शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

१३४ वर्षांचा खंबीर कोल्हापूरचा ‘कळंबा’ खचतोय,मजबुतीकरणाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:50 IST

अनेक वर्षांपासून अर्ध्या अधिक शहराची तहान भागविणारा कळंबा तलाव अलीकडील काळात खचत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देदगडी पिचिंग पूर्णपणे उखडले, तर बंधाºयाला वरील बाजूने भेगा ऐन पावसाळ्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता

भारत चव्हाण ।कोल्हापूर : मातीचा परंतु एकमेकांना आधार देणारा तीन कप्पी बंधारा, पाणी संचय होण्यासाठी पुरेशी खोली असलेली जागा, पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यासाठी असलेला सांडवा, प्रदूषण होणार नाही याची घेण्यात आलेली विशेष काळजी आणि अशा नियोजनबद्ध कामांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून अर्ध्या अधिक शहराची तहान भागविणारा कळंबा तलाव अलीकडील काळात खचत असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या १३४ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या तलावाच्या मजबुतीकरणाकरिता कोणतीही विशेष खबरदारी घेण्यात आलेली नाही.कळंबा तलावाच्या मुख्य बंधाºयाला प्रमुख आधार देण्यासाठी अन्य दोन उपबंधारे बांधण्यात आलेले आहेत. त्यातील दोन उपबंधारे अगदी मजबूत आहेत; परंतु मुख्य बंधाºयाचा वरचा भाग गेल्या काही वर्षापासून खचू लागला आहे. संस्थानकाळात करण्यात आलेले पिचिंग पाण्याच्या दाबाने नामशेष झाले आहे. त्यानंतर करण्यात आलेले दगडी पिचिंंग कोसळले आहे.

अलीकडेच दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या निधीतून हाती घेण्यात आलेल्या १० कोटींच्या कामातून नव्याने दगडी पिचिंग करण्यात आले, तेही अवघ्या काही महिन्यांतच कोसळले आहे. बंधाºयाला पाण्याच्या बाजूने दिलेला दगडाचा अस्तर पूर्णत: खचला आहे. त्यामुळे ठेकेदाराने केलेल्या कामाचा दर्जा संशयाच्या भोवºयात सापडला आहे.

कळंबा तलाव हा १३४ वर्षांपूर्वी म्हणजे १ जुलै १८८३ रोजी बांधून पूर्ण करण्यात आला. त्यामुळे सध्या असणार बंधारा पाण्याचा भार पेलण्याकरिता किती सक्षम व मजबूत आहे याचे तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत तांत्रिक लेखापरीक्षण होणे अत्यावश्यक असून, त्यानुसार त्याची देखभाल-दुरुस्ती होणे गरजेचे आहे. सध्यातरी तलावाचा बंधारा निमुळता होत असून, खचलेला आणि भविष्यकाळातील धोक्याचा इशारा देत आहे.

महानगरपालिका प्रशासन, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण, राज्य सरकार यांच्याकडून तलावाकडे दुर्लक्ष झाले असून याही पुढे असेच दुर्लक्ष झाले तर मात्र एक दिवस ऐन पावसाळ्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता जाणकारांतून व्यक्त केली जाते. कारण या तलावाच्या खाली संपूर्ण कळंबा गाव असून पुढे शहराची लोकवस्ती आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.वरिष्ठांचेही दुर्लक्ष ....कळंबा तलावाच्या सुशोभीकरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दहा कोटींचा निधी मंजूर केला. त्यापैकी ७ कोटी ७५ लाख रुपये उपलब्ध झाले. अद्याप यातील ४५ लाख रुपये खर्च व्हायचे आहेत. त्यामुळे एवढ्या कमी किमतीत दगडी पिचिंग होणे अशक्य आहे. सध्या खर्च झालेला निधी आणि झालेले काम याचा ताळमेळ बसत असल्याचे वरकरणी दिसत नाही. झालेल्या खर्चाचे लेखापरीक्षण होणे आवश्यक असले तरी महानगरपालिका लेखापरीक्षक हे कार्यालयात बसून कागदपत्रांच्या आधारे लेखापरीक्षण करतात असा अनुभव आहे. अशीच थेट पाईपलाईन योजनेतील एका पुलास पंचवीस लाख रुपये खर्च आला असताना अडीच कोटींच्या बिलास मंजुरी दिली होती.कळंबा तलावाच्या दक्षिणेला काही शेतकºयांनी अतिक्रमण करून ऊस, भात, भुईमूग शेती केली आहे. मागे १ लाख ४५ हजार रुपये भरून महानगरपालिकेने तलावची हद्द निश्चित करून घेतली. प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारची अतिक्रमणे काढली गेली नाहीत.तलावाचा इतिहास असा...कळंबा तलावाची जागा मेजर ई. स्मिथ यांनी पाहून निश्चित केली.इंजिनियर आर. जे. शेनॉन यांनी तलावाचा आराखडा तयार केला.शेनॉन यांनी ओव्हरसियर रघुनाथ रामचंद्र शिरगावकर यांच्या मदतीने तलाव बांधला.तलावाचे काम २१ मार्च १८८१ -१ जुलै १८८३ या काळात झाले.चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीत कागल संस्थानाधिपती जयसिंगराव आबासाहेब कार्यभार पाहत असताना काम पूर्ण झाले.पोलिटिकल एजंट - डब्लू. सी. पार व एच. एन. रिव्हज् होते.