शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर: चोरीस गेलेले १५ लाख रुपये किमतीचे १५० मोबाईल जप्त, मूळ मालकांना केले परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 11:56 IST

या कामगिरीबद्दल पथकाला १० हजारांचे बक्षीसही जाहीर

कोल्हापूर : जिल्ह्यातून २०१९ पासून अनेकजणांचे मोबाईल गहाळ झाले होते. या मोबाईलचा सायबर पोलीस ठाण्याकडून शोध सुरू होता. तांत्रिक तपासाच्या आधारे शोध मोहीम राबवून येथील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटकातून १५ लाख रुपये किमतीचे १५० मोबाईल संच हस्तगत केले. ते मूळ मालकांना बुधवारी परत केले. या कामगिरीबद्दल पथकाला १० हजारांचे बक्षीसही जाहीर केले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दिवसेंदिवस मोबाईल चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. अशा चोरट्यांवर अंकुश ठेवणे आणि गहाळ मोबाईल शोधून काढणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी तानाजी सावंत आणि कर्मचाऱ्यांची विशेष बैठक घेतली होती. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून या ठाण्यातील कर्मचारी अमर वासुदेव, सागर माळवे, रवींद्र पाटील, प्रदीप पावरा हे तांत्रिक तपास करीत होते. या कामात स्थानिक गुन्हे अन्वेषणचे असिफ कलायगार, सुरेश पाटील यांच्यासह पथकाने विशेष सहकार्य केले. त्यामुळे कर्नाटकातून ५५ आणि महाराष्ट्रातून ९५ असे १५० मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

मूळ मालकांना आतापर्यंत २६७ मोबाईल परत

आतापर्यंत या पथकाने २६७ मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत केले आहेत. त्यांची किंमत सुमारे २६ लाख इतकी आहे. ही मोहीम यापुढे सुरू ठेवली जाणार आहे. यात विशेष कामगिरी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक कोमल पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केल्याची माहिती पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी