शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'जलजीवन'मध्ये शासनाकडूनच उधळपट्टी, कोल्हापुरात गरज नसतानाही अनेक गावांत नव्या योजनांचा घाट

By समीर देशपांडे | Updated: February 16, 2023 17:33 IST

जलजीवन मिशनसाठी एका कोल्हापूर जिल्ह्याला १२०० कोटी रुपये दिले जाणार असताना पाण्याच्या उधळपट्टीवर मात्र कोणाचेच नियंत्रण नाही

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील किमान ३०० हून अधिक जलजीवनच्या योजना अशा आहेत की, त्या ठिकाणी नवीन योजनेची गरज नाही. भुदरगड तालुक्यातील एक योजना सात वर्षांनंतर पूर्ण झाली. अजून त्यातून पाणी सुरू नाही, तोपर्यंत तिथे कोट्यवधी रुपयांची नवीन योजना धरण्यात आली आहे. हीच स्थिती प्रत्येक तालुक्यात आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अनेक ठिकाणी चरायचे कुरण म्हणूनच जलजीवन मिशनकडे पाहिल्याचे जाणवते.कोल्हापूर एकीकडे जिल्ह्याजिल्ह्यातील पाणी योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना दुसरीकडे किती पाणी वापरावे, यावर बंधनच नसल्याने शासनच पाण्याची उधळपट्टी करण्यासाठी परवानगी देत असल्याचे चित्र राज्यभर पाहावयास मिळत आहे. देशभर सध्या नागरिकांना फुकट देण्यामध्ये विविध राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यामुळे शासनाने आमच्याकडून कशाचेही पैसे घेऊ नयेत, अशीच भावना होऊ लागली आहे.

जलजीवन मिशनसाठी एका कोल्हापूर जिल्ह्याला १२०० कोटी रुपये दिले जाणार असताना पाण्याच्या उधळपट्टीवर मात्र कोणाचेच नियंत्रण नाही, अशी स्थिती आहे. म्हणूनच ज्या गावात ही योजना राबवायची तेथील ग्रामस्थांनी किमान वॉटर मीटर बसवून घ्यावे, यासाठी शासनाने सक्ती करण्याची गरज आहे.आताच मिळाले तर पैसे मिळणार म्हणून जो तो मुंबईपर्यंत धावपळ करून या योजना मंजूर करून आणत आहे. परंतु अजूनही अनेक गावांमध्ये नळांना तोट्या नाहीत. मध्यंतरी जिल्हा परिषदेने ज्यांच्या नळांना तोट्या नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची मोहीम सुरू केली होती. परंतु वाईटपणा घ्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबवण्यात आली नाही.

लोकवर्गणी नको आणि पाणीपट्टीही नकोकोणत्याही गावात पाणीपट्टी वाढवली जात नाही. याला अपवाद असतीलही. परंतु ग्रामस्थांचा रोष नको म्हणून ती वाढवली जात नाही. लोकवर्गणी बसवली की, पुन्हा ग्रामस्थ नाराज होतात. म्हणून त्याची वसुली ठेकेदाराकडून करायची. वर जो तो वाट्टेल तसे पाणी वापरणार. त्याला मीटर बसवायचे म्हटले की ग्रामस्थांचा विरोध. कारण एकदा का मीटर बसले की जेवढे पाणी वापरले तेवढ्याचे बिल येणार. म्हणूनच शासनाने आता मीटरची सक्ती करण्याची गरज आहे.

पाणी सोडायचे आणि नंतर मुरवायचेजर वॉटर मीटर बसले तर साहजिकच ग्रामस्थ गरजेएवढे पाणी वापरतील. नळांना तोट्या बसवतील. पाईप लावून गाड्या, गुरे, ढोरे धुण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन धुतील. त्यामुळे सांडपाणीही कमी तयार होईल. जेणेकरून त्याचे व्यवस्थापन करणे सोपे होईल. परंतु आधी पाणी फुकट घ्यायचे, मग ते वाट्टेल तसे वापरायचे आणि नंतर पुन्हा सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी, पंचगंगेचे प्रदूषण होऊ नये म्हणून शासनाने पैसे देण्याची गरज आहे म्हणून निवेदने देत सुटायचे, अशी ही एक समृद्ध आणि गावासह शासनाचे वाटोळे लावण्याची परंपराच निर्माण झाली आहे. राज्यकर्त्यांनाही त्यांच्या निवडणुका महत्त्वाच्या असल्याने शाश्वत विकास हे केवळ ‘पीपीटी’पुरतेच राहणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीGovernmentसरकार