शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

Kolhapur: राधानगरी अभयारण्यात ११ पाणवठे प्राण्यांसाठी वरदान, वाघासह बिबट्यांचे अस्तित्व 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:59 IST

नवीन पाच पाणवठे उभारणार

सागर चरापलेफुलेवाडी : दाजीपूर, राधानगरी अभयारण्यात बनविलेले ११ कृत्रिम पाणवठे उन्हाळ्यात वन्यजिवांसाठी उपयुक्त ठरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून उन्हाचा तडाका वाढल्याने वन्यजिवांना पाण्याची कमतरता जाणवत होती, यासाठी वन्यजीव विभागाने जंगलात बोअरवेल मारून केलेली पाण्याची व्यवस्था प्राण्यांसाठी वरदान ठरत आहे. यामुळे या प्राण्यांना त्यांच्या अधिवासातच पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे.

दाजीपूर अभयारण्यातील या अकरा पाणवठ्यात सुरुवातीला बोअर मारण्यात आले आहे. बोअरचे पाणी उपसण्यासाठी सोलर मोटर बसविली आहे. मोटर ऑटो असल्याने केव्हाही मोबाईलवरून चालू करण्यात येते. ते पाणी थेट पाणवठ्यामध्ये सोडले आहे. त्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत नाही.पाणवठ्यांची संख्या जास्त असल्याने तेथे प्राण्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे पर्यटनासाठी दाजीपूर अभयारण्यात जाणाऱ्या पर्यटकांनाही वन्यजिवांचे दर्शन होत आहे. कोल्हापूर परिक्षेत्र वन्यजीव विभागाने पुन्हा पाच नवीन पाणवठ्यांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर केला आहे. त्याला निधी मिळाल्यास हे नवे पाणवठे या वन्यजिवांची तहान भागविणार आहेत.

वन्यजिवांना अभयदाजीपूर अभयारण्यात एक वाघ, २० बिबट, ३० रान कुत्री, अस्वले यांचा अधिवास आहे. गव्यांना या अभयारण्यात संरक्षण आहे. जंगलातील मानवी हस्तक्षेपामुळे अभयारण्यातील वन्यप्राणी बेधडक मानवी वस्तीत फिरत आहे.

वन्यजिवांच्या अधिवासानुसार पाणवठे तयार केले आहेत. त्यांना उन्हाळ्यात जंगलाबाहेर फार वणवण न करता पाणी मिळणार आहे. या पाणवठ्यांमुळे कॅमेऱ्याद्वारे वन्यजिवांच्या हालचाली टिपण्यासही मदत होत आहे. - श्रीकांत पवार, विभागीय वनाधिकारी, वन्यजीव.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगलAnimalप्राणी