शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांत कोल्हापुरातून १५८ अल्पवयीन मुली बेपत्ता, किती मुली सापडल्या.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 16:56 IST

पालकांच्या जिवाला घोर

कोल्हापूर : अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या सात महिन्यांत १५८ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या नोंदी पोलिस ठाण्यांमध्ये झाल्या आहेत. यातील १४४ मुलींचा शोध घेण्यात पोलिस आणि नातेवाइकांना यश आले. मात्र, १४ मुली अद्याप सापडल्या नाहीत. गेल्या वर्षी बेपत्ता झालेल्या १५८ मुलींपैकी ३९ मुलींचा अजूनही शोध सुरूच आहे. पालकांसाठी काळजाचा तुकडा असलेल्या मुली अशा एकाएकी बेपत्ता होत असल्याने पालकांना धक्का बसत आहे.शाळेला गेली ती परत आलीच नाहीकाही मुली शालेय वयातच प्रेमाच्या जाळ्यात अडकतात. अल्लड वयात समज नसल्याने त्या सहज आमिषाला बळी पडतात. त्यामुळे शाळेला जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेली मुलगी परत येतच नसल्याने नातेवाइकांना पोलिस ठाण्यात धाव घ्यावी लागते. बेपत्ता झालेल्या मुलींपैकी अनेक मुली शाळेला जाते असे सांगून गेल्या आणि बेपत्ता झाल्याचे पोलिस सांगतात.

१५८ गेल्या ; १४४ परत मिळाल्यागेल्या सात महिन्यांत जिल्ह्यातील १५८ अल्पवयीन मुली घरातून निघून गेल्या. यातील १४४ मुलींचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना परत आणले. यातील काही मुलींचे समुपदेशन करून बाल न्यायालयाच्या आदेशाने त्यांना पालकांकडे सोपवले, तर काही मुलींची रवानगी सुधारगृहात केली. १४ मुलींचा शोध सुरूच आहे.गेल्या वर्षीच्या ३९ मुलींचा शोध सुरूचगेल्या वर्षी १५६ मुली घरातून बेपत्ता झाल्या. त्यापैकी ११७ मुलींचा शोध लागला. ३९ मुली अजूनही सापडलेल्या नाहीत. त्या राज्याबाहेर पळाल्या असाव्यात, असा पोलिसांचा अंदाज आहे. सुगावा लागताच त्यांना ताब्यात घेऊन परत आणले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पालकांच्या जिवाला घोरतळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या मुली मोठ्या होताच स्वतंत्र विचार करू लागतात. आई, वडील त्यांच्या हिताचाच विचार करतात, यावर त्यांचा विश्वास राहत नाही. प्रेमाच्या जाळ्यात अडकून क्षणिक आनंदासाठी त्या घर सोडतात. मात्र, त्यांच्या कृतीने पालकांच्या जिवाला घोर लागतो. मानसिक धक्क्यामुळे अनेक पालकांवर औषधोपचार घेण्याची वेळ येते.अपहरणाचा गुन्हाअल्पवयीन मुलगी अथवा मुलगा बेपत्ता झाल्यास कायद्याच्या भाषेत त्याचे अपहरण झाले, असेच समजले जाते. त्यामुळे पोलिस ठाण्यात नोंद होताना अपहरणाचा गुन्हा दाखल होतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMissingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस