शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

ऊस ‘रोपवाटिका’द्वारे १०० कुटुंबे झाली स्वयंपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:02 IST

यशकथा : शेतकऱ्यांना ऊस रोपवाटिका काढण्यासाठी प्रोत्साहन व मदत केल्याने हे शेतकरी आता स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत.

- घनश्याम कुंभार (यड्राव, जि. कोल्हापूर )

शिरदवाड (ता. शिरोळ) येथील शेतकरी लक्ष्मण कुंभार यांनी ऊस रोपवाटिकेच्या माध्यमातून परिसरातील शंभरहून अधिक कुटुंबे स्वयंपूर्ण बनविली आहेत. या शेतकऱ्यांना ऊस रोपवाटिका काढण्यासाठी प्रोत्साहन व मदत केल्याने हे शेतकरी आता स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. त्यांच्या रोपांना कोल्हापूरसह सोलापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यांतून मोठी मागणी आहे.  त्यांच्याकडील अनुभवाचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाने कृषी सहायकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कुंभार यांच्यावर सोपविली आहे. कृषी सहायकांबरोबरच ते परिसरातील शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. 

कुंभार यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले आहे. शिक्षण कमी असले तरी शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची धडपड त्यांच्या अंगी होती. पारंपरिक पद्धतीने उसाच्या बियाणांची लागण न करता त्यासाठी रोपे तयार केली, तर कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होईल. या हेतूने त्यांनी उसाच्या रोपवाटिका तयार करण्याचा निर्णय घेतला. अंगात कष्टाची तयारी आणि मनातील जिद्दीमुळे त्यांनी २००७ मध्ये प्लास्टिक पिशवीत उसाची रोपे तयार करण्यास सुरुवात केली. या रोपांची विक्री चांगल्या प्रकारे झाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. पुढील वर्षी त्यांनी प्लास्टिक पिशवीऐवजी ट्रेचा वापर केला. कोकोपीठ घालून त्यांनी ट्रेमध्ये रोपांची वाढ केली आणि जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी ठरला. 

स्वत:ची अद्ययावत रोपवाटिका तयार झाल्यानंतर इतर शेतकऱ्यांनाही त्याचे अनुकरण करून उत्पादन क्षमता वाढवविण्यासाठी कुंभार यांनी प्रयत्न केले. त्यांनी शेतकरी व आपल्या नातेवाईकांना अशा प्रकारची ऊस रोपवाटिका तयार करण्यास प्रोत्साहित केले. त्यासाठी स्वत: तिथे जाऊन मार्गदर्शन केले, बियाणे,  प्लास्टिक ट्रे, कोकोपीठ उपलब्ध करून देऊन रोपवाटिका तयार करून दिली. रोपवाटिका केली; पण रोपांच्या विक्रीची व्यवस्था कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता; पण कुंभार यांनी रोपांच्या विक्रीची जबाबदारीही स्वीकारल्याने या शेतकऱ्यांनी झोकून देऊन काम केले. १०० हून अधिक शेतकऱ्यांनी रोपवाटिका सुरू केल्याने त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली. सोलापूर, बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडून कुंभार यांनी तयार केलेल्या ऊसरोपांना चांगली मागणी आहे. त्याशिवाय सांगली, नांदेड, रत्नागिरी येथील शेतकरीही रोपांच्या खरेदीसाठी येतात. 

कुंभार यांच्या कष्टांना सरकारदरबारीही न्याय मिळाला आहे. कृषी विभागाने त्यांच्यावर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील कृषी सहायकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविली आहे. शिरदवाड येथील कुंभार यांच्या शेतातच हे प्रशिक्षण देण्यात येते. कृषी सहायकांबरोबरच शेतकऱ्यांनाही ते मोफत सल्ला व मार्गदर्शन देत असतात. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी