शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

जिल्हा बँकेकडे सेवा संस्थांचे १४६ कोटी अडकले

By admin | Published: September 22, 2015 9:17 PM

जिल्ह्यात १८५६ सेवा संस्था : भागभांडवलावर गेल्या सहा ते सात वर्षांपासून लाभांश नाही

 प्रकाश पाटील - कोपार्डे -पीक कर्जासाठी सेवा संस्थांना पतपुरवठा करणाऱ्या जिल्हा बँकेकडून एकूण कर्जावर भागभांडवल म्हणून पाच टक्के रक्कम घेतली जाते. या भागभांडवलापोटी जिल्ह्यातील १८५६ संस्थांचे १४६ कोटी ६९ लाख रुपये जिल्हा बँकेत अडकले आहे. यावर लाभांशही मिळत नसल्याने सेवा संस्थांचे पाय खोलातच जात असल्याचे मत सहकारातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अल्प दरातील कर्जाचा पुरवठा करण्यासाठी त्रिस्तरीय पद्धत आहे. ‘नाबार्ड पीक कर्जासाठी जिल्हा बँकांना पतपुरवठा करते, तर जिल्हा बँका सेवा संस्थांना पतपुरवठा करतात. सेवा संस्थांमार्फत खातेदार सभासदांना प्रतिएकर ३४ हजार रुपये दिले जातात. एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी, तर एक ते दोन लाखाला दोन टक्के व दोन लाखांवरील पीक कर्जाला चार टक्के व्याज आकारणी होते. पंजाबराव देशमुख कृषी कर्ज व्याज सवलतीतून शेतकऱ्यांना परतावा केला जातो. यामुळे सेवा संस्थेच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून, सेवा संस्थेच्या तोट्यात वर्षानुवर्षे वाढ होत आहे. याचा परिणाम जिल्ह्यात निम्म्याहून अधिक म्हणजे ९६५ संस्था तोट्यात गेल्या आहेत, तर ८७२ संस्थाच नफ्यात आहेत.सेवा संस्था शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करताना जिल्हा बँकेच्या नियमानुसार एकूण रकमेच्या पाच टक्के रक्कम भागभांडवल म्हणून कपात करतात. ही वर्षानुवर्षे सुरू असलेली कपात यावर्षीच्या अहवाल सालात १४६ कोटी ६९ लाखांवर पोहोचली आहे. गेली सहा ते सात वर्षे यावर एक पैसाही लाभांश या संस्थांना जिल्हा बँकेने दिलेला नसून कोट्यवधींची रक्कम बिनव्याजीच वापरली जाते. त्यामुळे तोट्यातील संस्थांना संजीवनी द्यायची असेल तर या रकमेचा केवळ सहा टक्के लाभांश काढला तरी नऊ ते दहा कोटी रुपये सेवा संस्थांना मिळणार आहेत. मात्र, तोट्यात असलेल्या बँकांना रिझर्व्ह बँकेच्या नियमाचे कारण पुढे करून लाभांश देता येत नाही, हे कारण सांगणाऱ्या जिल्हा बँक प्रशासनाकडून इतर खर्चासाठी (त्याची वर्गवारी नाही) एक कोटी ७९ लाख ४५ हजार १0 रुपये खर्च होतात. यावेळी रिझर्व्ह बँकेचे नियम कुठे जातात? असा प्रश्न संस्थाचालकांतून विचारला जात आहे. तुमच्या चैन्या; मात्र शेतकऱ्यांना उत्तरे देताना आमचा जीव गुदमरतोय, अशी प्रतिक्रिया एका सचिवाने आपले नाव जाहीर न करण्याच्या बोलीवर दिली. जर लाभांश दिला गेला तर किमान नोकरांचे पगार व स्टेशनरी तरी भागवता येईल. तसेच संस्थांना थोडातरी दिलासा मिळेल, असेही सांगण्यात आले.सहकारी सेवा संस्था जिल्हा बँकेकडून कर्ज घेताना भागभांडवल वसूल करते. मात्र, यावर लाभांश दिला जात नाही. इतर राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतल्यास सर्वच्या सर्व रक्कम शेतकऱ्यांना मिळते. जिल्ह्यातील सेवा संस्थांचे कोट्यवधी रुपये विनाकारण भागभांडवलच्या नावाखाली जिल्हा बँकेत पडून आहेत. यावर बँक आपलाच व्यवसाय करत आहे.- एन. सी. पाटील, अध्यक्ष, हनुमान विकास सेवा संस्था पाटपन्हाळा, ता. पन्हाळा