शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठीच्या आधाराची ‘शंभरी’

By admin | Updated: May 20, 2015 00:27 IST

सारस्वत वसतिगृहाची शताब्दीपूर्ती : गुणवत्तेच्या निकषांचा दंडक आजही कायम

राजर्षी शाहू महाराज यांच्या मदतीतून साकारलेल्या श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृहाने गुणवत्तेच्या निकषाचा दंडक आजही जोपासला आहे. प्रतिकूल परिस्थितीतील, सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या वसतिगृहाने शंभरी ओलांडली आहे. ‘शिक्षण व सेवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या सारस्वत समाजाने राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे काम वसतिगृहाच्या माध्यमातून केले आहे. आज, बुधवारी या वसतिगृहाचा शताब्दीपूर्तीचा सोहळा होत आहे. त्यानिमित्त वसतिगृहाच्या वाटचालीचा हा आढावा.जात, धर्म आणि पंथविरहित गुणवत्तेनुसार प्रवेश या वसतिगृहात दिला जातो. निव्वळ वसतिगृह नाही, तर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यांना चांगले विचार समजावेत यासाठी व्याख्याने घेतली जातात. वसतिगृहातर्फे सामाजिक संस्थांना मदत केली जाते. त्यासह गरीब, हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, बिनव्याजी कर्जाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जातो. आतापर्यंत कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथील शेकडो विद्यार्थ्यांना वसतिगृहाने शिक्षण, नोकरीसाठी बळ दिले आहे. वीस वर्षांत ६७ लाखांची मदतवसतिगृहामार्फत ‘शिक्षण साहाय्य योजना’ राबविली जाते. १९९४ ते मार्च २०१४ अखेर विविध उपक्रमांतर्गत एकूण ४ हजार १४१ विद्यार्थ्यांना ६७ लाख ५२ हजार ३०० रुपयांचे वितरण केले आहे. त्यात शिष्यवृत्ती व पारितोषिकांपोटी २ हजार ९४३ विद्यार्थ्यांना ३० लाख ६७ हजार ३८० रुपये, बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तींतर्गत २७४ जणांना २७ लाख ३७ हजार ७२०, संशोधन साहाय्यासाठी ३ विद्यार्थ्यांना १५ हजार आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार निवासी शिष्यवृतींतर्गत ८८४ विद्यार्थ्यांना ३ लाख ८१ हजार ७०० रुपयांचे वितरण केले आहे. सामाजिक संस्थांना साहाय्य म्हणून ३७ संस्थांना ५ लाख ५० हजार ५०० रुपयांची मदत केली आहे. त्यासह १०७ विद्यार्थ्यांना एकूण १८ लाख ७५ हजार ४९० रुपयांची ‘बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती’ दिली आहे.ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा केंद्राचा मानसगुणवत्तेच्या निकषांवर सर्व समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जातो. शिवाय शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांना मदत केली जाते, असे वसतिगृहाच्या अध्यक्षा डॉ. यशस्विनी जनवाडकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, सध्या वसतिगृहात १०५ मुलांच्या राहण्याची सुविधा आहे. केवळ राहण्याची सोय नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. भविष्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ई-लायब्ररी, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह, मराठी बालवाडी, शाळा सुरू करण्याचा मानस आहे. वसतिगृहाच्या इतिहासातील मी पहिली महिला अध्यक्षा आहे. वसतिगृहाला शिक्षणाचे व्यापक केंद्र बनविण्याचा माझा प्रयत्न आहे. आपलं घर, गाव सोडून कोल्हापुरात आलेल्या विद्यार्थ्यांना मातेची माया, प्रेम देणाऱ्या वसतिगृहाने शंभरी ओलांडली आहे. त्याचे स्वरूप बदलले असले, तरी तेथील आपुलकी, जिव्हाळा पूर्वीचाच आहे.- संतोष मिठारी, कोल्हापूरवसतिगृह असे उभारलेसारस्वत समाजास वसतिगृहासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी भूखंड व आर्थिक मदत दिली. श्रीमती सरस्वतीबाई गणेश लाटकर यांनी वसतिगृहाच्या उभारणीसाठी आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्या देणगीतून सारस्वत बोर्डिंगची स्थापना २० मे १९१५ रोजी झाली. त्याचे उद्घाटन राजर्षी शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. आतापर्यंत वसतिगृहाची धुरा रावबहाद्दूर शिरगावकर, ए. बी. ओळकर, प्रा. व्ही. ए. देसाई, शांताराम दाभोळकर, सीताराम शिरगांवकर, दामोदर तारळेकर, म. ग. लाटकर, आदींनी सांभाळली आहे. त्यांच्या योगदानामुळेच वसतिगृहाचा विस्तार झाला. दगडी, कौलारू ११ खोल्यांची इमारतीचा के. डी. कामत यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत विस्तार करण्यात आला.