शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

सहज कुठे तरी भेट झाली म्हणून पतंग उडविण्यात काय अर्थ आहे; विनोद तावडे यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 18:00 IST

कल्याण पूर्व भागात भाजपच्या कार्यकत्र्याचा मेळावा आज शुक्रवारी पार पडला.

कल्याण- प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते. नाशिकमधील मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची पुण्यात सहज भेट झाली. त्यावरुन पतंग उडविण्यात काय अर्थ आहे असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सचिव व माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी येथे केले. 

कल्याण पूर्व भागात भाजपच्या कार्यकत्र्याचा मेळावा आज शुक्रवारी पार पडला. यावेळी  भाजपा प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, माजी मंत्नी जगन्नाथ पाटील, कल्याण मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, राजन वारे, अभिजित करंजुले, राजू कवठाऴे, जिल्हा सरचिटणीस भारत फुलोरे, अर्जुन म्हात्रे, युवा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई, महिला अध्यक्ष नगरसेविका रेखा चौधरी उपस्थित होते. 

भाजपचे राष्ट्रीय सचीव तावडे हे गेल्या दोन वर्षापासून राजकारणात दिसत नव्हते. याबाबत पत्रकारांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता तावडे यांनी सांगितले की, त्यांच्याकडे पक्षाने हरियाणाची जबाबदारी दिली होती. त्यासाठी ते हरियाणा येथे जात येत  होते. महाराष्ट्रात तावडे दहा दिवस असतात. त्या वेळेत ते पक्षाच्या कामासाठी महाराष्ट्रातील कार्यकत्र्याना वेळ देतात. निवडणूका आल्या म्हणून हा मेळावा घेतला आणि मार्गदर्शन केले असे नाही असे स्पष्ट केले. दरम्यान तावडे यांचे दुर्गाडी चौकात जोरदार स्वागत झाले. त्यानंतर त्यांनी माजी आमदार पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्याचबरोबर शहरातील शिक्षण क्षेत्रतील अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेतली. शिक्षण या विषयावर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपाkalyanकल्याण