शहरं
Join us  
Trending Stories
1
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
2
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
3
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
4
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
5
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
6
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
7
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
8
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
9
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
10
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
11
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
12
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
13
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
15
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
17
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
18
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
19
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
20
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Amit Thackeray: एकदा लोकल प्रवास करणाऱ्यांना 900 रुपयांच्या पासचा भुर्दंड कशाला? अमित ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 19:15 IST

Amit Thackeray in Kalyan Dombivali pothole roads: राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुणे आणि नाशिकमध्ये बैठका घेतल्या. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवलीतील मनसे पदधिका:याची बैठक मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतली.

कल्याण-नाशिकमध्ये आपल्या महापालिकेच्या सत्ताकाळात मनसे जे रस्ते विकसीत केले. ते आजही उत्तम स्थितीत आहेत. पाऊस काय फक्त कल्याण डोंबिवलीत पडतो का ? नाशिकमध्ये पाऊस पडत नाही का ? नाशिकमधील रस्ते उत्तम राहतात. तर कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावर खड्डे का पडतात ? असा सवाल मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुणे आणि नाशिकमध्ये बैठका घेतल्या. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवलीतील मनसे पदधिका:याची बैठक मनसे नेते ठाकरे यांनी घेतली. या बैठकीपश्चात त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी उपरोक्त सवाल उपस्थित करीत मुंबई, ठाणो आणि कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे प्रश्नाचा समाचार घेतला. यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अमेय खोपकर,मनसे आमदार राजू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.मनसे नेते ठाकरे यांनी आज मनसे बैठकीला येण्यासाठी दादरहून रेल्वेने प्रवास करुन डोंबिवली गाठली. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत रस्त्यावरील खड्डयामुळेच रेल्वेने प्रवासकरुन अवघ्या 4क् मिनिटात डोंबिवली गाठली. मुंबईतही प्रचंड खड्डे आहे. मुंबईतून बाहेर पडता येत नाही. ट्रेनने आलो आत्ता पुन्हा घरी ट्रेनने जाणार आहे. सामान्यांना रस्त्यावरील खड्डय़ांचा किती त्रस सहन करावा लागतो याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. २५ वर्षापासून सत्तेवर असलेल्या पक्षांनी साधे रस्ते विकासाचे नियोजन करु शकले नाहीत. रस्ते नीट नाहीत. विकास करण्यासाठी इच्छा शक्ती लागते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे ती इच्छा शक्ती आहे. याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.

मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली परिसरात रस्त्यावरील खड्डय़ांची समस्या आहे. रस्त्यावरील खड्डय़ांच्या तक्रारी नागरीकांसह मनसे कार्यकत्र्यानी आमच्याकडे केलेल्या आहे. इथल्या सत्ताधा:यांनी अन्य समस्यांही सोडविलेल्या नाहीत.

९०० रुपयांच्या पास भुर्दंड एकदा प्रवास करणा:या प्रवाशाच्या माथी कशाला ?मनसे नेते ठाकरे यांनी सांगितले की, मी रेल्वेने दादरहून डोंबिवलीला आलो तेव्हा मला 900 रुपयांचा पास काढावा लागला. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या तिकीट दिले जावे. ज्या प्रवाशाला एकदाच प्रवास करायचा आहे. त्याला ९०० रुपये पास काढण्याची सक्ती का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तिकीट देण्याची सुविधा सुरु करावी. सरसकट सगळया प्रवाशांना हा ९०० रुपयांचा भुर्दंड का असे ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसे