शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

इथेनॉलसाठीच्या ११४ प्रकल्पांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 11:49 PM

चंद्रकांत कित्तुरे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अतिरिक्त साखरेच्या प्रश्नावर इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला साखर उद्योगाने चांगला प्रतिसाद दिला आहे. इथेनॉलच्या विद्यमान प्रकल्पांची क्षमता वाढविणे, आधुनिकीकरण आणि नवीन प्रकल्प यासाठीच्या सहा हजार १३९ कोटींच्या ११४ प्रस्तावांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांच्या कर्जावरील सहा टक्के व्याज केंद्र सरकार ...

चंद्रकांत कित्तुरे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अतिरिक्त साखरेच्या प्रश्नावर इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला साखर उद्योगाने चांगला प्रतिसाद दिला आहे. इथेनॉलच्या विद्यमान प्रकल्पांची क्षमता वाढविणे, आधुनिकीकरण आणि नवीन प्रकल्प यासाठीच्या सहा हजार १३९ कोटींच्या ११४ प्रस्तावांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांच्या कर्जावरील सहा टक्के व्याज केंद्र सरकार भरणार आहे. यात महाराष्ट्रातील ५३ साखर कारखान्यांचा समावेश आहे.इथेनॉल प्रकल्पाचे प्रदूषण शून्य टक्क्यावर आणण्यासाठी अत्याधुनिक इन्सिनेरेशन बॉयलर उभारणी, डिस्टिलरीजची क्षमता वाढविणे आणि नवीन डिस्टिलरीजचे हे प्रस्ताव आहेत. सध्या देशाची इथेनॉल उत्पादनाची क्षमता सुमारे २.७५ अब्ज लिटर आहे. पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ही क्षमता ३.२५ अब्ज लिटरपर्यंत वाढविणे आवश्यक आहे. यामुळेच सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देताना यासाठीच्या प्रकल्पांना कर्जावर व्याज अनुदान देऊ केले आहे. त्याचप्रमाणे इथेनॉलच्या दरातही गेल्या महिन्यात भरीव वाढ केली आहे. उसाच्या रसापासून किंवा बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल तयार केल्यास ६०० लिटर इथेनॉल म्हणजे १ टन साखर, असे प्रमाण सरकारने निश्चित केले आहे. हे प्रमाण साखरेचा उतारा ठरविण्यासाठी उपयोगी पडणार आहे.मंजूर प्रस्तावांमध्ये अत्याधुनिक बॉयलर उभारणीचे २६ प्रस्ताव आहेत. तर सध्या असलेल्या डिस्टिलरीजची क्षमता वाढवण्यासाठीचे २७ प्रस्ताव आहेत. उर्वरित ६१ प्रस्ताव नव्या प्रकल्पांचे आहेत. येत्या दोन वर्षांत हे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास देशाच्या इथेनॉल निर्मितीक्षमतेत मोठी वाढ होणार आहे.महाराष्ट्रातील ५३ प्रकल्पांत साताऱ्यातील चार कारखानेकेंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने मंजूर केलेल्या ११४ प्रस्तावांमध्ये महाराष्ट्रातील ५३ प्रस्तावांचा समावेश आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातीलकुंभी-कासारी, दत्त- शिरोळ, डी. वाय. पाटील, रिलायबल शुगर, शरद-नरंदे या कारखान्यांचा तर सांगली जिल्ह्यातील हुतात्मा, मोहनराव शिंदे, उदगिरी,माणगंगा या कारखान्यांचा तर सातारा जिल्ह्यातील यशवंतराव मोहिते रेठरे, जरंडेश्वर, बाळासाहेब देसाई, जयवंत शुगर या कारखान्यांचा समावेश आहे.