शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

आम्ही मेल्यावर आमची देणी देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 12:38 AM

एनआरसी कामगारांच्या विधवांचा सवाल : हाडामांसाची माणसं हक्काकरिता लढताहेत

मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : घरामध्ये दिवाबत्ती नाही, पाण्याचा थेंब नाही, घरे मोडकळीस आली आहेत आणि कधीही बुलडोझर फिरवून उरलासुरला निवारा नष्ट केला जाईल, ही भीती, अशा अवस्थेतही हाडामासाची काही माणसं आपल्या हक्काकरिता लढत आहेत, घरे सोडायला तयार नाहीत. कुणाच्या नवऱ्याने आपल्या हक्काच्या पैशांकरिता टाचा घासून आत्महत्या केली, तर कुणी अन्नान दशा सोसत मरण पावला. ही व्यथा आहे एनआरसी कंपनीतील कामगारांच्या कुटुंबांची. अदानी उद्योगाने ही कंपनी खरेदी केली आहे. या कामगारांनी घरे सोडावीत, याकरिता दिवा-पाणी तोडले आहे. त्यामुळे उद्विग्न झालेल्या कमल शाहू डोंगरे या साठीच्या महिलेने सवाल केला की, आम्ही माणसं नाहीत का? आम्ही मेल्यावर आम्हाला आमची देणी देणार आहात का? हे बोलताना त्या अक्षरश: रडत होत्या.

एनआरसी कंपनीपासून जवळच असलेल्या जेतवनगर टेकडीवर एका साध्या घरात राहणाऱ्या कमल शाहू डोंगरे यांचे पती शाहू हे १९७२ साली कामाला लागले. अनेक वर्षे ते कायमस्वरुपी कामगार नव्हते. शाहू यांना तीन मुले आणि पत्नी कमल असा परिवार होता. शाहू यांना दहा हजार रुपये पगार होता.  कंपनी २००९ साली बंद झाली. शाहू यांनी कर्ज काढले होते. घराचा खर्च कसा चालवायचा आणि घेतलेले कर्ज कसे फेडायचे, याचे टेन्शन त्यांना होते.  कंपनीकडून थकीत देणी मिळत नसल्याने शाहू यांनी कंपनीच्या आवारातील आर. एस. इमारतीच्या मजल्यावरून उडी मारून २०१२ साली आत्महत्या केली. त्यांच्या पत्नी कमल यांना कंपनीकडून दरमहा एक हजार रुपये पेन्शन मिळते. त्यांच्या तीन मुलांपैकी दोन मुले रिक्षा चालवितात. एक मुलगा पुण्याला आहे. मुलांचे त्यांच्याच कमाईत भागत नसल्याने कमल यांच्यावर एकटे   जीवन जगण्याची वेळ आली आहे. पोट भरण्यासाठी दिवसभर त्या भंगार गोळा करतात. त्यातून त्यांना दिवसाला ६० ते १०० रुपये हातखर्ची सुटते.  त्यांना पायाचे आणि कंबरेचे दुखणे आहे. कंपनीकडून १० ते १५ लाख रुपयांची थकबाकी कमल यांना अपेक्षित आहे. कंपनीसमोर एनआरसी संघर्ष समितीतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे कमल यांचा पंधरा दिवसांचा रोजगार बुडाला आहे. सोजर कचरू ओव्हाळ या मूळच्या बीड जिल्ह्यातील लोणीच्या. त्यांचे पती कचरू हे लोणीचे. सोजर या त्यांच्या मामाकडे होत्या. मामांनी कचरूसोबत लग्न लावून दिले. कचरू हे एनआरसीत कामाला होते. बरीच वर्षे अस्थायी काम केल्यावर स्थायी स्वरुपात कायम मिळाल्यावर सात वर्षानी कंपनी बंद पडली. २०१६ मध्ये कचरू यांचे निधन झाले. कचरू हातगाडीवरून कागदाचा लगदा वाहून न्यायचे. त्यावेळी त्यांच्या पोटात गाडीचा दांडा घुसल्याने त्यांना दुखापत झाली होती. सोजर यांचा मुलगा विकास हा लॉकडाऊनमध्ये कामावर जात असताना पोलीस त्याच्या मागे लागले. त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याचा पाय मोडला. तो घरीच आहे. त्याने पत्नी व मुलांना माहेरी पाठवून दिले आहे. सोजर यांना दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा डावा हात मोडला आहे. त्यात रॉड टाकला आहे. हात मोडल्याने धुणी भांड्याची कामे करता येत नाहीत. दोन वर्षांपासून हजार रुपयांची पेन्शन मिळते. त्यावर कसे काय भागवायचे.  कंपनीकडून सोजर यांना २०.७१ लाख रुपये येणे बाकी आहे.            

एका कामगाराचा हृदयविकाराने मृत्यू थकीत देणी मिळत नसल्याने कौशल्या पवळ यांचे पती किसन यांचा दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला. कौशल्या यांना दोन मुले आहेत. त्यांना लॉकडाऊनमुळे काम मिळत नाही. कौशल्या मोहने परिसरात पापड लाटण्याचे काम करतात. त्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे. एक किलो पापड लाटल्यावर १५ आणि दोन किलो पापड लाटल्यावर ३० रुपये मिळतात. गुडघ्याच्या त्रासामुळे जास्त वेळ पापड लाटता येत नाहीत. 

भाबड्या मुलीचेही हाल nतानाजी वीर हे कंपनी बंद झाल्यापासून भाजी विक्री करीत आहेत. दिवसाला शंभर रुपये कसेबसे सुटतात. त्यांना एक गतिमंद मुलगी आहे. तिच्या उपचाराचा खर्च जास्त आहे. वीर कंपनीच्या कामगार वसाहतीत राहतात. त्यांना हुसकावून काढण्याकरिता वीज - पाणीपुरवठा खंडित केला आहे. nउकाड्याचे दिवस सुरू झाल्याने त्यांची गतिमंद मुलगी रात्ररात्र झोपत नाही आणि पंखा लावा म्हणून सांगते. तिला काय उत्तर द्यायचे. रात्रीच्या अंधारात त्या भग्नावस्थेतील घरात वीर कंठाशी आलेला हुंदका फक्त दाबतात.