शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

Ramdas Athawale: आम्ही सोबत असताना भाजपला मनसेची काय गरज? युती झाली तर भाजपचं नुकसान: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 17:04 IST

रिपब्लीकन पक्ष भाजपच्या सोबत असल्याने मनसेची काय गरज आहे. दलित, अल्पसंख्याक हा भाजपच्या पाठीशी आहे.

भाजप आणि मनसे यांची युती होणो अशक्य आहे. कारण भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. तर मनसेची भूमिका मराठीची आहे. त्यामुळे अशी एकल भूमिका घेणे भाजपला परवडणार नाही. रिपब्लीकन पक्ष भाजपच्या सोबत असल्याने मनसेची काय गरज आहे. दलित, अल्पसंख्याक हा भाजपच्या पाठीशी आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि रिपाई निवडणूक लढविणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिली आहे. 

कल्याण पूर्व भागातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवचंद अंबादे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त केंद्रीय मंत्री आठवले हे उपस्थित होते. काशीश हॉटेलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमास केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते अंबादे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पद्मश्री कल्पना सरोज, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, भाजप आमदार गणपत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आठवले यांनी उपरोक्त माहिती दिली. आठवले यांनी सांगितले की, कोरोनामुळे निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूकीत भाजप आणि रिपाई सोबत निवडणूका लढविणार आहे. त्यावेळी भाजपकडे रिपाई काही जागा मागणार आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी भाजप शिवसेना पुन्हा एकत्रित येऊ शकतात. अजूनही वेळ गेलेली नाही. नारायण राणो आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला पाहिजे. अशा प्रकारचे वाद करुन चालणार नाही. नारायण राणो हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयी राज्यातील सत्तेने सत्तेचा वापर करुन गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणो अयोग्य आहे. शिवसेनाही अशी वक्तवे करीत असते. राणो हे शिवसेनेत होते. त्यामुळे त्यांची भाषा तशी आहे. त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेणो अनावश्यक होते. केंद्र आणि राज्याकडून येणा:या पैशातून राज्याचा विकास केला पाहिजे. विकासाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे असे आवाहन आठवले यांनी केले आहे. 

राष्ट्रवादी पक्षाच्या निर्मितीनंतर जातीद्वेष निर्माण झाल्याची असल्याची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यासंदर्भात आठवले यांच्याकडे विचारणा केली असता आठवले यांनी सांगितले की, राज्यात अजूनही दलितांवर अत्याचार होत आहे. 70 वर्षे काँग्रेस देशाच्या सत्तेत होती. त्यांनी जातीवाद संपविला नाही. राष्ट्रवादीही राज्याच्या सत्तेत होती. पुणे परिसरात राष्ट्रवादीने ग्रामीण भागातील दलितांवरील अत्याचार झाल्याची माहिती राज ठाकरे यांना मिळाली असावी. त्याआधारे त्यांनी राष्ट्रवादीवर टिका केली केली असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाMNSमनसे