शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

कोल्हापुरात वीटभट्टी, ऊसतोड कामगारांची १३६ मुले शिक्षणाच्या प्रवाहात, अवनिचा पुढाकार 

By संदीप आडनाईक | Updated: February 8, 2025 17:08 IST

मुलांना बालमजुरीतून मुक्त करण्याचा निर्धार

संदीप आडनाईककोल्हापूर : बाल हक्क संरक्षण विषयात काम करणाऱ्या कोल्हापुरातील अवनि या संस्थेने पुढाकार घेतल्यामुळे यंदाच्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वीटभट्टी आणि ऊसतोड कामगारांची १३६ मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत.प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकारानुसार ७ ते १४ वयोगटांतील बालकांना प्राथमिक शाळेत दाखल केले जाते. अवनिने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील २३ कारखाना कार्यक्षेत्रात अशी ८०० ते १००० बालके शिक्षणापासून वंचित आढळली. स्थलांतरित विकास प्रकल्प आणि वीटभट्टी साखर शाळा उपक्रमांतर्गत अवनि फक्त ११ कारखान्यांपर्यंतच पोहोचली. संस्थेने २३-२४ या हंगामात वीटभट्टीवरील वाकरे, खुपिरे, दोनवडे, जाधववाडी येथील जिल्हा परिषदेच्या तसेच महानगरपालिकेच्या शाळेत ६४ बालकांना दाखल केले.याशिवाय विद्यामंदिर कोरोची आणि कुडित्रे येथील श्रीराम हायस्कूलमध्ये ७२ ऊसतोड कामगारांच्या बालकांना प्रत्यक्ष दाखल करून त्यांना बालमजुरीतून मुक्त केले. त्यांना शैक्षणिक साहित्याचे तसेच स्कूल बॅगचेही वाटप केले. यासाठी साताप्पा मोहिते, अमर कांबळे, रवींद्र कुऱ्हाडे, वैशाली कांबळे, अंजली कांबळे, जयश्री कांबळे, शिल्पा भास्कर अश्विनी खोत आणि करूणा आठवले परिश्रम घेत आहेत.ने-आण करण्याचीही स्वीकारली जबाबदारीस्थलांतरित ठिकाणापासून शाळेचे अंतर दूर असल्याने संस्थेच्या प्रतिनिधी त्यांना रोज शाळेपर्यंत पोहोचवतात आणि शाळा सुटल्यानंतर त्यांना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणतात.

  • ६४ बालके वीटभट्टीवरील कामगारांची
  • ७२ बालके ऊसतोड कामगारांची
  • ४ ते ६ वयोगटांतील बालकांनाही शिक्षण
  • ११ ठिकाणी डे केअर सेंटर सुरू
  • १७८ बालके गिरवताहेत शिक्षणाचे धडे

खरंतर ३ ते ६ वयोगटांतील बालकांसाठी अंगणवाडीची जबाबदारी शासनाची आहे. मागणी करूनही याकडे दुर्लक्ष झाले, म्हणून अवनिने काही डे-केअर सेंटर सुरू केले. यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या मुख्याध्यापकांचे तसेच शिक्षकांचेही सहकार्य लाभत आहे. -अनुराधा भोसले, अध्यक्षा, अवनि संस्था.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसSchoolशाळाStudentविद्यार्थी