शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कोल्हापुरात वीटभट्टी, ऊसतोड कामगारांची १३६ मुले शिक्षणाच्या प्रवाहात, अवनिचा पुढाकार 

By संदीप आडनाईक | Updated: February 8, 2025 17:08 IST

मुलांना बालमजुरीतून मुक्त करण्याचा निर्धार

संदीप आडनाईककोल्हापूर : बाल हक्क संरक्षण विषयात काम करणाऱ्या कोल्हापुरातील अवनि या संस्थेने पुढाकार घेतल्यामुळे यंदाच्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वीटभट्टी आणि ऊसतोड कामगारांची १३६ मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत.प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकारानुसार ७ ते १४ वयोगटांतील बालकांना प्राथमिक शाळेत दाखल केले जाते. अवनिने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील २३ कारखाना कार्यक्षेत्रात अशी ८०० ते १००० बालके शिक्षणापासून वंचित आढळली. स्थलांतरित विकास प्रकल्प आणि वीटभट्टी साखर शाळा उपक्रमांतर्गत अवनि फक्त ११ कारखान्यांपर्यंतच पोहोचली. संस्थेने २३-२४ या हंगामात वीटभट्टीवरील वाकरे, खुपिरे, दोनवडे, जाधववाडी येथील जिल्हा परिषदेच्या तसेच महानगरपालिकेच्या शाळेत ६४ बालकांना दाखल केले.याशिवाय विद्यामंदिर कोरोची आणि कुडित्रे येथील श्रीराम हायस्कूलमध्ये ७२ ऊसतोड कामगारांच्या बालकांना प्रत्यक्ष दाखल करून त्यांना बालमजुरीतून मुक्त केले. त्यांना शैक्षणिक साहित्याचे तसेच स्कूल बॅगचेही वाटप केले. यासाठी साताप्पा मोहिते, अमर कांबळे, रवींद्र कुऱ्हाडे, वैशाली कांबळे, अंजली कांबळे, जयश्री कांबळे, शिल्पा भास्कर अश्विनी खोत आणि करूणा आठवले परिश्रम घेत आहेत.ने-आण करण्याचीही स्वीकारली जबाबदारीस्थलांतरित ठिकाणापासून शाळेचे अंतर दूर असल्याने संस्थेच्या प्रतिनिधी त्यांना रोज शाळेपर्यंत पोहोचवतात आणि शाळा सुटल्यानंतर त्यांना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणतात.

  • ६४ बालके वीटभट्टीवरील कामगारांची
  • ७२ बालके ऊसतोड कामगारांची
  • ४ ते ६ वयोगटांतील बालकांनाही शिक्षण
  • ११ ठिकाणी डे केअर सेंटर सुरू
  • १७८ बालके गिरवताहेत शिक्षणाचे धडे

खरंतर ३ ते ६ वयोगटांतील बालकांसाठी अंगणवाडीची जबाबदारी शासनाची आहे. मागणी करूनही याकडे दुर्लक्ष झाले, म्हणून अवनिने काही डे-केअर सेंटर सुरू केले. यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या मुख्याध्यापकांचे तसेच शिक्षकांचेही सहकार्य लाभत आहे. -अनुराधा भोसले, अध्यक्षा, अवनि संस्था.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसSchoolशाळाStudentविद्यार्थी