामुळे माणसांसोबतच जलचर आणि जैवविविधतेलाही फटका बसत आहे. हिरवा तवंग आणि जलपर्णीमुळे नदीच्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचर गुदमरून मरण पावतात. या खोऱ्यातील मासेमारी आता संपल्यातच जमा आहे.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमलेल्या निरी समितीने अहवाल दिल्यानंतर जिल्ह्यातील सहा औद्योगिक वसाहतींतील २२८० उद्योेगांवर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याचे निर्बंध घालण्यात आले. यामुळे त्यांचे सांडपाणी नदीत मिसळणे काही प्रमाणात बंद झाले आहे. तरी इतर ठिकाणांवरून येणारे सांडपाणी नदीतच सोडले जात आहे. शहराबरोबरच नदीकाठावरील १७४ गावांना प्रदूषणाची मोठ्या प्रमाणावर झळ बसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने शासनाकडे १०८ कोटी रुपयांची मागणी केली होती; पण त्यालाही पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर ९६ कोटींचा सुधारित प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी दिला. त्यालाही शासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही.नदीशेजारी असूनहीटँकरने पाणीकोल्हापूर शहरातून बाहेर पडणारे सांडपाणी पंचगंगेतून वाहत जाऊन नृसिंहवाडीला कृष्णा नदीला जाऊन मिसळते. कोल्हापूर ते नृसिंहवाडी या जवळपास ६० मीटरच्या पट्ट्यात पंचगंगा नदी प्रदूषणाचे अक्राळविक्राळ स्वरूप धारण करते. शहराने केलेल्या घाणीचा फटका या नदीकाठावरील जनतेला आणि शेतीलाही बसतो. नदीकाठावर राहूनदेखील तब्बल ३९ गावांतील लोकांना पिण्यासाठीच्या पाण्याची व्यवस्था टँकरद्वारे अथवा आरओ प्लान्टद्वारे करावी लागते.शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरपंचगंगा खोºयातील करवीर, हातकणंगले आणि शिरोळ या तीन तालुक्यांतील शेतीला या प्रदूषणाची मोठी झळ बसत आहे. फेसाळलेल्या पाण्यामुळे या भागातील बहुतांश शेती क्षारपड होऊ लागली आहे. या भागात ऊस या प्रमुख पिकासह धान्य, कडधान्य आणि भाजीपाल्याची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मध्यंतरी शिरोळमध्ये पिकणाºया भाज्या खाल्ल्या तर कॅन्सर होतो, अशा अफवा होत्या. शिवाय दरवर्षी अतिसाराची साथ ठरलेलीच असते.

टॅग्स :pollutionप्रदूषण