शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील  १९ साखर कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 16:13 IST

राजाराम लोंढे  कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून आतापर्यंत ३४ कारखान्यांनी ...

राजाराम लोंढे कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून आतापर्यंत ३४ कारखान्यांनी १ कोटी ७३ लाख ११ हजार ९९० टनाचे गाळप केले आहे. त्यापैकी १९ कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे संपूर्ण रक्कम दिली असून आठ कारखान्यांनी ८० टक्क्यापेक्षा अधिक रक्कम खात्यावर वर्ग केली आहे. गाळपात ‘कल्लाप्पाण्णा आवाडे ‘हुपरी तर उताऱ्यात ‘दालमिया’ व अथणी शुगर्स, तांबाळेने आघाडी घेतली आहे.यंदा साखर कारखान्यांच्या हंगामाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच गती घेतली. विनाखंड हंगाम सुरू राहिल्याने गाळप वेगाने झाले. निम्या कारखान्यांचा हंगाम मार्चच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. उर्वरित कारखाने अजून किमान महिना सव्वा महिने चालतील, असा अंदाज असल्याने यंदा सव्वादोन कोटी टनापर्यंत विभागाचे गाळप जाण्याची शक्यता आहे.साखरेचे दर स्थिर राहिल्याने यंदा बहुतांशी कारखान्यांनी शेतकऱ्यांना पंधरवड्याप्रमाणे उसाचे पैसे दिले आहेत. आतापर्यंत १९ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. ८० टक्क्यापेक्षा अधिक एफआरपी अदा करणारे ८ कारखाने आहेत. सर्वाधिक १२.९९ टक्के उतारा ‘दालमिया-आसुर्ले’, अथणी-तांभाळे कारखान्याचा आहे.यंदा ‘वारणा’चा बोलबोला!मागील दोन-तीन हंगाम वारणा साखर कारखान्याच्या दृष्टीने अडचणीचे गेले होते. मात्र त्यातून बाहेर पडत यंदा आतापर्यंत तब्बल ९ लाख २४ हजार ६०० टनाचे गाळप केलेच; त्याचबरोबर शेतकऱ्यांची १०० टक्के ‘एफआरपी’ दिल्याने कारखाना कार्यक्षेत्रात ‘वारणा’ कारखान्यांचा बोलबोला आहे.

यांनी दिली १०० टक्के एफआरपी :जिल्हा  - कारखानेकोल्हापूर -  ‘शाहू’, ‘दत्त-शिरोळ’, ‘आवाडे-हुपरी’, ‘शरद’, ‘वारणा’, ‘अथर्व-बांबवडे’, दालमिया, इकाे केन, अथणी-तांबाले, अथर्व-दौलत.सांगली  -  राजारामबापू युनि-१, युनिट वाटेगाव, करंदवाडी, तिपेहल्ली-जत, सोनहिरा, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया-कोकरूड, उदगिरी-खानापूर.सर्वाधिक गाळप :आवाडे : १३ लाख ९२ हजार ३३३ टनवारणा : ९ लाख २४ हजार ६०० टनदत्त, शिरोळ : ८ लाख १० हजार ८८९ टन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने