शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील  १९ साखर कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 16:13 IST

राजाराम लोंढे  कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून आतापर्यंत ३४ कारखान्यांनी ...

राजाराम लोंढे कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून आतापर्यंत ३४ कारखान्यांनी १ कोटी ७३ लाख ११ हजार ९९० टनाचे गाळप केले आहे. त्यापैकी १९ कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे संपूर्ण रक्कम दिली असून आठ कारखान्यांनी ८० टक्क्यापेक्षा अधिक रक्कम खात्यावर वर्ग केली आहे. गाळपात ‘कल्लाप्पाण्णा आवाडे ‘हुपरी तर उताऱ्यात ‘दालमिया’ व अथणी शुगर्स, तांबाळेने आघाडी घेतली आहे.यंदा साखर कारखान्यांच्या हंगामाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच गती घेतली. विनाखंड हंगाम सुरू राहिल्याने गाळप वेगाने झाले. निम्या कारखान्यांचा हंगाम मार्चच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. उर्वरित कारखाने अजून किमान महिना सव्वा महिने चालतील, असा अंदाज असल्याने यंदा सव्वादोन कोटी टनापर्यंत विभागाचे गाळप जाण्याची शक्यता आहे.साखरेचे दर स्थिर राहिल्याने यंदा बहुतांशी कारखान्यांनी शेतकऱ्यांना पंधरवड्याप्रमाणे उसाचे पैसे दिले आहेत. आतापर्यंत १९ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. ८० टक्क्यापेक्षा अधिक एफआरपी अदा करणारे ८ कारखाने आहेत. सर्वाधिक १२.९९ टक्के उतारा ‘दालमिया-आसुर्ले’, अथणी-तांभाळे कारखान्याचा आहे.यंदा ‘वारणा’चा बोलबोला!मागील दोन-तीन हंगाम वारणा साखर कारखान्याच्या दृष्टीने अडचणीचे गेले होते. मात्र त्यातून बाहेर पडत यंदा आतापर्यंत तब्बल ९ लाख २४ हजार ६०० टनाचे गाळप केलेच; त्याचबरोबर शेतकऱ्यांची १०० टक्के ‘एफआरपी’ दिल्याने कारखाना कार्यक्षेत्रात ‘वारणा’ कारखान्यांचा बोलबोला आहे.

यांनी दिली १०० टक्के एफआरपी :जिल्हा  - कारखानेकोल्हापूर -  ‘शाहू’, ‘दत्त-शिरोळ’, ‘आवाडे-हुपरी’, ‘शरद’, ‘वारणा’, ‘अथर्व-बांबवडे’, दालमिया, इकाे केन, अथणी-तांबाले, अथर्व-दौलत.सांगली  -  राजारामबापू युनि-१, युनिट वाटेगाव, करंदवाडी, तिपेहल्ली-जत, सोनहिरा, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया-कोकरूड, उदगिरी-खानापूर.सर्वाधिक गाळप :आवाडे : १३ लाख ९२ हजार ३३३ टनवारणा : ९ लाख २४ हजार ६०० टनदत्त, शिरोळ : ८ लाख १० हजार ८८९ टन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने