शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Kolhapur: राधानगरी अभयारण्यात ११ पाणवठे प्राण्यांसाठी वरदान, वाघासह बिबट्यांचे अस्तित्व 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:59 IST

नवीन पाच पाणवठे उभारणार

सागर चरापलेफुलेवाडी : दाजीपूर, राधानगरी अभयारण्यात बनविलेले ११ कृत्रिम पाणवठे उन्हाळ्यात वन्यजिवांसाठी उपयुक्त ठरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून उन्हाचा तडाका वाढल्याने वन्यजिवांना पाण्याची कमतरता जाणवत होती, यासाठी वन्यजीव विभागाने जंगलात बोअरवेल मारून केलेली पाण्याची व्यवस्था प्राण्यांसाठी वरदान ठरत आहे. यामुळे या प्राण्यांना त्यांच्या अधिवासातच पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे.

दाजीपूर अभयारण्यातील या अकरा पाणवठ्यात सुरुवातीला बोअर मारण्यात आले आहे. बोअरचे पाणी उपसण्यासाठी सोलर मोटर बसविली आहे. मोटर ऑटो असल्याने केव्हाही मोबाईलवरून चालू करण्यात येते. ते पाणी थेट पाणवठ्यामध्ये सोडले आहे. त्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत नाही.पाणवठ्यांची संख्या जास्त असल्याने तेथे प्राण्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे पर्यटनासाठी दाजीपूर अभयारण्यात जाणाऱ्या पर्यटकांनाही वन्यजिवांचे दर्शन होत आहे. कोल्हापूर परिक्षेत्र वन्यजीव विभागाने पुन्हा पाच नवीन पाणवठ्यांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर केला आहे. त्याला निधी मिळाल्यास हे नवे पाणवठे या वन्यजिवांची तहान भागविणार आहेत.

वन्यजिवांना अभयदाजीपूर अभयारण्यात एक वाघ, २० बिबट, ३० रान कुत्री, अस्वले यांचा अधिवास आहे. गव्यांना या अभयारण्यात संरक्षण आहे. जंगलातील मानवी हस्तक्षेपामुळे अभयारण्यातील वन्यप्राणी बेधडक मानवी वस्तीत फिरत आहे.

वन्यजिवांच्या अधिवासानुसार पाणवठे तयार केले आहेत. त्यांना उन्हाळ्यात जंगलाबाहेर फार वणवण न करता पाणी मिळणार आहे. या पाणवठ्यांमुळे कॅमेऱ्याद्वारे वन्यजिवांच्या हालचाली टिपण्यासही मदत होत आहे. - श्रीकांत पवार, विभागीय वनाधिकारी, वन्यजीव.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगलAnimalप्राणी