शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

चुकीची माहिती भरणाऱ्या ११८ शिक्षकांच्या होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:57 PM

गतवर्षी अन्य जिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेल्या ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरली, अशा ११८ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, या सगळ्यांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करण्याची मागणी घेऊन पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठली असून आज, बुधवारी सर्वजण ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांची भेट घेणार आहेत

ठळक मुद्देचुकीची माहिती भरणाऱ्या ११८ शिक्षकांच्या होणार बदल्याअमन मित्तल, पदाधिकारी असीम गुप्तांच्या भेटीसाठी मुंबईत

कोल्हापूर : गतवर्षी अन्य जिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेल्या ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरली, अशा ११८ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, या सगळ्यांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करण्याची मागणी घेऊन पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठली असून आज, बुधवारी सर्वजण ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांची भेट घेणार आहेतगेल्या वर्षी परजिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांनी जे फॉर्म भरले होते, त्यामध्ये ‘नोकरी सुरू’ या कॉलममधील तारखा चुकीच्या लिहिल्या होत्या. त्यामुळे या सर्वांना सोयीची बदली ठिकाणे मिळाली होती. दरम्यान, राज्यातील अनेक शिक्षकांनी अशा प्रकारे चुकीची माहिती भरल्याने तसेच चुकीचे अंतर दाखविल्याने अशा सर्वांची एक वेतनवाढ रद्द करण्याचा आणि पुन्हा त्यांची बदली करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने काढला होता.यावरून गेले आठ महिने जिल्हा परिषदेमध्ये गरमागरम चर्चा सुरू होती.

अन्य जिल्हा परिषदांमध्ये कारवाई झाल्याने कोल्हापुरात कारवाई का नाही, अशी विचारणा सुरू झाली. यानंतर चौकशी करून, सुनावणी घेऊन यातील ११८ शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर यातील १०० जणांना क्लीन चिट देण्याचा निर्णय झाला.मात्र या निर्णयावरून सर्वसाधारण सभेमध्ये जोरदार गोेंधळ उडाला. शिक्षा देणारच असाल तर सगळ्यांना द्या, अशी मागणी करून ठरावही करण्यात आला. त्यामुळे पुन्हा १८ शिक्षकांनी सोमवारी (दि. १०) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांची भेट घेतली.

महाडिक यांनी अमन मित्तल यांच्याशी चर्चाही केली. मात्र सर्वसाधारण सभेचा ठराव आणि ग्रामविकास विभागाचा आदेश यांचा विचार करून या सर्वांच्या पुन्हा बदल्या करण्याचा निर्णय मित्तल यांनी घेतला आहे.पदाधिकाऱ्यांनी घेतली शिक्षकांची बाजूसोमवारी दिवसभर जिल्हा परिषदेत थांबलेल्या या ११८ शिक्षकांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांची भेट घेतली. यानंतर पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी थेट मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.

उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, अंबरीश घाटगे, ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, विजय भोजे, ‘स्वाभिमानी’चे राजेश पाटील हे मुंबईला रवाना झाले आहेत. आज, बुधवारी ते ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगणार आहेत.

गेले वर्षभर संघटना पदाधिकारी ‘झेडपी’तचशिक्षकांच्या बदल्यांचा विषय अतिशय क्लिष्ट झाल्याने विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी गेले वर्षभर बहुतांश वेळा जिल्हा परिषदेत असल्याचे पाहावयास मिळत आहे. उन्हाळी सुटी सुरू झाल्यापासून तर बहुतांश पदाधिकारी आणि शिक्षक गाठीभेटींमध्ये गुंतल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर