शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

Ramdas Athawale: आम्ही सोबत असताना भाजपला मनसेची काय गरज? युती झाली तर भाजपचं नुकसान: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 17:04 IST

रिपब्लीकन पक्ष भाजपच्या सोबत असल्याने मनसेची काय गरज आहे. दलित, अल्पसंख्याक हा भाजपच्या पाठीशी आहे.

भाजप आणि मनसे यांची युती होणो अशक्य आहे. कारण भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. तर मनसेची भूमिका मराठीची आहे. त्यामुळे अशी एकल भूमिका घेणे भाजपला परवडणार नाही. रिपब्लीकन पक्ष भाजपच्या सोबत असल्याने मनसेची काय गरज आहे. दलित, अल्पसंख्याक हा भाजपच्या पाठीशी आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि रिपाई निवडणूक लढविणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिली आहे. 

कल्याण पूर्व भागातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवचंद अंबादे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त केंद्रीय मंत्री आठवले हे उपस्थित होते. काशीश हॉटेलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमास केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते अंबादे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पद्मश्री कल्पना सरोज, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, भाजप आमदार गणपत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आठवले यांनी उपरोक्त माहिती दिली. आठवले यांनी सांगितले की, कोरोनामुळे निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूकीत भाजप आणि रिपाई सोबत निवडणूका लढविणार आहे. त्यावेळी भाजपकडे रिपाई काही जागा मागणार आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी भाजप शिवसेना पुन्हा एकत्रित येऊ शकतात. अजूनही वेळ गेलेली नाही. नारायण राणो आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला पाहिजे. अशा प्रकारचे वाद करुन चालणार नाही. नारायण राणो हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयी राज्यातील सत्तेने सत्तेचा वापर करुन गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणो अयोग्य आहे. शिवसेनाही अशी वक्तवे करीत असते. राणो हे शिवसेनेत होते. त्यामुळे त्यांची भाषा तशी आहे. त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेणो अनावश्यक होते. केंद्र आणि राज्याकडून येणा:या पैशातून राज्याचा विकास केला पाहिजे. विकासाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे असे आवाहन आठवले यांनी केले आहे. 

राष्ट्रवादी पक्षाच्या निर्मितीनंतर जातीद्वेष निर्माण झाल्याची असल्याची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यासंदर्भात आठवले यांच्याकडे विचारणा केली असता आठवले यांनी सांगितले की, राज्यात अजूनही दलितांवर अत्याचार होत आहे. 70 वर्षे काँग्रेस देशाच्या सत्तेत होती. त्यांनी जातीवाद संपविला नाही. राष्ट्रवादीही राज्याच्या सत्तेत होती. पुणे परिसरात राष्ट्रवादीने ग्रामीण भागातील दलितांवरील अत्याचार झाल्याची माहिती राज ठाकरे यांना मिळाली असावी. त्याआधारे त्यांनी राष्ट्रवादीवर टिका केली केली असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाMNSमनसे