शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Athawale: आम्ही सोबत असताना भाजपला मनसेची काय गरज? युती झाली तर भाजपचं नुकसान: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 17:04 IST

रिपब्लीकन पक्ष भाजपच्या सोबत असल्याने मनसेची काय गरज आहे. दलित, अल्पसंख्याक हा भाजपच्या पाठीशी आहे.

भाजप आणि मनसे यांची युती होणो अशक्य आहे. कारण भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. तर मनसेची भूमिका मराठीची आहे. त्यामुळे अशी एकल भूमिका घेणे भाजपला परवडणार नाही. रिपब्लीकन पक्ष भाजपच्या सोबत असल्याने मनसेची काय गरज आहे. दलित, अल्पसंख्याक हा भाजपच्या पाठीशी आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि रिपाई निवडणूक लढविणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिली आहे. 

कल्याण पूर्व भागातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवचंद अंबादे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त केंद्रीय मंत्री आठवले हे उपस्थित होते. काशीश हॉटेलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमास केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते अंबादे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पद्मश्री कल्पना सरोज, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, भाजप आमदार गणपत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आठवले यांनी उपरोक्त माहिती दिली. आठवले यांनी सांगितले की, कोरोनामुळे निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूकीत भाजप आणि रिपाई सोबत निवडणूका लढविणार आहे. त्यावेळी भाजपकडे रिपाई काही जागा मागणार आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी भाजप शिवसेना पुन्हा एकत्रित येऊ शकतात. अजूनही वेळ गेलेली नाही. नारायण राणो आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला पाहिजे. अशा प्रकारचे वाद करुन चालणार नाही. नारायण राणो हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयी राज्यातील सत्तेने सत्तेचा वापर करुन गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणो अयोग्य आहे. शिवसेनाही अशी वक्तवे करीत असते. राणो हे शिवसेनेत होते. त्यामुळे त्यांची भाषा तशी आहे. त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेणो अनावश्यक होते. केंद्र आणि राज्याकडून येणा:या पैशातून राज्याचा विकास केला पाहिजे. विकासाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे असे आवाहन आठवले यांनी केले आहे. 

राष्ट्रवादी पक्षाच्या निर्मितीनंतर जातीद्वेष निर्माण झाल्याची असल्याची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यासंदर्भात आठवले यांच्याकडे विचारणा केली असता आठवले यांनी सांगितले की, राज्यात अजूनही दलितांवर अत्याचार होत आहे. 70 वर्षे काँग्रेस देशाच्या सत्तेत होती. त्यांनी जातीवाद संपविला नाही. राष्ट्रवादीही राज्याच्या सत्तेत होती. पुणे परिसरात राष्ट्रवादीने ग्रामीण भागातील दलितांवरील अत्याचार झाल्याची माहिती राज ठाकरे यांना मिळाली असावी. त्याआधारे त्यांनी राष्ट्रवादीवर टिका केली केली असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाMNSमनसे