शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

शिक्षणासाठीच्या आधाराची ‘शंभरी’

By admin | Updated: May 20, 2015 00:27 IST

सारस्वत वसतिगृहाची शताब्दीपूर्ती : गुणवत्तेच्या निकषांचा दंडक आजही कायम

राजर्षी शाहू महाराज यांच्या मदतीतून साकारलेल्या श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृहाने गुणवत्तेच्या निकषाचा दंडक आजही जोपासला आहे. प्रतिकूल परिस्थितीतील, सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या वसतिगृहाने शंभरी ओलांडली आहे. ‘शिक्षण व सेवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या सारस्वत समाजाने राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे काम वसतिगृहाच्या माध्यमातून केले आहे. आज, बुधवारी या वसतिगृहाचा शताब्दीपूर्तीचा सोहळा होत आहे. त्यानिमित्त वसतिगृहाच्या वाटचालीचा हा आढावा.जात, धर्म आणि पंथविरहित गुणवत्तेनुसार प्रवेश या वसतिगृहात दिला जातो. निव्वळ वसतिगृह नाही, तर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यांना चांगले विचार समजावेत यासाठी व्याख्याने घेतली जातात. वसतिगृहातर्फे सामाजिक संस्थांना मदत केली जाते. त्यासह गरीब, हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, बिनव्याजी कर्जाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जातो. आतापर्यंत कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथील शेकडो विद्यार्थ्यांना वसतिगृहाने शिक्षण, नोकरीसाठी बळ दिले आहे. वीस वर्षांत ६७ लाखांची मदतवसतिगृहामार्फत ‘शिक्षण साहाय्य योजना’ राबविली जाते. १९९४ ते मार्च २०१४ अखेर विविध उपक्रमांतर्गत एकूण ४ हजार १४१ विद्यार्थ्यांना ६७ लाख ५२ हजार ३०० रुपयांचे वितरण केले आहे. त्यात शिष्यवृत्ती व पारितोषिकांपोटी २ हजार ९४३ विद्यार्थ्यांना ३० लाख ६७ हजार ३८० रुपये, बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तींतर्गत २७४ जणांना २७ लाख ३७ हजार ७२०, संशोधन साहाय्यासाठी ३ विद्यार्थ्यांना १५ हजार आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार निवासी शिष्यवृतींतर्गत ८८४ विद्यार्थ्यांना ३ लाख ८१ हजार ७०० रुपयांचे वितरण केले आहे. सामाजिक संस्थांना साहाय्य म्हणून ३७ संस्थांना ५ लाख ५० हजार ५०० रुपयांची मदत केली आहे. त्यासह १०७ विद्यार्थ्यांना एकूण १८ लाख ७५ हजार ४९० रुपयांची ‘बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती’ दिली आहे.ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा केंद्राचा मानसगुणवत्तेच्या निकषांवर सर्व समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जातो. शिवाय शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांना मदत केली जाते, असे वसतिगृहाच्या अध्यक्षा डॉ. यशस्विनी जनवाडकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, सध्या वसतिगृहात १०५ मुलांच्या राहण्याची सुविधा आहे. केवळ राहण्याची सोय नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. भविष्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ई-लायब्ररी, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह, मराठी बालवाडी, शाळा सुरू करण्याचा मानस आहे. वसतिगृहाच्या इतिहासातील मी पहिली महिला अध्यक्षा आहे. वसतिगृहाला शिक्षणाचे व्यापक केंद्र बनविण्याचा माझा प्रयत्न आहे. आपलं घर, गाव सोडून कोल्हापुरात आलेल्या विद्यार्थ्यांना मातेची माया, प्रेम देणाऱ्या वसतिगृहाने शंभरी ओलांडली आहे. त्याचे स्वरूप बदलले असले, तरी तेथील आपुलकी, जिव्हाळा पूर्वीचाच आहे.- संतोष मिठारी, कोल्हापूरवसतिगृह असे उभारलेसारस्वत समाजास वसतिगृहासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी भूखंड व आर्थिक मदत दिली. श्रीमती सरस्वतीबाई गणेश लाटकर यांनी वसतिगृहाच्या उभारणीसाठी आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्या देणगीतून सारस्वत बोर्डिंगची स्थापना २० मे १९१५ रोजी झाली. त्याचे उद्घाटन राजर्षी शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. आतापर्यंत वसतिगृहाची धुरा रावबहाद्दूर शिरगावकर, ए. बी. ओळकर, प्रा. व्ही. ए. देसाई, शांताराम दाभोळकर, सीताराम शिरगांवकर, दामोदर तारळेकर, म. ग. लाटकर, आदींनी सांभाळली आहे. त्यांच्या योगदानामुळेच वसतिगृहाचा विस्तार झाला. दगडी, कौलारू ११ खोल्यांची इमारतीचा के. डी. कामत यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत विस्तार करण्यात आला.